बीड येथील कोचिंग क्लास अर्थात शिकवणी वर्गात झालेल्या मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची वरिष्ठ आयपीएस महिला अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथक (एसआयटी) नेमून चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली. या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे का, यात कोणाचा वरदहस्त आहे का हे देखील तपासले जाईल. मुलींना न्याय मिळावा यादृष्टीने योग्य प्रयत्न करू. …
Read More »भिवंडीला आशिया खंडातील लॉजिस्टिक हब साठी समिती गठीत करणार त्यात भिवंडी पूर्व चे आमदार रईस शेख यांचा समावेश
भिवंडी मध्ये आशिया खंडातील सगळ्यात मोठा लॉजिस्टिक हब बनविण्यासाठी सरकार एक समिती गठीत करेल आणि त्यात उद्योग, नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांसह भिवंडी पूर्वेचे आमदार रईस शेख यांचा समावेश असेल अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत केली. आमदार रईस शेख यांनी विधानसभेत चर्चेदरम्यान भिवंडीला लॉजिस्टिक हब विकसित करण्याकडे सरकारचे लक्ष …
Read More »काँग्रेसला हात दाखवित कुणाल पाटील यांचा भाजपात प्रवेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले स्वागत
धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी श्री. कुणाल पाटील व त्यांच्या समर्थकांचे स्वागत केले. धुळ्याचे पालक मंत्री जयकुमार रावल, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आ. राम …
Read More »आशिष शेलार यांचे निर्देश, पारंपारिक गोंदण कलेचा समावेश कला अभ्यासक्रमात करा अभ्यास गटाची स्थापना करण्यासाठी पावले उचला
पारंपारिक गोंदणकलेचा समावेश कला शिक्षण अभ्यासक्रमात करण्याकरता पावले उचलावीत तसेच गोंदणकलेच्या संदर्भातील सर्वंकष संशोधनासाठी एक अभ्यासगट तातडीने स्थापन करावा असे निर्देश आज सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज येथे दिले. आज मंत्रालयात महाराष्ट्रातील पारंपारिक गोंदणकलाकारांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी हे निर्देश दिले. यावेळी सांस्कृतिक कार्य …
Read More »नाना पटोले यांचा हल्लाबोल, नरेंद्र मोदी लोणीकरांचे आणि भाजपाचे बाप, शेतकऱ्यांचे नाही शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी आमदारकी व आयुष्यही देऊ
भारतीय जनता पक्षाचा माजी मंत्री बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांबद्दल केलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे. नरेंद्र मोदी भाजपा व बबनराव लोणीकरांचा बाप असेल आमचा किंवा शेतकऱ्यांचा बाप असू शकत नाही असा घणाघाती हल्ला करत शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला आहे. एका दिवसांचे निलंबनच काय आमदारकी व अख्खं आयुष्य शेतकऱ्यांसाठी देईन असे काँग्रेसचे …
Read More »नाना पटोले यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईनंतर विरोधकांचा कामकाजावर बहिष्कार काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानसभेतून सभात्याग
आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी विरोधकांनी राज्यातील विविध प्रश्नांवरुन महायुती सरकारच्या विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केले. शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणाबाजी यावेळी …
Read More »बबनराव लोणीकरांच्या वक्तव्यावरून विरोधक आक्रमकः नाना पटोले एक दिवसासाठी निलंबित विरोधकांची मागणी, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांची माफी मागावी
पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस. आज दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचार, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतकरी कर्ज यावरून सरकारच्या विरोधात आंदोलन केले. तर दुसरीकडे विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर पाच मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्याची पाळी आली. दरम्यान, विधानसभेचे …
Read More »प्रताप सरनाईक यांची घोषणा, सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी सुविधा
आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या ५,२०० बसेसची व्यवस्था केली आहे. या बसेस घेऊन येणारे चालक, वाहक त्यांची देखभाल करणारे यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक, अधिकारी यांच्या चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी …
Read More »माणिकराव कोकाटे यांचे आश्वासन, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार कृषी विभागातर्फे महाकृषी ए. आय. धोरण कार्यशाळेचा शुभारंभ
मानव विरहित शेती, ‘ए आय’ आधारित हवामानाचे अंदाज व हवामान अनुकूल पीक पद्धती घेणे, काटेकोर सिंचन पद्धती विकसित करणे, जिल्हास्तरावर शेती प्रयोगशाळा उभारणे, शेतीसाठी मोबाईल व्हॅनची सोय करणे, पीक साठवणूक सुविधा वाढवणे, शेतीसाठी कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रद्यान वापरून, उत्पादन वाढवून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करण्यावर शासनाचा भर आहे, असे मत कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले. …
Read More »चीनच्या विशेष खंतांवर बंदी, भारतातील या तीन कंपन्या फायद्यात येण्याची शक्यता विशेष खतांची मात्र इतर देशांना निर्यात
गेल्या दोन महिन्यांपासून चीनने फळे, भाज्या आणि इतर फायदेशीर पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशेष खतांची निर्यात थांबवली आहे. तथापि, कृषी निविष्ठांचा जागतिक पुरवठादार असलेला चीन इतर राष्ट्रांना त्यांची निर्यात करत आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून चीन भारताला विशेष खतांच्या पुरवठादारांवर निर्बंध घालत आहे. तथापि, यावेळी ते पूर्णपणे थांबले …
Read More »
Marathi e-Batmya