Breaking News

मल्लिकार्जून खर्गे यांची आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना गॅरंटी, आम्ही देऊ एमएसपी…

देशातील शेतकऱ्यांच्या शेत मालाला एमएसपी अर्थात आधारभूत किंमत मिळावी म्हणून पंजाब, हरियाणामधील सर्व शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात चलो दिल्ली आंदोलन पुकारले. तसेच केंद्र सरकारकडून आधारभूत किंमतीबाबतचा निर्णय जाहिर केल्याशिवाय माघारी फिरायचे नाही असा निश्चय करून दिल्लीच्या दिशेने शेतकरी मोर्चा निघाला. मात्र केंद्र सरकारने पुन्हा एकदा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यावर …

Read More »

आरटीओने फक्त “चॉईस” वर कमावले ४१ लाख रूपये

नागरिकांनी विविध आकर्षक क्रमांक व पसंती क्रमांकासाठी आरटीओ अर्थात परिवहन कार्यालयामध्ये येऊन अर्ज सादर केले आहेत. मान्यतेअंती पात्र अर्जदारांनी धनादेशाद्वारे व पसंती क्रमांकासाठी देय असलेले शासकीय शुल्क जमा केले आहे. यापोटी शासनाच्या तिजोरीमध्ये ४१ लाख ७३ हजार ६३३ रुपयांचा महसूल जमा झाला आहे. आरटीओ अर्थात परिवहन कार्यालयाच्या एमएच ०३ ईएल …

Read More »

काँग्रेसची टीका, अशोक चव्हाण डरपोक, मैदान सोडून पळाले!

अशोक चव्हाण यांना दोनवेळा मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, आमदार, खासदार अशी विविध पदे काँग्रेस पक्षाने दिली. पक्षात नेतृत्व करण्याची संधी दिली. कालपर्यंत ते काँग्रेस पक्षात होते पण अचानक ते भारतीय जनता पक्षात गेले. अशोक चव्हाण डरपोक आहेत, ते मैदान सोडून पळाले आणि विरोधकांशी हातमिळवणी करून काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला, असा घणाघात प्रदेश …

Read More »

शेतकरी- पोलिसांमधील धुमचक्रीमुळे टिकरी बॉर्डर बंद, अडेलतट्टू भूमिका घेतल्यास..

देशातील शेतकऱ्यांच्या संघटनेने शेतमालाला हमी भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी केंद्र सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा चल्लो दिल्लीची घोषणा देत १३ फेब्रुवारी २०२४ रोजी दिवसभरात पंजाब, हरियाणातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी सिंघू अर्थात शंभू सीमावर्ती भागात पोहोचले. पण आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये झडप उडाल्याने अखेर दिल्लीच्या दिशेने असलेली टीकरी बॉर्डरवरील सुरक्षा आणखी …

Read More »

अशोक चव्हाण यांनी नव्याने धारण केले कमळः काँग्रेस नेमकी चाललीय कुठे?

मागील काही काळापासून अशोक पर्व आणि कफ परेडला लागून असलेल्या संरक्षण दलाच्या जमिनीवर आदर्श नामक इमारतीतील सदनिकांच्या घोटाळ्याप्रकरणी आरोपाच्या संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपला हात काँग्रेसच्या हातातून सोडवून घेत (राजीनामा देत) भाजपाचे कमळ नुसतेच हाती नाही धरले तर अंगावर धारण केले. …

Read More »

शेतकऱ्यांसाठी पुन्हा दिल्ली बंदीः सिंघू सीमेवर आंदोलकांवर अश्रू धुराच्या नळकांड्या

आपल्या न्याय हक्कांसाठी आणि शेतमालाला योग्य भाव मिळावा, कर्जमाफीच्या मागणीसाठी पंजाब आणि हरियाणासह देशभरातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा चलो दिल्लीचा नारा दिला. घाबरलेल्या केंद्रीय गृह विभागाने मात्र दिल्लीच्या हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेशसह सर्व दिल्लीच्या सर्व सीमावर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. त्यासाठी सिमेंटच्या बॅरिकेड्स, टोकसाई सळईचे लोखंडी बॅरिके़डस, पाण्याचे टँकर …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, बारा बलुतेदारांसाठी नवे मागास विकास महामंडळ

बारा बलुतेदारांसाठी श्री संत गाडगेबाबा आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन केले जाईल, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, अशी निसंदिग्ध ग्वाही आज येथे दिली. प्रतापगड येथे शूरवीर जिवाजी महाले स्मारकासाठी जागा दिली जाईल. बारा बलुतेदार समाजासाठी विश्वकर्मा कौशल्य …

Read More »

छगन भुजबळ यांची मागणी, … मसुद्याबाबत हरकत नोंदविण्यासाठी मुदतवाढ द्या

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण क्र.४९ महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अधिनियम विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास वर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम २००० २६ जानेवारी २०२४ या अधिसूचनेच्या मसुद्याबाबत हरकत नोंदविण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. याबाबत …

Read More »

अशोक चव्हाण यांची स्पष्टोक्ती, राजीनामा दिला, पण निर्णय दोन दिवसानंतर

राज्यातील काँग्रेसचे वजनदार नेते म्हणून ख्याती असलेल्या अशोक चव्हाण यांनी आज अचानक काँग्रेस पक्षाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यातच १५ फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर येत असून त्या दौऱ्यातच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर अशोक चव्हाण यांच्या …

Read More »

काँग्रेस नगरसेवकांच्या भाजपा प्रवेशावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, आगे आगे देखो…

सर्वच पक्षांचे चांगले आणि बडे नेते आमच्या संपर्कात असून आगे आगे दोखो होता है क्या… असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. आज त्यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. वाँर्ड क्र ८२ मध्ये दोन टर्म काँग्रेसमधून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आणि उत्तर मध्य जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष …

Read More »