Breaking News

सुप्रिया सुळे यांची टीका, रात्रीची ती घटना म्हणजे राजकीय गुंडगिरीचा कळस

मुंबई उपनगरातील उल्हासनगर येथील हिललाईन पोलिस ठाण्यात जमिनीच्या वादातून स्थानिक भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यातच शिंदे गटाचे समर्थक महेश गायकवाड यांच्यासह राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रात्री झालेली घटना म्हणजे राजकिय गुंडगिरीचा …

Read More »

राम मंदिर आंदोलनाचा पाया रचणारे लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहिर केल्यानंतर घरी जात केले अभिनंदन

देशातील हिंदूत्ववादी राजकारणाचा आणि अयोध्येतील बाबरी मस्जिदीच्या जागेवर राम मंदिर होता असा दावा करत राम मंदिर उभारणी आंदोलनाचा पाया रचणारे आणि नरेंद्र मोदी यांना राजकिय संधी उपलब्ध करून देणारे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना आज भारतरत्न जाहिर करण्यात आला. विशेष म्हणजे भारत रत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहिर केल्यानंतर …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप राज्यात शिंदे-फडणवीस-पवारांचे गुंडाराज…

महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार करत आहेत यावरून महाराष्ट्रात जंगलराज आल्याचे स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांचा पोलीसांवर प्रचंड दबाव असून कायद्याने काम करु दिले जात नाही. आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेले आरोप …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी

राज्यात सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने सहयोगी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार केल्याची घटना महाराष्ट्रातील पहिलीच असावी. मुंबई उपनगरातील उल्हासनगरमधील हिललाईन पोलिस ठाण्यात पोलिसांसमोरच भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे समर्थक माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांवर गोळीबार केला. यात महेश गायकवाड आणि त्यांचा साथीदार राहुल पाटील यांची प्रकृत्ती चिंताजनक असल्याची माहिती …

Read More »

भाजपा आमदार गोळीबार प्रकरणी विजय वडेट्टीवार यांचा खोचक टोला, मोदींची गॅरंटी

मुंबई उपनगरातील भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉ श्रीकांत शिंदे यांचे समर्थक महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगर येथील हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. त्यानंतर गणपत गायकवाड यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी फोनवरून बोलताना गोळीबाराच्या घटनेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव खासदार डॉ …

Read More »

आमदार गणपत गायकवाड म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळेच आज मी गुन्हेगार…

आतापर्यंत शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांकडून एकमेकांवर भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. परंतु शुक्रवारी रात्री उल्हासनगर मधील हिल पोलिस स्थानकात स्थानिक भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या मुलाला शिंदे गटाच्या शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या समर्थकांकडून धक्काबुक्की केल्याच्या कारणावरून गणपत गायकवाड यांनी थेट पोलिस ठाण्यातच गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. गणपत …

Read More »

राज्य सरकारचा मोठा निर्णयः २००५ नंतर रूजू झालेल्या शासकिय कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन लागू

Mantralay

निवडणूका जशजशा जवळ येऊ लागल्या आहेत. तसतशा राज्यातील जनतेला खुष करणाऱ्या घोषणांचा सपाटा राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नोव्हेंबर २००५ नंतर शासकिय नोकरीत रूजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू केल्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. राज्य सरकारच्या या योजनेचा लाभ २६ हजार शासकिय कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल, हिंदू-मुस्लिम प्रमाणेच मराठा आणि ओबीसी समाजात…

विद्यमान सरकारकडून ज्या प्रकारे हिंदू आणि मुस्लिम या दोन समाजांमध्ये ज्या प्रमाणात वाद निर्माण करून वेगवेगळे केले आहे त्याचप्रमाणे सरकारकडून मराठा आणि ओबीसी यांना वेगवेगळे करण्याचं काम करत आहे याचं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध करतो असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. पुढे …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, भुजबळांची सरकारने माफी मागावी, संजय गायकवाडांना निलंबत करा

राज्यातील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल ज्या पद्धतीने अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरण्यात आली, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री असलेले भुजबळ हे मागासवर्गीय समाजाचे आहेत म्हणूनच त्यांच्याबद्दल शिविगाळ करणारी भाषा वापरण्यात आली आहे, ही मानसिकता भारतीय जनता पक्षाची आहे. भुजबळांबद्दल जी भाषा वापरली त्याबद्दल सरकारने माफी मागावी …

Read More »

प्रकाश आंबेडकर म्हणाले, आता इंडिया आघाडी राहिली….

महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये याची दक्षता घेण्याचे आम्ही ठरवलेलं आहे.त्याच्यामुळे, ताक जरी असले तरी फुकून प्यायचे हे मी ठरवलेले आहे.जागावाटप हा दुय्यम विषय आहे, प्रथम विषय हा आहे की, एक ‘किमान समान कार्यक्रम’ हा आम्ही पहिल्यांदा घेतला आहे. त्याची अर्धवट चर्चा झाली आहे, अर्धवट चर्चा सुरू असल्याचे वंचित …

Read More »