Breaking News

आणि एका तरूण शेतकऱ्याचा मंत्रालयातील आत्महत्येचा प्रयत्न फसला पोलिसांच्या सतर्कतेमुळे सोलापूरच्या सदाशिव धावरेचे प्राण वाचले

मुंबई: प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्त्येचे प्रकरण ताजे असतानाच शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यातील तरूण शेतकऱ्याने मंत्रालयातच आत्महत्या करण्यासाठी विषाची बाटली सोबत घेवून मंत्रालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र मंत्रालयातील पोलिसांनी सदर शेतकऱ्याकडून किटकनाशकाची बाटली काढून घेत त्याचा प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे मंत्रालयात येवून शेतकऱ्याचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न फसला. …

Read More »

मोदी सरकारचा आणखी एक जुमला म्हणजे आयुष्यमान भारत कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने जाहीर केलेली ‘आयुष्यमान भारत’ योजना म्हणजे मोदी सरकारचा अजून एक नवा ‘जुमला’ असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. गेल्या चार वर्षातील सरकारने जाहीर केलेल्या प्रत्येक योजनेचे जनतेला सांगितलेले आकडे व प्रत्यक्षात झालेला खर्च पाहता मोदी सरकार गेल्या चार वर्षापासून सरकार चालवतेय …

Read More »

मराठा समाजाला आत्मनिर्भर करण्यासाठी पाच लाख उद्योजक तयार करणार छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास योजनेचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईः प्रतिनिधी मराठा समाजातील होतकरू तरुणांना केवळ नोकरी, रोजगार देण्याच्या उद्देशाने नाही. तर पुढच्या काळात नोकऱ्या देणारे पाच लाख उद्योजक बनवण्याचा उद्देश असल्याचे सांगत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मार्फत छ.राजाराम महाराज कौशल्य विकास अभियानाचा शुमारंभ करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले.  मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात …

Read More »

शेतकऱ्यांचा पुन्हा सरकार विरोधात एल्गार कर, कर्जा और बिजली का बिल भी नही देंगेंचा शेतकरी समितीचा नारा

मुंबईः प्रतिनिधी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या हत्याराला घाबरत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली. मात्र सात-आठ महिन्याचा अवधी उलटत नाही, तोच कर्जमाफीची यशस्वी अंबलबजावणी न करण्यात आल्याने आणि सरसकट कर्ज माफी, शेतीपूरक व्यवसाय, शैक्षणिक आणि सिंचनासंदर्भात काढण्यात आलेले कर्ज ही कर्जमाफीच्या निकषात बसवावे यासह अन्य प्रश्न पुन्हा राज्य सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन …

Read More »

सांस्कृतिक क्षेत्रातल्या शिरकावासाठी भाजपला ’प्रसाद’चा आधार नाट्य परिषद हिसकावून घेण्यासाठी ताव़डेंचे पवारांना आव्हान

मुंबईः प्रतिनिधी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या निवडणूकांचे पडघड वाजायला सुरुवात झाली. या निवडणूकीला अद्याप एक महिना शिल्लक असतानाच दुसऱ्याबाजूला या नाट्य परिषदेच्या निवडणूकीच्या निमित्ताने सांस्कृतिक क्षेत्रातील शिरकावासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी नाट्य निर्माता संघाच्या कांबळींना पाठबळ देत भाजपला प्रसाद चा आधार निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती पुढे आली …

Read More »

मोजो बिस्ट्रो आणि वन अबाव्ह हॉटेल मालकांची नार्को टेस्ट करा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची राज्यपालांकडे मागणी

मुंबईः प्रतिनिधी शहरातील अत्यंत मध्यवर्ती असलेल्या लोअर परळ येथील मोजो बिस्ट्रो आणि वन अबाव्ह या दोन रेस्टॉरंटच्या मालकांनी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना लाच देत असल्याची स्पष्ट कबुली दिली. त्यामुळे या रेस्टॉरंटच्या दोन्ही मालकांबरोबर अटकेत असलेल्या अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्यपाल सी.विद्यासागर यांच्याकडे …

Read More »

पत्राचाळ आणि फितवाला चाळीच्या बिल्डर्स विरोधात गुन्हा दाखल करा गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांचे म्हाडाला आदेश

मुंबई : प्रतिनिधी गोरेगांव येथील पत्राचाळ आणि एलफिस्टनमधील फितवाला चाळीच्या पुर्नविकासात बिल्डरांनी घोटाळा करून रहिवाशांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे या चाळींच्या बिल्डरांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी म्हाडाच्या दुरूस्ती व पुर्नवसन मंडळ आणि मुंबई मंडळाला दिले. एलफिन्स्टन रोड येथील फितवाला चाळ आणि गोरेगांव येथील पत्रावाला …

Read More »

अल्पसंख्याक उमेदवारांना जात प्रमाणपत्र देताना पक्षपात उपजिल्हाधिका-यांची चौकशी करण्याची आमदार अॅड. पठाण यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी मुंबई शहराचे उपजिल्हाधिकारी अशोक मुंढे हे जात प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे पडताळणी करताना अल्पसंख्याक उमेदवारांना क्लिष्ट प्रश्न विचारून उमेदवाराला नाऊमेद करत आहेत. तसेच जात प्रमाणपत्र मिळता कामा नये, याची पुरेपूर दक्षता घेत असल्याचा आरोप एमआयएमचे आमदार अॅड वारीस पठाण यांनी करत अशा हेतू पुरस्सर वागणाऱे उपजिल्हाधिकारी अशोक मुंढे यांची …

Read More »

गरीबांसाठी घराची अर्थसंकल्पात घोषणा, तर मुंबईतल्या गरीबांचे मंत्रालयात आंदोलन ओंकार बिल्डर्स विरोधातील आंदोलनानंतर नागरीकांना पोलिसांकडून अटक

मुंबईः प्रतिनिधी एकीकडे केंद्रीय अर्थसंकल्पात देशातील गरिबांना २०२२ पर्यंत सर्वाना घरे देण्याचे आश्वासन देवून केंद्र सरकारला २४ तासांचा अवधी होत नाही. तोच मालाड येथील नियोजित एसआरए प्रकल्पातील घरे मिळावीत यासाठी ओकांर बिल्डर्सच्या विरोधात शेकडो झोपडीवासीयांनी मंत्रालयात घुसून ठिय्या आंदोलन केले. मालाड पूर्व येथील कुरार इथल्या शांताराम तलाव येथील जानू भोईर …

Read More »

सरपंच पतींनी घातला मंत्रालयात गोंधळ सरपंच पत्नीच्या मागे जाण्यापासून पोलिसांनी रोखले

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेकडून थेट नव्याने निवडूण आलेल्या सरपंचांचे सरपंच दरबार मंत्रालयात आयोजित करण्यात आला. मात्र या दरबारात पत्नी सरपंचांबरोबर आलेल्या पती सरपंचाची गर्दी होवू लागल्याने अखेर पती सरपंचाना बाहेर काढण्याची पाळी मंत्रालयातील पोलिस कर्मचाऱ्यांवर आली. त्यामुळे सरपंच परिषदेसाठी आलेल्या सरपंच पतिराजांनी मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावर गोंधळ घातल्याची …

Read More »