Breaking News

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव अवमान याचिकेप्रकरणी मजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशाविरोधात न्यायालयात याचिका दाखल

मुंबईः प्रतिनिधी भाजपाच्या नेत्याने दाखल केलेल्या अवमान याचिकेप्रकरणी सुणावनीसाठी राहुल गांधी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा निर्णय गिरगांव मॅजिस्ट्रेट न्यायालयाने दिल्याने सदरच्या निर्णयाच्या विरोधात आणि दाखल करण्यात करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. भाजपा सदस्य महेश हुकुमचंद श्रीश्रीमल यांनी …

Read More »

चीन बनला जगातील सर्वात श्रीमंत देश, भारतापेक्षा आठपटीने संपत्तीत वाढ संपत्तीबाबत अमेरिकेलाही मागे टाकले

मुंबईः प्रतिनिधी जगातील महासत्ता मानल्या जाणाऱ्या अमेरिकेला मागे टाकत चीन सर्वात श्रीमंत देश बनला आहे. जगभरातील देशांच्या ताळेबंदाचा मागोवा घेणाऱ्या व्यवस्थापन सल्लागार मॅकिन्से अँड कंपनीच्या संशोधन शाखेच्या अहवालानुसार, गेल्या २० वर्षांत जगातील संपत्ती तीन पटीने वाढली आहे. पण या वाढीमध्ये चीनचा वाटा एक तृतीयांश म्हणजे सुमारे ३३ टक्के आहे. म्हणजेच …

Read More »

मलाना क्रिम घेवून बोलल्याने बापूंचे विचार संपतील असा समज असेल तर चूक महात्मा गांधी ही व्यक्ती नाही विचार आहेत आणि हा विचार जगाने स्वीकारलाय-नवाब मलिक

मुंबईः प्रतिनिधी अशी एक महिला दिवसभर मलाना क्रीम घेऊन बसते व बोलते तिच्या बोलण्याने महात्मा गांधी यांचे विचार संपणार नाही. जे प्रचारक आहेत जे अशा लोकांना पुढे करत आहेत त्यांना कळलं पाहिजे की, बापूंचे विचार जगाने स्वीकारले आहेत. त्यामुळे कुणी कितीही प्रयत्न केले तरी यामध्ये यश मिळणार नाही असे राष्ट्रवादी …

Read More »

हिंमत असेल तर केंद्रातील सरकार बरखास्त करुन बॅलेटपेपरवर निवडणुका घ्या भाजपाच्या आव्हानाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे प्रतिआव्हान

मुंबई: प्रतिनिधी महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करुन पुन्हा निवडणुका घ्या या भारतीय जनता पक्षाच्या आव्हानाला काँग्रेसनेही प्रतिआव्हान दिले आहे. भाजपामध्ये हिम्मत असेल तर केंद्रातील सरकार बरखास्त करुन बॅलेटपेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, असे प्रतिआव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. भाजपाचा समाचार घेताना नाना पटोले पुढे म्हणाले …

Read More »

प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतोः महाराष्ट्रात “काय द्याचं” बोला राज्य भाजपाच्या राज्य कार्यकारीणीच्या बैठकीत आघाडी सरकारवर घणाघात

मुंबई: प्रतिनिधी आज महाराष्ट्रावर विश्वासार्हतेचे मोठे संकट आहे. सरकार कुठे आहे, हे विचारण्याची वेळ आली आहे. एक मुख्यमंत्री आहे, त्यांना कुणी मानायला तयार नाही. प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो आणि जनतेचे मात्र हाल होत आहेत. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य नाही तर ‘काय दे‘ चे राज्य आहे. राज्यात सत्ताधाऱ्यांची नुसती वाटमारी चालली …

Read More »

आमदार झिशान सिद्दीकी आणि अध्यक्ष भाई जगताप यांचा वाद पोहोचला सोनिया गांधींच्या कोर्टात राजगृहातील प्रवेशावरून झाली होती वादावादी

मुंबईः विशेष प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी दादर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहातील प्रवेशावरून काँग्रेसचे बांद्र्यातील आमदार झिशान सिद्दीकी आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अशोक भाई जगताप यांच्यात झालेल्या वादावादी झाली. या वादावादीची तक्रार झिशान सिद्दीकी यांनी थेट काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे एक पत्राद्वारे केली. काँग्रेसने काढलेल्या महागाई विरोधातील …

Read More »

सरकारी भारत बाँड ईटीएफमध्ये गुंतवणूकीची संधी, ३ डिसेंबरपासून ईटीएफ खुला भारताचा कोणताही नागरीक करू शकतो यात गुंतवणूक

मुंबईः प्रतिनिधी गुंतवणूकदारांना पुन्हा केंद्र सरकारच्या भारत बाँड ईटीएफमध्ये (एक्सचेंज ट्रेडेड फंड) गुंतवणुकीची संधी मिळणार आहे. भारत बाँड ईटीएफ पुन्हा गुंतवणुकीसाठी खुला होत आहे. त्याचा तिसरा टप्पा ३ डिसेंबरला सुरू होणार आहे. यातून १०,००० कोटी रुपये उभे करण्याचा सरकारचा मानस आहे. ९ डिसेंबर रोजी हा ईटीएफ बंद होईल. भारत बाँड …

Read More »

नवाब मलिकांकडून आर्यन खानप्रकरणातील चॅट आणि कॉल केले उघडः समीर वानखेडे उत्तर द्या क्रुझवर कुणाला चिन्हीत करायचं याबाबतचे केपी गोसावीचे व्हॉटस्ॲप चॅट नवाब मलिक यांनी ट्वीटरवर केले शेअर

मुंबई: प्रतिनिधी केपी गोसावी आणि दिल्लीतील खबरी यांच्यात क्रुझवर कुणाला चिन्हित करायचे याबाबतचे दोघांमधील व्हॉटस्ॲप चॅट ट्वीटरवर शेअर करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली. क्रुझवर काशिफ खान चिन्हीत असताना त्याला का अटक करण्यात आली नाही …

Read More »

लाल गहू मागणारा भारत आज मोदींमुळे साठ सत्तर देशांना कोरोना लस निर्यात करतोय भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची काँग्रेसवर उपरोधिक टीका

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले आहे. सामुहिक बलात्कारासारख्या घटनांचेही या सत्ताधारी आघाडीला काही वाटत नाही, इतके हे सरकार संवेदनाशून्य झाले आहे. भारतीय जनता पार्टी प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करत असून आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र संघर्ष करा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. भाजपा …

Read More »

परदेशी प्रवाशांना दिलासा; भारतात क्वारंटाईनपासून सूट अमेरिका, ब्रिटन, जर्मनीसह ९९ देशातील नागरिकांना सूट मिळणार

मुंबईः प्रतिनिधी भारताने सोमवारी यूएस, यूके, यूएई, कतार, फ्रान्स आणि जर्मनीसह ९९ देशांतील लोकांना देशात प्रवेश करण्याची परवानगी दिली. जर या ९९ देशांतील प्रवाशांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले असेल तर त्यांना यापुढे येथे क्वारंटाईन ठेवण्याची गरज भासणार नाही. भारताने गेल्या वर्षी मार्चमध्ये पर्यटक व्हिसा निलंबित केला होता. त्यानंतर १५ ऑक्टोबरपासून …

Read More »