सातारा : प्रतिनिधी सातारा पालिकेने प्रारूप प्रभाग रचनेचे नकाशे व लोकसंख्या वाढीचा अचूक तपशील जनगणना आयोगाकडून मागविला आहे. त्यामुळे सातारा पालिकेच्या वर्तुळात राजकीय समीकरणांना वेग आला आहे. पालिकेने निवडणूकीच्या दृष्टीने प्रशासकीय तयारी सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांची ऑनलाईन बैठक मंगळवारी झाली. मात्र बैठकीत …
Read More »नारायण राणे यांच्या विरोधात महाड आणि नाशिकमध्ये कोणते गुन्हे दाखलः जाणून घ्या शहर शिवसेनेच्या वतीने महामार्गावर निदर्शने
नाशिक -महाडः प्रतिनिधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर नाशिक आणि महाड येथे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर नेमके कोणते गुन्हे दाखल करण्यात आले ते जाणून घेवूया. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाडमध्ये जन आशीर्वाद यात्रे दरम्यान भाष्य करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह भाषा वापरल्याने महाडमध्ये शिवसैनिकांनी संताप व्यक्त …
Read More »केंद्रीय मंत्री राणे यांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले संगमेश्वर पोलिस ठाण्यात नेले
संगमेश्वरः प्रतिनिधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संदर्भात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संगमेश्वर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर राणे यांना संगमेश्वर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. भाजपाचे आमदार तथा राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांना संगमेश्वरमध्ये प्रवेश करण्यास पोलिसांनी मनाई केली. मात्र त्यांचे दुसरे सुपुत्र निलेश राणे …
Read More »केंद्रीय मंत्री राणे यांना अटक करण्याचा प्रयत्न ही महाविकास आघाडीची सूडबुद्धी केंद्रीय मंत्री राणे यांना अटक करण्याचा प्रयत्न ही महाविकास आघाडीची सूडबुद्धी
मुंबईः प्रतिनिधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याचा प्रयत्न ही सूडबुद्धी आहे, अशी खरमरीत टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केली. नियम ध्यानात घेता राणे केंद्रीय मंत्री असल्याने त्यांना अटक करता येणार नाही, तरीही कोकणात जन आशिर्वाद यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद रोखण्यासाठी राजकीय हेतूने अटक करण्याचे वातावरण निर्माण …
Read More »शेतकरी आंदोलन आणि वाहतूक कोंडीवर न्यायालयाचे केंद्र- उत्तर प्रदेश सरकारला आदेश रस्ता खुल्या करण्याबाबत पर्याय शोधून सांगा
नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी मागील काही महिन्यांपासून केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. मात्र त्यांच्या आंदोलनामुळे रस्त्यात अडथळा निर्माण करण्यात आल्याने येणाऱ्या-जाणाऱ्यां प्रवाशांना अडचण होत आहे. हा प्रश्न सोडविण्याची क्षमता फक्त केंद्र सरकार आणि संबधित राज्य सरकारच्या हातात असून त्या अनुषंगाने तात्काळ पर्याय शोधून …
Read More »कोरोना: महिन्यानंतर ३ हजारावर रूग्णसंख्या तर अनेक जिल्ह्यात ० मृत्यूची नोंद नवे बाधित ३ हजार ६४३, ६ हजार ७९५ बरे झाले तर १०५ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी मागील महिनाभरापासून ४ ते ६ हजारा दरम्यान राज्यात असलेली कोरोना बाधितांची संख्या आज ४ हजाराच्या खाली इतक्या निचांकी पातळीवर नोंदविली गेली आहे. दिवसभरात ३ हजार ६४३ इतके नवे रूग्ण राज्यात आढळून आले आहेत. तर २४ तासात ६ हजार ७९५ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण ६२ …
Read More »जनतेच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी आणि योजना पोहोचविण्यासाठी जन आर्शिवाद यात्रा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन
रायगड: प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या ७ वर्षांत अनेक लोकोपयोगी योजना आखल्या आहेत. या योजना सामान्य माणसापर्यंत पोहचवून आणखी चांगले काम करण्यासाठी जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आल्या, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केले. पाली (जि. रायगड ) येथे केंद्रीय मंत्री नारायण …
Read More »राज्य सरकार देणार उद्योगांना व्याजमाफी पण या गोष्टीसाठी उद्योग विभागाची 'विशेष अभय योजना'; बंद उद्योगांनी शासकीय देणी भरल्यास व्याजमाफी
मुंबई : प्रतिनिधी पुनरुज्जीवनक्षम नसलेल्या व बंद उद्योग घटकांकडील शासकीय देणी थकीत असल्यास, त्या थकीत देणीची मुद्दल रक्कम घटकाने एकरकमी भरल्यास त्यावरील व्याज व दंडनीय रक्कम माफ करून, त्या उद्योग घटकाची स्थिर मालमत्ता अन्य उद्योग घटकाकडे हस्तांतरीत करण्यास विशेष अभय योजनेद्वारे मान्यता देण्यात आली आहे. लाभासाठी निकष एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी बंद …
Read More »ग्रामीण महाराष्ट्रासाठी खुशखबर : बंद करण्यात आलेलेल्या या गोष्टी पुन्हा सुरु होणार राज्यात कला केंद्र, आठवडे बाजार आणि यात्रा लवकर सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक-सांस्कृतिक कार्य मंत्री
मुंबई: प्रतिनिधी मागील दिड वर्षापासून राज्याच्या ग्रामीण भागातील आठवडी बाजार, कला केंद्रे, यात्रा आदी गोष्टी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेले आहेत. मात्र शहरी भागात सध्या काही निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. त्या धर्तीवर या बंद करण्यात आलेल्या गोष्टी पुन्हा सुरु करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून यासंदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता …
Read More »कोरोनामुळे अखेर उत्सवात दहीहंडी न फोडताच राहणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दहीहंडी पथकांना आवाहन
मुंबई : प्रतिनिधी काही काळासाठी आपले सणवार, उत्सव बाजूला ठेऊन जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले हा संदेश आपण सर्वमिळून जगाला देऊया, संयम आणि धीराने आधी कोरोनाला हद्दपार करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करत दहिहंडी उत्सव साजरा करण्यास यंदाही परवानगी नाकारली.. शासनाचे प्रथम प्राधान्य हे जनतेचे प्राण वाचवण्याला असल्याचे …
Read More »
Marathi e-Batmya