Breaking News

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, पूरग्रस्तांना केंद्राकडून मदत मिळेल नागरिकांना तातडीने शासकीय मदत देण्याचे निर्देश

अतिवृष्टीमुळे चिपळूण शहरावर संकट कोसळले, मात्र प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त प्रत्येक नागरिकाला शासकीय मदत तातडीने देण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी गुहागर येथील आरजीपीपीएल गेस्ट हाऊस येथे झालेल्या आढावा बैठकीत दिल्या. चिपळूण येथील पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता राज्यपाल कोश्यारी चिपळूण दौऱ्यावर आले होते, त्यावेळी …

Read More »

मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुषखबर ! विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण सारथी संस्थेचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी मराठा,कुणबी, कुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी पदांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे मार्फत प्रायोजित केले आहे. विद्यार्थ्यांना दरमाह ८००० रूपये विद्यावेतन आणि प्रशिक्षणाचे संपुर्ण शुल्क सारथी संस्थेमार्फत देण्यात येणार असून, प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची अंतीम …

Read More »

पश्चिम बंगालप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही पेगॅसस प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी राज्यातील २०१७ सालचे फोन टॅपिंग व पेगॅसस हेरगिरीचा संबंध आहे का ?-नाना पटोले

मुंबईः प्रतिनिधी पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून देशातील महत्वाचे राजकीय नेते, पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन हॅक करण्यात आले आहेत. या लोकांवर हॅकिंगच्या माध्यमातून पाळत ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाच्या चौकशी आदेश अद्याप दिले नसले तरी पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने या हेरगिरी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक …

Read More »

पूरग्रस्त भागातील दौऱ्यावरून शरद पवारांचा नेमका कोणाला टोला ? पूरग्रस्तभागात ग्राऊंडवर काम करणाऱ्यांचे लक्ष विचलित होईल असे इतरांनी दौरे करु नयेत - शरद पवार

मुंबई: प्रतिनिधी राज्यात एखादी आपत्ती आल्यानंतर त्या भागात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांचे दौरे लोकांना धीर देण्यासाठी उपयुक्त ठरत असतात. ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी दौरे करुन लोकांना दिलासा देण्यासाठी लक्ष घालणे योग्य ठरते. आता स्थानिक प्रशासन, तेथील संघटना आणि कार्यकर्ते पुनर्वसनाच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे इतर लोकांनी पूरग्रस्त …

Read More »

कर्जबुडव्या कारखान्यांना पायघड्या, संकटग्रस्त सामान्यांची उपेक्षा! भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबईः प्रतिनिधी सहकारी साखर कारखान्यांनी व अन्य सहकारी संस्थांनी थकविलेली ३८०० कोटींची देणी सरकारी तिजोरीतून देण्याची तत्परता दाखविण्यासाठी समिती नेमणा-या ठाकरे सरकारने पूरग्रस्त भागातील जनतेच्या भावनांची कुचेष्टा केली असून संकटग्रस्त जनतेच्या हितापेक्षा कर्जबुडव्यांबद्दल कळवळा दाखविणारे ठाकरे सरकार ढोंगी आहे. कर्जबुडव्या बड्या धेंडांसाठी पायघड्या घालत सामान्य संकटग्रस्तांसमोर आर्थिक अडचणीचे पाढे वाचणाऱ्या …

Read More »

अत्याचार पिडित आणि वाट चुकलेल्या बालगृहातील मुलांनी मिळविले लक्षणीय यश बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील-महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई : प्रतिनिधी बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या विकल अवस्थेत तिला बालगृहात आणण्यात आले. खरे तर सगळेच संपलेय अशी तिची अवस्था.. मात्र या अवस्थेवर, यातनावर मात करीत तिने आज भरारी घेतली. दहावीच्या शालांत परीक्षेत तिने चक्क ९७ टक्के गुण मिळवले, या यशाचे महिला आणि बालविकास मंत्री ॲड. …

Read More »

पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादीचे आमदार, खासदार दोन महिन्याचे वेतन देणार सरकारी कर्मचाऱ्यांनीही एक-दोन दिवसाचे वेतन द्यावे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आवाहन

सांगली: प्रतिनिधी अतिवृष्टीचा फटका नऊ जिल्ह्यांना बसला असल्याने या भागातील नुकसान भरपाईसाठी मोठ्या प्रमाणावर महामदतीची गरज आहे. त्यासाठी आर्थिक निधीची तरतूद करावी लागणार आहे. यापार्श्वभूमीवर पूरग्रस्तांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, खासदार हे आपले दोन महिन्याचा पगार देणार असल्याची घोषणा करत राज्य सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांनीही आपले एक-दोन दिवसाचे वेतन पूरग्रस्तांसाठी द्यावे असे …

Read More »

भाजपा, शिवसेना आणि सपाचे हे आमदार घेतात नगरसेवक पदाचाही पगार आमदार पराग शाह, रईस शेख, दिलीप लांडे यांची नावे माहिती अधिकारात उघडकीस

मुंबईः प्रतिनिधी राज्यघटनेतील लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतूदीनुसार एखादा राजकिय व्यक्ती एका सभागृहाचा सदस्य असेल आणि निवडणूकीत तो पुन्हा विजयी होवून दुसऱ्या एका सभागृहाचा सदस्य म्हणून निवडूण आला असेल तर दोन्हीपैकी एका सभागृह सदस्यत्वाचा सहा महिन्याच्या आत राजीनामा द्यावा आणि एकाच सभागृहातील सदस्यत्वाचे मानधन घ्यावे. मात्र या तरतूदीचा विसर भाजपा, शिवसेना आणि …

Read More »

…आणि मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा राहिला अर्धवट खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कोयनेत उतरू शकले नाही

मुंबई : प्रतिनिधी मागील दोन दिवस कोकणातील चिपळूण, महा़ड येथील आलेला पुर आणि अतिवृष्टीमुळे दरड कोसळलेल्या ठिकाणांची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज सातारातील पूर आणि दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांची पाहणी करण्यासाठी हेलिकॉप्टरने निघाले. मात्र सातारा आणि परिसरात हवामान खराब असल्याने त्यांना साताऱ्यात उतरता आले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पुन्हा …

Read More »

तिजोरीत खडखडाट ? पूर- दरडबाधितांच्या मदतीकरीता फक्त २० कोटींचा निधी नुकसान भरपाईसाठी निधी कोठून आणायचा वित्त विभागाला पडला प्रश्न

मुंबईः विशेष प्रतिनिधी आधीच कोरोनामुळे बेजार झालेल्या महाविकास आघाडीला आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच आता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीचे पुन्हा संकट आले असल्याने या आपत्तीला पैसा कोठून उभा करायचा असा प्रश्न वित्त विभागाला पडला असून तिजोरीत फारसा पैसा नसल्याने सध्या बाधित जिल्ह्यांच्या मदतीकरीता फक्त २० कोटी …

Read More »