Breaking News

या बँकाकडून होम लोनवर मिळवा १२ ईएमआयची सूट अॅक्सिस बँक- इंडसइंड बँकेची आकर्षक ऑफर

मुंबई: प्रतिनिधी देशातील दोन आघाडीच्या खाजगी बँका अॅक्सिस बँक आणि इंडसइंड बँकेने सणापूर्वी दोन मोठ्या ऑफर्स आणल्या आहेत. या ऑफर्समध्ये अॅक्सिस बँक गृह कर्जावर १२ मासिक हप्त्यांची (ईएमआय) सूट देणार आहे. म्हणजे कर्जदाराचे १२ ईएमआय माफ होणार आहेत. इंडसइंड बँकेनेही आकर्षक ऑफर दिली आहे. बँकेने आपल्या ऑफरमध्ये डेबिट कार्डवर खरेदी …

Read More »

गृहकर्जासोबतच घ्या घराचा विमा, नुकसानीपासून वाचण्यासाठी आवश्यक या गोष्टी करा घराच्या विम्यासाठी

मुंबई: प्रतिनिधी आपलं हक्काचं घर असावे असे प्रत्येकाचं स्वप्न असते. खऱेदी केलेल्या घरात आपली भावनिक गुंतवणूक असते. आपले घर नेहमी सुरक्षित असावे, नैसर्गिक आपत्ती, आग आदी घटनांमध्ये आपल्या घराचे नुकसान होऊ नये असे प्रत्येकालाच वाटते. त्यामुळे अशा नुकसानीपासून वाचण्यासाठी गृहकर्ज घेताना विमा घेणे अत्यावश्यक आहे. गृह विमा असल्यास आपल्या घराच्या नुकसानीची …

Read More »

केंद्रीय कृषीमंत्री तोमरजी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भरपाई द्यायचीय विम्याचे पैसे द्या कृषीमंत्री दादाजी भुसे यांची केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी राज्यात जुलै-२०२१ मध्ये पावसाने दिलेली ओढ आणि सप्टेंबर-ऑक्टोबर -२०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात नुकसान झाले.  शेतकऱ्यांना वेळेवर नुकसान भरपाई मिळण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा ९०० कोटी रुपयांचा केंद्राचा हिस्सा लवकरात लवकर द्यावा. जेणेकरुन शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देणे शक्य होईल, अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह …

Read More »

केंद्राच्या आणि रखडलेल्या एसआरए प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झाला हा निर्णय केंद्र शासनाच्या जमिनीवरील मुंबईतील प्रकल्पांचा आढावा

मुंबई : प्रतिनिधी शहरातील विविध भागात असलेल्या केंद्र सरकारच्या मालकीच्या जमिनीवर वसलेल्या झोपडपट्ट्यांच्या पुर्नवसन प्रकल्पाबाबत आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र राज्य सरकारच्या मालकीच्या अर्थात महसूली आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मालकीच्या जमिनीवरील झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्पांबाबत मात्र गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सादर केलेल्या प्रस्तावातील सूचनांना मुख्यमंत्र्यानी …

Read More »

विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम राबविणारः शिक्षकांना मिळणार खास प्रशिक्षण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई: प्रतिनिधी कोविडच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवस महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने सुरू होती, आता ऑफलाइन पद्धतीने महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत. कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले विद्यार्थी ऑफलाईन उपस्थित राहू शकणार आहेत. त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत …

Read More »

मुख्यमंत्र्यांचे निर्देश, “कोणाच्याही दबावात न येता अनधिकृत बांधकामे रोखा” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिकेस स्पष्ट निर्देश

मुंबई : प्रतिनिधी अनधिकृत बांधकामांवर मुंबई पालिकेने युद्ध पातळीवर तातडीने कारवाई करावी, यामध्ये कोणाचाही दबाव सहन करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या बैठकीत सूचना दिल्या. पूर्व आणि पश्चिम महामार्गालगत देखील मोठ्या प्रमाणावर डेब्रिज टाकल्या जातात असे निदर्शनास आले आहे, याठिकाणी कॅमेरे …

Read More »

भाजपा, एनसीबी आणि काही गुन्हेगार मिळून या मुंबईत दहशत माजवतायत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी भाजपा, एनसीबी आणि काही गुन्हेगार मिळून या मुंबईत दहशत माजवत असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. दरम्यान महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी याचा वापर कसा केला जातोय याचे पुरावे पुढच्या आठवड्यात देणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. इलेक्ट्रॉनिक पुराव्यावर …

Read More »

एनसीबी म्हणते आर्यन खान प्रभावशाली, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला उच्च न्यायालयात दाद मागणार

मुंबईः प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान हा प्रभावशाली असल्याने त्याचा जामिन अर्ज मंजूर करू नका अशी मागणी एनसीबीच्यावतीने विशेष न्यायालयात युक्तीवाद करण्यात आला. त्यामुळे विशेष दिवाणी न्यायालयाने आर्यन खान याची जामिन अर्ज याचिका फेटाळून लावत असल्याचा निकाल दिला. आर्यन खान याला अटक केल्यानंतर त्याला एनसीबीने किल्ला …

Read More »

विमान प्रवाशांची संख्या वाढतेय, गतवर्षीच्या तुलनेत ७९ टक्क्याने वाढ सप्टेंबरमध्ये देशात ७०.६६ लाख प्रवाशांचा हवाई प्रवास

मुंबईः प्रतिनिधी कोरोनाचा उद्रेक कमी होताच विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. सप्टेंबरमध्ये देशात सुमारे ७०.६६ लाख प्रवाशांनी हवाई प्रवास केला. सप्टेंबर २०२० च्या तुलनेत ही आकडेवारी ७९ टक्के अधिक आहे. मागील वर्षीच्या सप्टेंबरमध्ये ३९.४३ लोकांनी हवाई प्रवास केला होता. नागरी उड्डान महासंचालनालयाने (डीजीसीए) ही आकडेवारी जाहीर केली …

Read More »

गुंतवणूकदारांना कमाईची संधी, आयपीओसाठी सेबीकडून ६ कंपन्यांना परवानगी १९ हजार कोटींच्या उभारणीसाठी बाजारात

मुंबई: प्रतिनिधी गुंतवणूकदारांना आता शेअर बाजारात आणखी कमावण्याची संधी मिळणार आहे. काही दिवसातच अनेक कंपन्या आपला आयपीओ आणणार आहेत. शेअर बाजार नियामक सेबीने ६ कंपन्यांना आयपीओ आणण्यास मान्यता दिली आहे. आयपीओद्वारे या कंपन्या १९ हजार कोटी रुपये उभारणार आहेत. यासह आणखी ५२ कंपन्या आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत. आयपीओ आणण्यास सेबीने …

Read More »