Breaking News

कोरोना : ४५ हजारापार मृत्यू संख्या मात्र अॅक्टीव्ह रूग्ण संख्या १ लाखापेक्षा कमी ३ हजार ९५९ नवे बाधित, ६ हजार ७५९ बरे झाले तर १५० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील मार्च ते आज ७ नोव्हेंबर अखेर राज्यात कोरोनामुळे तब्बल ४५ हजार ११५ मृत्यू झाले आहेत. मात्र दररोज बरे होवून घरी जाणाऱ्यांचे प्रमाण दुपटीने आहे. मागील २४ तासात ३ हजार ९५९ नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १७ लाख १४ हजार २७३ वर पोहोचली तर …

Read More »

आरेच्या जागेचा व्यावसायिक उपयोग करण्याचाच फडणवीस सरकारचा डाव होता आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड प्रकल्प २० हेक्टरऐवजी ६१ हेक्टर जागेत का केला जात होता? भाजपाला सवाल

मुंबई : प्रतिनिधी मेट्रो कार शेडसाठी आरेची जागा ही फडणवीस सरकारने केवळ व्यावसायिक दृष्टीकोनातूनच निवडली होती. कांजूरमार्ग जागेचा प्रस्ताव जाणीवपूर्वक बारगळू दिला. कांजूरमार्गची जागा घेण्याकरीता खाजगी व्यक्तीला पाच हजार कोटी रुपये द्यावे लागतील हा खोटारडेपणा केला गेला हे आता सिद्ध झालेले आहे. आरे कॉलनीतील मेट्रो प्रकल्प २० हेक्टरमध्ये करणे बंधनकारक …

Read More »

शेलार म्हणाले, सचिन सावंत यांनी वेडेपणात सत्य उघड केल्यामुळे त्यांचे आभार! आरेतील भूखंडाचा श्रीखंड खाण्याचा काँग्रेसचा डाव भाजपानेच हाणून पाडला !

मुंबई: प्रतिनिधी आरेच्या जागेचा व्यावसायिक वापर करावा, असा निर्णय तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला होता, मात्र फडणवीस सरकारने आरेच्या जागेची अंतिम अधिसूचना प्रकाशित करताना आरेच्या जागेच्या व्यावसायिक वापराचा निर्णय रद्द केला. काँग्रेसचा भूखंड खाण्याचा सराईत डाव भाजपाने त्यावेळी हाणून पाडला होता. हे सत्य वेडेपणात, माध्यमातून चमकायच्या नादात सचिन सावंत …

Read More »

दिपावलीचा सण पुढच्या आठवड्यापासून, पण सरकारचे हे नियम पाळायचेत राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : प्रतिनिधी पारंपारीक दिवाळी सण पुढच्या आठवड्यापासून सुरु होत असून या सणामध्ये जनतेने एकत्रित येवून हा सण साजरा करण्याचे टाळावे असे आवाहन करत फटाके विरहीत सण साजरा करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. तसेच दिवाळीच्या कार्यकाळात पहाट गाणी सारखे कार्यक्रम आयोजित न करण्याचे आवाहनही राज्य सरकारने नुकतेच एका निर्देशाद्वारे सर्वांना …

Read More »

भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला लागले म्हाडाचे वेध, जोडीला राष्ट्रवादीची शिफारस झोपडपट्टी सुधार मंडळाच्या मुख्याधिकारी पदी नियुक्तीसाठी लॉबींग

मुंबई : विशेष प्रतिनिधी साधारणत: दोन वर्षापूर्वी महसूल विभागातील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना आणि सहकार विभागातील समकक्ष अधिकाऱ्यांना आयएएस पदावर प्रमोशन मिळवून देण्याप्रकरणी मुंबई विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका अधिकाऱ्याला म्हाडात येण्याचे वेध लागले आहेत. विशेष म्हणजे त्या पदावर सदर अधिकाऱ्याला नियुक्ती मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिफारस पत्र …

Read More »

पोलिसांच्या ‘फोर्स वन’ ला या तीन पध्दतीने प्रोत्साहन भत्ता मिळणार त्यांच्या आयुष्याची काळजी घेऊ - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी विघातक हल्ल्यांना परतवून लावण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पोलिसांच्या ‘फोर्स वन’ मधील शूर जवान, अधिकारी, कर्मचारी यांना सहाव्या वेतन आयोग काळातील दरानेच प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. बैठकीस गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री ॲड अनिल परब उपस्थित होते. वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीस मुख्य …

Read More »

कोरोना: सलग २ ऱ्या दिवशी बाधित बरे होत दुपटीने घरी ५ हजार २७ नवे बाधित, ११ हजार ६० बरे झाले तर १६१ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी आज सलग दुसऱ्या दिवशी बरे होवून होवून बाधित घरी गेले. काल गुरूवारी ११ हजार आणि आजही ११ हजार ६० रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १५ लाख ६२ हजार ३४२ वर पोहोचली आहे. तर ५ हजार २७ नव्या बाधित आढळून आल्याने एकूण रूग्ण संख्या १७ हजार १० हजार …

Read More »

कोविड काळात परदेशी विद्यापीठात या पध्दतीने शिक्षण घेणाऱ्यांना मिळणार शिष्यवृत्ती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी जागतिक पातळीवर १ ते ३०० रँकिंगच्या विद्यापीठात उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्तीचा लाभ आता ऑनलाईन किंवा कॅम्पस पद्धतीने शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे हित …

Read More »

२३ नोव्हेंबर नंतर नववी – बारावीचे वर्ग सुरू मात्र उद्यापासून दिवाळी सुट्टी शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने अनलॉकनंतर वाहतुक, प्रवास व्यवस्था, नाट्यगृहे, सिनेमागृह, बाजारपेठा सुरळीतपणे सुरू केलेल्या आहेत. याच पार्श्‍वभूमीवर माध्यमिक शाळेतील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा मानस असल्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे बंद असले तरी शिक्षण ऑनलाईन सुरु आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहूनच २३ नोव्हेंबर …

Read More »

पाच हजार कोटी रुपये द्यावी लागण्याची फडणवीसांची माहिती खोटी भाजपाच्या दाव्याची काँग्रेसकडून पोलखोल

मुंबईः प्रतिनिधी भाजपा आणि फडणवीस सरकारने मेट्रोच्या आरे कार डेपो संदर्भात मंबईकरांची घोर फसवणूक केली आहे. ज्या पद्धतीने जाणीवपूर्वक फडणवीस सरकार मुंबईकरांशी खोटे बोलत राहिले तो प्रकार भयंकर आणि अत्यंत घृणास्पद आहे. मेट्रोचा कार शेड कांजूरमार्गला करण्याचा प्लॅन फडणवीस सरकारचाच होता. ही जागा राज्य सरकारचीच असून त्या जागेवरून कोणताही वाद …

Read More »