पुणे : प्रतिनिधी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घरोघरी सर्वेक्षणावर भर द्यायला हवा. बाधित रुग्णांवर जलदगतीने उपचार मिळवून द्यायला हवेत. त्याचबरोबर बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध प्रभावीपणे घ्यायला हवा. कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी जनजागृतीवर भर द्यावा. कोरोनाचा फैलाव रोखण्यात नागरिकांचा सहभागही महत्वाचा आहे. बरेच नागरिक मास्क शिवाय फिरताना दिसतात, ही गंभीर बाब आहे. मास्क …
Read More »विद्यार्थ्यांना दिलासा : सीईटी परिक्षेच्या अर्ज प्रक्रियेस दोन दिवसांची मुदतवाढ राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी सामाईक प्रवेश परिक्षेच्या अर्ज प्रक्रियेस दोन दिवसांची मुदतवाढ मिळाली असून ०८ सप्टेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. ज्यांना अर्ज सादर करता आले नाही, त्यांच्यासाठी मोठी सोय होणार असून हजारो विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी उच्च …
Read More »केंद्रिय मंत्री आठवलेंची मागणी, शरद पवारांना काँग्रेसचे अध्यक्ष करा सूचनेचा निर्णय काँग्रेस आणि शरद पवारांना घेण्याची विनंती
मुंबई : प्रतिनिधी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्यास सध्या राहुल गांधी तयार नाहीत. सोनिया गांधीही अध्यक्षपद सांभाळण्यास तयार नाहीत. काँग्रेसला अजून अध्यक्ष सापडत नाही. त्यामुळे माझी काँग्रेसला सूचना आहे की त्यांनी मूळ काँग्रेसचे असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काँग्रेसचे अध्यक्ष करावे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन करून …
Read More »परीक्षा घेण्याचा शिक्षण मंत्र्यांचा निर्णय म्हणजे ‘चटावरचे श्राद्ध’ उरकण्यासारखे भाजपा आ. अतुल भातखळकर यांची टीका
मुंबई: प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे परीक्षा घेण्याचा निर्णय ठाकरे सरकारने ना इलाजाने घेतला. परंतु परीक्षा अहवालातील शिफारसींबाबत कुलगुरूंना अनभिज्ञ ठेवण्यात आले व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही युवराजांचा अहंकार जपण्यासाठी थातुरमातुर परीक्षा घेण्याचे नाटक केले जात आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे …
Read More »…आणि मनसे धावली शिवसेनेच्या मदतीला कंगनाच्या वक्तव्याला ५ टक्क्याचीही किंमत नाही- संदिप देशपांडे
मुंबई : विशेष प्रतिनिधी देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या मुंबई शहराबद्दल बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानावत हिने असंबध्द वक्तव्य करत प्रसिध्दीचा झोत कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या वक्तव्याला ५ टक्क्याचीही किंमत नसताना तिने लावलेल्या जाळ्यात अडकायला शिवसेना इतकी निर्बुध्द नसल्याचे वक्तव्य मनसे नेते संदिप देशपांडे यांनी करत शिवसेनेला …
Read More »जिप शाळेचा शिक्षक २०० देशातील विद्यार्थ्यांबरोबर करतोय शैक्षणिक देवाण घेवाण अहमदनगर आणि मुंबईतील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
नवी दिल्ली : प्रतिनिधी अहमदनगर जिल्ह्यातील गोपाळवाडी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नारायण मंगलाराम आणि मुंबई येथील भाभा अणुशक्तीकेंद्र शाळेच्या शिक्षिका संगीता सोहनी यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त कोवीड19 च्या पार्श्वभूमीवर दूरदृष्य प्रणालीद्वारे ‘राष्ट्रीय …
Read More »कोरोना: बाधित रूग्णांची नवी सर्वोच्च संख्या, आटोक्यात आलेल्या ठिकाणी पुन्हा वाढ १९ हजार २१८ नवे बाधित, १३ हजार २८९ बरे झाले तर ३७८ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी गणेशोत्सव काळात राज्य सरकारने अनेक ठिकाणी नियमात सूट दिल्याने अनेक ठिकाणी नागरिकांकडून शाररीक अंतर, मास्क वापरणे आदी गोष्टींना तिलांजली दिली. त्यामुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येत असून काल १८ हजार बाधित रूग्ण आढळून आल्यानंतर आज तब्बल १९ हजार २१८ नवे बाधित रूग्ण आढळून आले. ही संख्या …
Read More »बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात मुख्यमंत्र्यांनी घातले लक्ष दिले हे आदेश अडचणी तात्काळ दूर करून कालबद्ध रीतीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले
मुंबई: प्रतिनिधी वरळी, एन एम जोशी मार्ग आणि नायगाव येथील बीडीडी चाळींचा रखडलेला पुनर्विकास वेगाने व्हावा यादृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा येथे झालेल्या एका बैठकीत निर्देश दिले असून वरळी येथे बीडीडी चाळीत ९६०० भाडेकरू असून त्यांची आवश्यक ती पात्रता आणि कागदपत्रे तपासण्यासाठी तातडीने त्या ठिकाणी विशेष शिबीर आयोजित करून विशिष्ट कालमर्यादेत हे …
Read More »अधिवेशनाच्या तोंडावर विधानसभाध्यक्षच कोरोना पॉझिटीव्ह नाना पटोले यांनी ट्विट करत दिली माहिती
नागपूर-मुंबई : प्रतिनिधी दोन दिवसांनंतर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनासाठी मुख्यमंत्र्यांपासून ते आमदार, आमदाराचे पीएपर्यंत कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह असलेल्यांनाच विधिमंडळात प्रवेश देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. मात्र आता दस्तुरखुद्द विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले हे च कोरोना पॉझिटीव्ह झाल्याने त्या्ंच्या उपस्थितीशिवाय पावसाळी अधिवेशन होणार का? असा प्रश्न …
Read More »कंगनाच्या वक्तव्यापासून भाजपाचे एक पाऊल मागे राम कदमांच्या चुकीची सारवासारव करण्यासाठी भाजपा नेते आशीष शेलार पुढे
मुंबई : प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानावत हीने शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर धमकी दिल्याचा आरोप करत मुंबई म्हणजे पाकव्याप्त कश्मीर झाल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याला राजकिय पाठबळ देण्यासाठी भाजपाचे आमदार राम कदम यांनी पुढाकार घेत तीचे वक्तव्य स्वत:च्या ट्विटवर रिट्विट करत समर्थन देण्याचा प्रयत्न केला. परंतु सोशल …
Read More »
Marathi e-Batmya