Breaking News

रेडझोनमधील योध्दा कोरोनावर मात करून परतला माजी मंत्री चंद्रकांत हंडोरेंनी केली कोरोनावर मात

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या संसर्गामुळे सामान्य जनतेसह मंत्री माजी मंत्रीही त्रस्त झाले असतानाच राज्याचे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे नुकतेच या संकटावर यशस्वीरित्या मात करून बाहेर आले असून रेड झोनमध्ये असलेल्या या नेत्याच्या परतीचे चेंबरमध्ये काल उत्स्फूर्त पणे स्वागत करण्यात आले. महाराष्ट्रात व विशेषतःदाटीवाटीचा भाग असलेल्या मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत …

Read More »

राज्य सरकारकडूनही तीन टप्प्यातील अनलॉक जाहीर : ३ जूनपासून सुरू होणार मुंबई-पुणेतील परिस्थिती लक्षात घेवून केंद्राचे नियम बदलले

मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने काल तीन टप्प्यातील अनलॉकची मार्गदर्शक तत्वे जाहीर केल्यानंतर आज राज्य सरकारकडूनही अनलॉकबाबतची नियमावली जाहीर केली. त्यानुसार केंद्राने जाहीर केल्याप्रमाणे रात्रो ९ ते पहाटे ५ पर्यत कर्फ्यु कायम राहणार आहे. मात्र मुंबई, पुणे येथील वाढती चिंताजनक परिस्थिती पाहता केंद्रांच्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. केंद्राने जारी …

Read More »

राज्यातील सर्व कार्यालये सुरु होणार पण या नियमांचे पालन करायचेय आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर

मुंबई: विशेष प्रतिनिधी दोन महिन्याच्या दिर्घ लॉकडाऊनची सुट्टीचा आनंद घेतल्यानंतर राज्यातील सर्व शासकिय, निमशासकिय, महानगरपालिका, नगरपालिका, हॉस्पीटल्सची कार्यालये आणि जिल्हाधिकारी कार्यालये टप्याटप्याने सुरु करण्यात येणार आहेत. ही कार्यालये जरी सुरु होणार असली त्यासाठी आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक जारी करण्यात आली असून त्या अनुषंगाने कार्यालयाचे कामकाज आणि कार्यपध्दतीचा अवलंब करणे बंधनकारक करण्यात …

Read More »

राज्यात तीन हजारच्या जवळपास रूग्ण तर ९९ जणांचा मृत्यू अॅक्टीव्ह रूग्ण ३४ हजार ८८१ तर एकूण संख्या ६५ हजारावर

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाग्रस्त २ हजार ९४० नव्या रूग्णांचे निदान झाले असून ९९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १ हजार ८४ रूग्ण बरे होवून घरी गेले असून घरी जाणाऱ्यांची संख्या २८ हजारावर पोहोचली असून राज्यातील एकूण रूग्णांची संख्या ६५ हजार १६८ वर पोहोचली आहे. तर मृतकांच्या संख्येने आतापर्यंत २१०० …

Read More »

तीन टप्प्यातील या सवलतींसह ३० जून पर्यत ५ वा लॉकडाऊन केंद्र सरकारकडून अध्यादेश जारी

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सलग लागू करण्यात आलेल्या ४ थ्या लॉकडाऊनची मुदत उद्या संपत असून त्यास आता थेट एक महिन्याचा ५ वा लॉकडाऊन लागू करण्यात येत असल्याची घोषणा केंद्र सरकारने आज संध्याकाळी एका अध्यादेशान्वये जारी केला. मात्र या ५ व्या लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत. सवलती ८ जून पासून …

Read More »

बहुजन आघाडीला झाली अखेर वंचितांची आठवण झोपडपट्यांमध्ये ? अन्नधान्याची मदत

मुंबई : प्रतिनिधी मागील दोन महिने राज्यात लॉकडाऊन लागू असताना अनेक गरिब, गरजू, स्थलांतरीत कामगार, राज्यातील परजिल्ह्यातील कामगारांनावर खऱ्या अर्थाने वंचित म्हणून जगण्याची वेळ आली होती. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते कार्यकर्त्ये दिसत नव्हते. अखेर लॉकडाऊनचा ४ था टप्पा संपत आल्यानंतर अन्न धान्याची वाटप करण्याचे काम सुरु केले. धारावी पाठोपाठ …

Read More »

काँग्रेसच्या सचिन सावंतांचे भाजप नेत्यांना खुल्या चर्चेसाठी आव्हान मोदीजींच्या जन्माआधीपासूनच रेल्वे सबसिडीमध्ये चालते, कोविडसाठी काय दिले? सवाल

मुंबई: प्रतिनिधी स्थलांतरीत मजुरांच्या रेल्वे भाड्यातील सवलतीचा भाजपचा दावा खोटा ठरला असतानाही भाजपचे नेते ते मान्य करायला तयार नाहीत. सर्वोच्च न्यायालयात सॉलिसीटर जनरल तुषार मेहतांनीच त्यांचा हा खोटारडेपणा उघड करुनही त्यांची वृत्ती ‘गिरे तो भी टांग उपर’ अशीच दिसते. आपला खोटेपणा उघड पडला की वैयक्तिक पातळीवर घसरण्याची भाजपाची खोड जुनीच …

Read More »

मुंबईतल्या कोरोनाबाधितांसाठी ८ हजार खाटा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत खाटा उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. येत्या आठवडाभरात सुमारे ८ हजारांहून अधिक खाटा उपलब्ध होणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. गोरेगाव, महालक्ष्मी, मुलुंड, दहीसर, भायखळा येथे कोविड सेंटर उभारणीचे काम अंतिम टप्यात आले आहे. येत्या एक ते दोन दिवसात गोरेगांव …

Read More »

विद्यापीठस्तरावरच्या परिक्षा घ्या, मात्र आधी पर्याय तपासा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका काँलेज-महाविद्यालयीनस्तरावरील तरूणांना बसायला नको म्हणून विद्यापीठस्तरावरील परिक्षा सुरुवातीला पुढे ढकलण्याचा आणि नंतर रद्द करण्याची परवानगी राज्य सरकारने विद्यापीठ नियोजन आयोगाकडे मागितली. मात्र आता या विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विद्यापाठांना देत मात्र कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची खबरदारी घेण्याचे …

Read More »

दानवे-जाधव, राजकारणामुळे कौटुंबिक सौख्य हरविलेल्या घराण्यात आणखी एकाची वाढ राज्यातील प्रतिष्ठित राजकिय घराण्यांमध्ये सारेच काही आलबेल नाही

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात अनेक तालेवार राजकारण्यांची घराणी आहेत. त्यापैकी काही सुसंस्कृत तर काही इरसाल घराणी म्हणून ओळखली जातात. मात्र राजकिय महत्वकांक्षेने कुटुंबात वाद निर्माण झाला आणि त्याची परिणती राजकिय तर कधी वैयक्तिक स्तरावर झाल्याचे चित्र आपल्याला काही ठिकाणी पाह्यला मिळाली. त्यात आता रावसाहेब दानवे आणि हर्षवर्धन जाधव या …

Read More »