मुंबई: विशेष प्रतिनिधी साधारणत: दोन महिन्यापूर्वी अर्थात ९ मार्चला राज्यात पहिल्यांदा कोरोनाचे ४ रूग्ण आढळून आले होते. तेव्हापासून सातत्याने या संकेत वाढ असून आज दोन महिने पूर्ण होण्याच्या अर्थात ९ मे या दिवशी राज्याने २० हजार रूग्ण संख्येचा टप्पा पार पाडत २०,२२८ वर संख्या पोहोचली आहे. तसेच राज्यातील सर्वाधिक मृत्यूही …
Read More »सोलापूरने केला २०० चा टप्पा पार २१६ वर संख्या पोहोचली, मृतकांची संख्या १४ वर
सोलापूर: प्रतिनिधी शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने आज २०० चा टप्पा पार केला असून २१६ वर ही संख्या पोहोचली. आज २० रूग्णांची भर पाडली. आतापर्यंत मृतकांच्या संख्येतही वाढ झाली असून ही संख्या १४ वर पोहोचली. शहरातील शास्त्री नगरमध्ये ६, कुमठा नाका २, नई जिंदगी १, अशोक चौक १, एकता नगर २, निलम …
Read More »अडकलेले नागरिक, विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी मोफत एसटी पाठवतोय : मात्र या गोष्टी करा अर्ज भरून सादर करा: सोमवारपासून मिळणार सेवा: सतेज बंटी पाटील
मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या विविध भागात लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना त्यांच्या मुळ घरी सोडण्याटसाठी एसटी महामंडळाकडून सोमवारपासून मोफत बस सेवा सुरु करण्यात येणार आहे. या बससेवेतून स्थानिक नागरिकांना प्रवास करता येणार नाही. तसेच या खालील अटींची पूर्तता करणाऱ्यांना बस सेवेचा लाभ मिळणार असल्याची माहिती परिवहन राज्यमंत्री …
Read More »मजूरांच्या प्रश्नी रेल्वेमंत्री गोयल आणि मुख्यमंत्री ठाकरेंचे पवारांना आश्वासन शरद पवारांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना दूरध्वनी
मुंबई: प्रतिनिधी मजुरांच्या प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यावेळी मजूरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी रेल्वे प्रवासाची सोय करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मजूरांच्या प्रवासासाठी एसटी बसेसची सोय करणार असल्याचे सांगितल्याने मजूरांना दिलासा मिळणार …
Read More »मजुरांच्या दैन्यावस्थेबद्दल आयोगाने राज्याला नव्हे तर केंद्राला नोटीस बजावावी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका
मुंबई: प्रतिनिधी औरंगाबादजवळ रेल्वे दुर्घटनेत १६ स्थलांतरीत मजुरांचे झालेले मृत्यू हे वेदनादायी आहेत. अचानक लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे लाखोंच्या संख्येने स्थलांतरीत मजूर विविध राज्यात अडकून पडले. हातावर पोट असलेल्या कामगारांना काम नसल्यामुळे आपल्या मूळ गावी जाण्याची ओढ लागलेली यातूनच ही दुर्दैवी घटना घटना घडली. स्थलांतरीत मजुरांच्या दैन्यावस्थेला केंद्र सरकारचा लहरी, मनमानी …
Read More »महाराष्ट्रातून किती स्थलांतरीत कामगार जाणार आहेत? जाणून घ्या स्थलांतरीत कामगारांपर्यत पोहचण्यात नोडल- कामगार अधिकारी कमी पडतायत
मुंबई: विशेष प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या कामगारांनी पायीच आपले घर गाठण्यासाठी रेल्वे रूळाच्या सोबत निघाले. मात्र पहाटेच्या अंधारात रेल्वे मालवाहतूक गाडीने त्यांच्या जीवाचा ठाव घेतला. या घटनेमुळे राज्यातील प्रशासकिय व्यवस्था, कामगार विभाग आणि नोडल अधिकाऱ्यांची यंत्रणा नेमके काय काम करते असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. राज्य सरकारने स्थलांतरीत कामगारांना …
Read More »शेलारांच्या तक्रारीनंतर तब्बल १० व्या दिवशी शिक्षण विभागाला जाग फि वाढ न करण्याचे सर्व शाळांना आदेश
मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे सर्वच आर्थिक व्यवहार बंद आहेत. त्यामुळे अनेक शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. तरीही मुंबईसह राज्यातील अनेक शाळांनी परस्पर फि वाढविण्यास सुरुवात केल्याची तक्रार माजी शिक्षण मंत्री अॅड.आशिष शेलार यांनी विद्यमान शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याकडे २९ एप्रिल २०२० रोजी करत निदर्शनास आणून …
Read More »राज्यात सलग ३ ऱ्या दिवशी एक हजाराहून अधिक रूग्णांचे निदान ३७ जणांचा मृत्यू : रूग्ण १९ हजार पार एकूण संख्या
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून आता नागरिकांनीच काळजी घेण्याची आणि लॉकडाऊनचे नियम पाळत शाररीक अंतर राखण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यात ६ तारखेला १२३३, ७ तारखेला १३६२ तर आज एक हजार ८९ रूग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे या तीन दिवसात राज्यातील कोरोनाबाधीत रूग्णांच्या संख्येत एकदम ३५०० …
Read More »लष्कर मुंबईत येणार नाही, पण केंद्राकडे अतिरिक्त संख्याबळ मागितले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची स्पष्टोक्ती
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या दिंवसेदिवस वाढत आहे. ही संख्या रोखण्यासाठी सातत्याने आपण प्रयत्न करत आहोत. मात्र काहीजणांकडून लॉकडाऊनचे नियम काटोकोरपणे पाळले जात नाहीत. तसेच राज्यातील पोलिसही ड्युट्या करून थकत, आजारी पडत आहेत. लॉकडाऊन काटेकोर पाळून ही कोरोनाची साखळी तोडायची आहे. त्याचबरोबर राज्यातील पोलिसांना काही प्रमाणात आराम देण्यासाठी आपण …
Read More »बिहार, कर्नाटकपाठोपाठ आता गुजरातचीही नकार घंटा आडमुठ्या भूमिकेमुळे अनेक स्थलांतरित मजूर खोळंबले- महसूलमंत्री थोरात
मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र सरकार विविध राज्यांत स्थलांतरित मजुरांना पाठविण्यासाठी कटिबद्ध आहे, मात्र बहुतांश राज्य आपल्या नागरिकांना घ्यायलाच तयार नसल्याने स्थलांतरित मजुरांचा प्रश्न गंभीर बनला आहे, या प्रकरणात केंद्रसरकारने हस्तक्षेप करून स्पष्ट निर्देश जाहीर करायला हवे अन्यथा मजुरांच्या भावनांचा उद्रेक होईल अशी चिंता राज्याचे महसूलमंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष …
Read More »
Marathi e-Batmya