Breaking News

कोळसे-पाटील यांच्या उमेदवारीवरून वंचित आघाडीत धुसफूस स्थानिक उमेदवार देण्याची एमआय़एमची भूमिका

मुंबईः प्रतिनिधी समाजातील वंचित घटकाला राजकिय नेतृत्व करण्याची संधी देण्याच्या उद्देशाने लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने जवळपास २५ हून अधिक छोटे राजकिय पक्ष वंचित आघाडीच्या एकछत्राखाली एकत्रित आले. मात्र औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून माजी न्या. बी.जी.कोळसे-पाटील यांना जनता दलाने उमेदवारी जाहीर केल्याने एमआयएम पक्ष नाराज झाल्याने वंचित आघाडीत निवडणूकीपूर्वीच धुसफूस सुरु झाल्याची माहिती …

Read More »

वंचित आघाडीच्या ३७ उमेदवारांची यादी जाहीर सोलापूर-अकोला येथील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात

मुंबई: प्रतिनिधी राज्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या वंचित बहुजन आघाडीच्या एकूण ३७ उमेदवारांच्या नावांची घोषणा आज वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केली असून धनगर समाजाला आजच्या यादीत पाच ठिकाणी तर माळी समाजाला दोन्ही ठिकाणी आणि बौध्द समाजाला चार ठिकाणी तर वडार, होणार, कोळी, कुणबी, मुस्लिम अशा सर्वच …

Read More »

मुंबई लोकल व रेल्वे सर्कलवर सव्वालाख कोटी खर्च करा मुंबईतील सर्व पुलांची श्वेतपत्रिका जाहीर करण्याची शरद पवार यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी दिवसेंदिवस रेल्वे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यायला हवे असे सांगतानाच बुलेट ट्रेनपेक्षा मुंबईतील रेल्वे पुल आणि मुंबई लोकलची अवस्था सुधारावी अशी मागणी आता बुलेट ट्रेन होणार आहे. यावर सव्वा लाख कोटी खर्च होणार आहे. आमचे सर्वांचे मत आहे की, सरकारने तो पैसा मुंबई लोकल …

Read More »

पार्थ पवार, डॉ.अमोल कोल्हे यांची उमेदवारी अखेर जाहीर प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केली घोषणा

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसने गुरूवारी १२ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आज पुन्हा ५ उमेदवारांची यादी पत्रकार परिषदेत जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी ही यादी जाहीर केली. यामध्ये दिंडोरी- धनराज महाले, नाशिक- समीर भुजबळ, शिरुर- डॉ अमोल कोल्हे, बीड – बजरंग सोनवणे, मावळ- पार्थ पवार या नावांची घोषणा केली. …

Read More »

शरम असेल तर महापौर व मनपा आयुक्तांची हकालपट्टी करा मुंबईतील सर्व पुलांचे पुन्हा ऑडिट करण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई: प्रतिनिधी मुंबई हे शासन आणि महापालिका पुरस्कृत अपघातांचे शहर झाले आहे. भाजप, शिवसेनेच्या भ्रष्ट आणि दळभद्री कारभारामुळे मुंबईकरांचे जगणे कठीण आणि मरण सोपे झाले आहे. सातत्याने पूल कोसळण्याच्या आणि आगींच्या घटनांमध्ये मुंबईकर मारले जात आहेत या निर्लज्ज आणि बेजबाबदार कारभाराची जबाबदारी देखील घेतली जात नाही. हे अत्यंत संतापजनक असून …

Read More »

सीएसएमटी दुर्घटनेतील पीडीतांच्या घरातील व्यक्तीला नोकरीत घ्या काही लाखाच्या मदतीने त्यांचे काही होणार नाही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भावना

मुंबईः प्रतिनिधी कालची घटना अत्यंत दुर्दैवी असून यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांना मुख्यमंत्र्यांनी काही लाखांची मदत जाहीर केली. परंतु या रकमेने काही होत नाही. ज्यांचा मृत्यु झाला त्यांची लहान मुलं आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील जबाबदार व्यक्तीला सरकारी नोकरीत तातडीने रुजू करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केली. …

Read More »

बुलेट ट्रेन रद्द करून त्याचा निधी उपनगरीय रेल्वेसाठी वापरणार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे आश्वासन

ठाणेः प्रतिनिधी दिवसेंदिवस उपनगरीय रेल्वे प्रवाशांची दुर्दशाच होत आहे. जीव मुठीत धरुन रेल्वेत चढलो तरी जीवंत परत येऊ का? अशी धाकधूक प्रवाशी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मनात कायम असते. रेल्वेच्या पुलांसह रेल्वेंना जोडणारे पादचारी पुल आणि रस्त्यांवरील पुल धोकादायक झालेले असतानाही हे सरकार जबाबदारी स्वीकारत नाही. वास्तविक पाहता, बुलेट ट्रेनवर कोट्यवधी …

Read More »

दानवेंच्या पराभवासाठी खोतकरांचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र ? काँग्रेसमध्ये खोतकरांचे स्वागत असल्याचे आ.अब्दुल सत्तार यांचे वक्तव्य

औरंगाबादः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेमध्ये जरी युती जरी झालेली असली तरी या दोन्ही पक्षांमध्ये सारेच काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. जालना लोकसभा मतदारसंघावरून खा. रावसाहेब दानवे यांच्याविरोधात शिवसेनेचे मंत्री अर्जून खोतकर यांनी दंड थोपटत दानवेंना पराभूत करण्याचे जाहीर केले आहे. मात्र शिवसेनेकडून याबाबत कोणतीच भूमिका जाहीर करत नसल्याने …

Read More »

लोकसभा निवडणुकीत महिलांची मते निर्णायक ठरणार महिला मतदारांचा टक्का वाढला

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रात चार टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्वाचा वाटा असेल. 2004, 2009 आणि 2014 च्या तुलनेमध्ये महिला मतदारांचा टक्का वाढला आहे. 2004 मध्ये पुरुष आणि महिला मतदार अशी स्वतंत्र नोंदणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यावर्षी एकूण 3 कोटी 42 लाख 63 हजार 317 मतदारांची …

Read More »

मेट्रो ४ अंडरग्राऊंड करा ठाणेकरांनी केली मागणी

ठाणे: प्रतिनिधी “म्युस” व ” ठाणे नागरी प्रतिष्ठान” (ठाणे मतदाता जागरण अभियानची मुख्य संघटना यांनी नागरिकांच्या केलेल्या पाहणीत ७९% नागरिकांनी मेट्रो ४ (कासार-वडवली ते मुंबई) ही अंडरग्राऊंड करा याचा कौल दिला आहे. मेट्रो ४ जीचे प्रत्यक्ष काम एमएमआरडीए करत आहे त्याचे स्वागत नागरिकांनी फार उत्साहाने केलेले नाही. वाहतुकीचा खोळंबा, वाढते …

Read More »