भारतीय जनता पक्षाला काँग्रेसने आज मोठा धक्का देत नांदेड जिल्ह्यात मोठे खिंडार पाडले. नांदेडचे माजी खासदार, भाजपा नेते भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, युवा नेत्या डॉ. मिनल पाटील खतगावकर यांनी दादर स्थित प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते व माजी मंत्री अमित …
Read More »विधानसभा निवडणुकीसाठी बृहन्मुंबई क्षेत्रात १० हजार १११ मतदान केंद्रे प्रत्येक केंद्रावर सरासरी १२०० मतदार
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे, या दृष्टिकोनातून बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हे) मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. या सुसूत्रीकरण कार्यक्रमामुळे बृहन्मुंबई क्षेत्रातील मतदान केंद्रांची संख्या १० हजार १११ झाली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या तुलनेत मतदान …
Read More »नाना पटोले यांची खोचक टीका, … दुसऱ्यांदा भूमिपूजन, हा प्रकल्पही गुजरातला जाईल नरेंद्र मोदी देशातील भ्रष्टाचाराचे सरदार, गांधी कुटुंबावर बोलण्याचा मोदींना अधिकार नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम मित्रा पार्कचे भूमिपूजन हे केवळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राला काही तरी देत आहोत हे दाखवण्याचा प्रकार आहे. २३ जुलै २०२३ रोजी अमरावतीत ह्याच टेक्सटाईल पार्कचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यातील मंत्र्यांच्या हस्ते झाले. या टेक्सटाईल पार्कची …
Read More »काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा सवाल, पंतप्रधान कुठे उभे गांधी, की नथुरामच्या बाजूने या तीन प्रश्नांची उत्तरे द्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदर्भातील महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात येणार असल्याने काँग्रेसने शुक्रवारी त्यांना महात्मा गांधी आणि हिंदूत्ववादी संघटनेचे सदस्य राहिलेले आणि गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसे यांच्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी करत पंतप्रधान मोदी नेमके गांधींच्या बाजूने की नथुराम गो़डसे यांच्यात नेमके कोठे …
Read More »पंतप्रधान मोदींची टीका, काँग्रेस टुकडे टुकडे गँग आणि शहरी नक्षली… काँग्रेसला गणपती पूजेची अडचण
विश्वकर्मा जयंती आणि केंद्र सरकारच्या पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती निमित्त वर्धा येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी वर्धा येथे महाराष्ट्र सरकारच्या आचार्य चाणाक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचा शुभारंभही करत पीएम मित्र प्रकल्पाचे आणि पुण्याश्लोक अहिल्या देवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभही यावेळी केला. यावेळी …
Read More »आर्थिक फसवणूकीच्या प्रकरणांचा पाठपुरावा करण्यात भारताचे सातत्य थकीत-भ्रष्टाचारी पैशाची वसुली करण्यासाठी एफएटीएफने दिले स्थान
फायनान्शिअल ॲक्शन टास्क फोर्स (FATF) ने भारताला आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये आपल्या खटल्यांना गती देण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांसारख्या फरार आर्थिक गुन्हेगारांवरील कारवाईच्या आधारे भारताला ‘नियमित पाठपुरावा’ श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. यासह भारत फक्त चार जी२० G20 राष्ट्रांच्या उच्चभ्रू गटात सामील झाला आहे ज्यात ४० …
Read More »मुंबईतील मेट्रो-३ चे उद्घाटन, पंतप्रधान मोदी येणार मेट्रोच्या उद्घाटनानंतर विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता
मुंबईतील आतुरतेने वाट पाहण्यात येत असलेल्या भूमिगत मेट्रो ३ चे कॉरिडॉर बीकेसी BKC आणि आरे दरम्यानच्या आंशिक मार्गाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती पुढे येत आहे. या मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवातीलाच करण्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून त्यानंतर विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता राज्यात लागू होईल …
Read More »निती आयोगानंतर एस अॅण्ड पी ग्लोबल म्हणते भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार इंडिया फॉरवर्ड: इमर्जिंग पर्स्पेक्टिव्हज” च्या पहिल्या आवृत्तीत दावा
निती आयोगाचे सीईओ सुब्रह्यण्यम यांनी २०३० पर्यत भारती तिसऱ्या स्थानाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचे भाकित केले. त्यानंतर भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे आणि २०३०-३१ पर्यंत उच्च-मध्यम-उत्पन्न श्रेणीमध्ये संक्रमण करणार आहे, या आर्थिक वर्षात ६.७ टक्क्यांच्या अंदाजित वार्षिक विकास दराने प्रेरित आहे, असे एस अॅण्ड पी S&P ग्लोबलने …
Read More »१२ औद्योगिक स्मार्ट सिटीचे काम यंदाच्या वर्षापासून सुरु सीईओ रजत कुमार सैनी यांची माहिती
नुकत्याच मंजूर झालेल्या १२ औद्योगिक स्मार्ट शहरांचे बांधकाम या वर्षी सुरू होईल, तर आधीच सुरू असलेल्या आणखी चार शहरांचे बांधकाम पुढील वर्षाच्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे, असे नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (NICDC) सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक रजत कुमार सैनी यांनी सांगितले. रजत कुमार सैनी म्हणाले की, त्यांना या …
Read More »धनंजय मुंडे यांची माहिती, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदी देणार भरपाई राज्यात सोयाबीन खरेदी केंद्र तातडीने सुरु करा
कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच होणार आहे. त्यामुळे या कामातील केवायसी व इतर तांत्रिक अडचणी दूर करण्याचे, तसेच केंद्र शासनाने दिलेल्या सूचनांनुसार राज्यात सोयाबीन खरेदी केंद्रे तातडीने सुरु करण्यात यावीत, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. मंत्रालयात आयोजित …
Read More »
Marathi e-Batmya