Breaking News

जयंत पाटील यांचा टोला, लाडकी बहीण नाही तर ‘सुरक्षित बहीण’ ही काळाची गरज शिवस्वराज्य यात्रा आता कोकणात

राज्यातील महायुती सरकारच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. सरकारच्या कार्यकाळात राज्यात शेतकरी, विद्यार्थी, युवक त्रस्त आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे आज शिवस्वराज्य यात्रेदरम्यान म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे शिवस्वराज्य यात्रा सिंधुदुर्ग …

Read More »

पारदर्शी व भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करा प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे ततोतंत पालन करुन लोकांचा लोकशाही मुल्यांवरील, निवडणूक प्रक्रीयेवरील विश्वास वृध्दींगत करावा, पारदर्शी व भयमुक्त वातावरणात आगामी विधानसभा निवडणूक पार पाडण्यासाठी सर्वांनी दक्ष राहून समन्वयाने काम करावे. ज्या मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का राज्याच्या सरासरी मतदानाच्या टक्क्यांपेक्षा कमी आहे, त्याठिकाणची कारणे शोधून त्यावर मार्ग काढावा व मतदानाचा …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विविध योजनांचे वाशिममध्ये उद्घाटन राज्यातील १९ मेगावॅटच्या पाच सौर ऊर्जा पार्कचे लोकार्पण

बंजारा समाजाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाची भूमिका निभावली. देशाच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्रात या समाजाने काम केले. समाजाने खूप संत दिले. या संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली. बंजारा विरासत संग्रहालयामुळे समाजाची महान संस्कृती, प्राचीन परंपरा देशाच्या नवीन पिढीला परिचित होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे लोकार्पण बंजारा समाजाच्या प्रतिष्ठीत व्यक्तींशी संवाद

बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथील बंजारा विरासत संग्रहालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी, पंतप्रधान मोदी यांनी नंगारा भवन परिसरातील बंजारा विरासत संग्रहालयाची पाहणी करुन बंजारा समाजाच्या संस्कृती व इतिहास यासंदर्भात माहिती जाणून घेतली. तसेच नगारा वाद्याचे वादनही त्यांनी केले. यावेळी …

Read More »

विधानसभा निवडणूक आणि अजित पवार यांची खंत; नेमकी परिस्थिती काय भाजपासोबत गेलेले अजित पवार यांचे अनेक सहकारी परतीच्या वाटेवर

राज्याच्या विधानसभा निवडणूकीचा कालावधी जसजसा जवळ येत चालला आहे तसतसे दोन्ही राष्ट्रवादींपैकी सर्वाधिक भंबेरी ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उडताना दिसत आहे. त्यातच अजित पवार यांच्यासोबत गेलेले अनेक सीनियर पवारांचे सहकारी आणि जे अजित पवार यांच्यासोबत गेले, ते सर्वजण आता पुन्हा परतीच्या वाटेवर असल्याचे संकेत देत आहेत. …

Read More »

पंतप्रधान मोदी म्हणाले, महाविकास आघाडी जर सत्तेवर आली तर योजना… महाराष्ट्राच्या दौऱ्यात पहिल्यांदाज महाविकास आघाडीच्या भीतीचा उल्लेख

महाराष्ट्रातील डबल इंजिनच्या सरकारने जनतेच्या कल्याणासाठी सातत्याने कामे केली आहेत. तसेच लोकांना पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून विविध विकासकामे करण्यात येत असून आज त्याच विकास कामाचा भाग म्हणून मुंबईच्या मेट्रो-३ चे उद्घाटन करण्यात येत आहे. तसेच महाविकास आघाडीवाल्यांना जनतेला देण्यात येत असलेल्या योजना पसंत नाहीत. त्यामुळे ते योजना बंद करण्यासाठी …

Read More »

राहुल गांधी यांची खंत, दलित मागासांचा इतिहास पुढे आला पाहिजे

दलित, मागास, वंचित वर्गातील लोकांना उद्योग, व्यवसाय, न्यायालयासह कुठेही फारशी संधी दिली जात नाही. सरकारी संस्थाच्या खाजगीकरणामुळे आरक्षण संपवले जात आहे. हे चित्र बदलण्यासाठी संविधानाचे रक्षण महत्वाचे असून संविधानाचे रक्षण करायचे असेल तर सर्वात आधी आरक्षणाची ५० % ची मर्यादा काढून टाकावी लागणार आहे, इंडिया आघाडी ही मर्यादा हटवेल आणि …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा टोला, मुलगी शिकली…१५०० देवून घरी बसवली आम्ही रोजगाराचे तर मिंधेनी महाराष्ट्र विकण्याचे स्टॉल लावले-आदित्य ठाकरे

राज्य सरकारमध्ये बसलेले गद्दार एका महिन्यात बेरोजगार होणार असून आपल्याकडे रोजगार मागायला येतील. पण, एकाही गद्दरला मी रोजगार देणार नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटाला इशारा दिला. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रकल्पांच्या नावाखाली गद्दारांचे सरकार माझ्या महाराष्ट्राला लुटत आहे. मात्र एक महिन्यानंतर मविआचे …

Read More »

राहुल गांधी यांचा हल्लाबोल, त्याच विचारधारेच्या लोकांनी शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक… देशाच्या संविधानात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार

छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या थोर महापुरुषांचे फक्त पुतळे उभारून चालत नाही तर त्यांच्या आचार विचारांचे पालन करावे लागते. शिवाजी महाराज हे ज्या कार्यासाठी लढले, जगले त्यातील थोडे तरी आपण आत्मसात केले पाहिजे. शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन महान कार्य केले व अन्यायाविरुद्ध लढा दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे …

Read More »

मेटाकडून व्हिडिओग्राफर यांच्यासाठी आता नवे एआय प्लॅटफॉर्मही केले उपलब्ध व्हिडिओ तयार करणे किंवा एआयचा वापर करून संधी उपलब्ध

मेटा ने शुक्रवारी मुव्ही जेन Movie Gen लाँच करण्याची घोषणा केली – वापरकर्ते व्हिडिओ कसे तयार करतात, संपादित करतात आणि वैयक्तिकृत करतात हे बदलण्यासाठी डिझाइन केलेले एक नवीन जनरेटिव्ह एआय प्लॅटफॉर्म. हे नाविन्यपूर्ण साधन व्यक्तींना केवळ मजकूर प्रॉम्प्ट इनपुट करून सानुकूल व्हिडिओ आणि साउंडट्रॅक तयार करण्यास अनुमती देते, उच्च-गुणवत्तेचे व्हिडिओ …

Read More »