Breaking News

पाणबुडी आयएनएस अरिघाट नौदलासाठी सज्ज भारतात बांधलेली ही दुसरी अरिहंत श्रेणीची पाणबुडी

हिंद महासागर क्षेत्रात भारताची ताकद वाढविण्यासाठी केंद्र सरकारने जोरदार कंबर कसली आहे, त्यामुळे चीनच्या वेगवान हालचालीवर लक्ष ठेवत अचूक उत्तर देण्यासाठी भारताने वेगवान पद्धतीने प्रगतीचा जणू काही आलेखच तयार केल्याचे चित्र स्पष्ट होत आहेत, याचाच प्रत्यय हिंद महासागरात अणु क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली पाणबुडी आयएनएस अरिघाट भारतीय नौदलात सामील होण्यासाठी सज्ज …

Read More »

एटापल्ली नक्षल्यांचा पत्रक वाटून राज्य सरकारला इशारा एटापल्ली तालुक्यातील नक्षलवादी आक्रमक

अधुरा सपना पुरा करेंगे, असा इशारा नक्षल्यांनी गडचिरोली जिल्ह्यात पत्रकं वाटले आहेत. नक्षली चळवळीवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे नक्षलवादी आता आक्रमक झाले आहेत. अलीकडे झालेल्या एटापल्ली तालुक्यातील चकमकीत 12 माओवादी ठार झाले होते. नक्षल्यांनी वाटलेल्या पत्रकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यात आले आहे. अजित पवार 23 …

Read More »

खासदार सुप्रिया सुळे मोबाईल हॅक एक्स अकाऊंटवरुन दिली माहिती

लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअप हॅक झालं आहे. त्यांनीच आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसेच कोणीही मला फोन अथवा मेसेज करु नका असं आवाहनही त्यांनी केलं आहे. सुप्रिया सुळेंच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन दुपारी एक वाजता करण्यात आलेल्या पोस्टमध्ये त्यांनी, “अत्यंत महत्वाचे” असं …

Read More »

माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचे निधन मुत्सद्देगिरीतील अनुभवाचा खजिना राजकीय कारकीर्दीत आणणारे ते करिअर डिप्लोमॅट

माजी परराष्ट्र मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नटवर सिंह यांचे शनिवारी रात्री उशिरा निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. नटवर सिंह हे अनेक दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर दिल्लीजवळील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय होते आणि त्यांच्या …

Read More »

राज्यातील नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांची मंजुरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल यांचे मानले आभार

राज्यातील नार-पार-गिरणा हा प्रकल्प ७०१५  कोटी रुपयांचा असून, यात पश्चिमी वाहिनी नदीखोर्‍यातून १०.६४ टीएमसी पाणीवापर प्रस्तावित आहे. या प्रामुख्याने लाभ नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील ४९,५१६ हेक्टर सिंचन क्षेत्राला होणार आहे. यात नाशिक जिल्ह्यातील कळवण, देवळा आणि मालेगाव तालुक्यातील २५,३१८ हेक्टर आणि जळगाव जिल्ह्यातील १७,०२४ हेक्टर सिंचन क्षेत्राला लाभ होणार आहे. …

Read More »

लाभाच्या योजनांसाठी दोन अपत्यांची अट कायम करा  खा. डॉ. अनिल बोंडे यांनी राज्यसभेतून सरकारकडे मागणी

केंद्र शासनाकडून राबविण्यात येणार्‍या गरीब कल्याण योजनेसह अन्य सर्व लाभाच्या योजनांसाठी इतर सगळ्या अटींसह दोन अपत्यांची अट (अपवाद दुसर्‍यावेळी झालेले जुळे अपत्य) त्यात ठेवण्यात यावी, अशी मागणी खा. डॉ. अनिल बोंडे यांनी राज्यसभेतून सरकारकडे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याण योजना सुरू केली. या योजनेचे लाभार्थी ८० कोटी …

Read More »

जांभेकर महिला विद्यालयाच्या शतक महोत्सवाचे राष्ट्रपतींना निमंत्रण महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था असून शहरी व ग्रामीण भागातील सुमारे १५००० विद्यार्थी-विद्यार्थिनी संस्थेमध्ये विविध प्रकारचे शिक्षण घेत आहेत. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे गोदूताई जांभेकर विद्यालय यावर्षी शतक महोत्सवी वर्ष साजरे करण्यात असल्याने या कार्यक्रमांच्या प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आले. हा शतक …

Read More »

उदार शक्ती सरावानंतर भारतीय हवाईदलाची तुकडी मायदेशी संयुक्त सराव सत्रात भारतीय हवाई दलाने Su-30MKI लढाऊ विमानांसह सहभाग

मलेशियात उदार शक्ती 2024 या सरावात यशस्वी सहभाग नोंदवून भारतीय हवाई दलाची तुकडी 10 ऑगस्ट 2024 रोजी भारतात परतली. रॉयल मलेशियन हवाई दलाबरोबरचा हा संयुक्त हवाई सराव पाच ते नऊ ऑगस्ट 2024 या कालावधीत मलेशियातील कुआंतान इथे पार पडला. या संयुक्त सराव सत्रात भारतीय हवाई दलाने Su-30MKI लढाऊ विमानांसह भाग …

Read More »

आफ्रिकेतील उहुरु शिखरावर फडकवला, भारताचा राष्ट्रीय ध्वज चिकाटी आणि सहकार्य यातून हे ध्वजारोहन साध्य

देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील हिमालयीन गिर्यारोहण संस्थेच्या दिव्यांगजन मोहिम चमूने आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर असलेल्या किलिमंजारो पर्वतावरील उहुरु शिखरावर 7800 चौरस फूटाचा भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकवला. या चमूने त्यांचा प्रवास बेस कॅम्प पासून सुरू केला आणि 15500 फुट उंचीवरील कीबु हट इथे 7 ऑगस्टला पोहोचले. …

Read More »

विधानसभा निवडणुकीत मविआला १८५ पेक्षा जास्त जागा कॉंग्रेस पक्षच मोठा बनणार

महायुती सरकार हे घोटाळ्याचे सरकार असून या असंवैधानिक सरकारच्या विरोधात जनतेत प्रचंड रोष आहे. कामांची कंत्राटे देताना ५० टक्के कमिशन घेतले जाते, या कमीशनखोर सरकारला सत्तेतून बाहेर काढले पाहिजे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले तसेच यश विधानसभेलाही मिळावे यासाठी कामाला लागा, एकजूट होऊन लढा विजय आपलाच आहे, असे …

Read More »