सोनम वांगचुक यांच्या स्थानबध्दतेचे केंद्राकडून सर्वोच्च न्यायालयात समर्थन वांगचूक यांच्याकडूनच फुटीरता वादी चिथावणीखोर भाषणे

केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रतिबंधात्मक अटकेचे समर्थन केले. त्यांचे सार्वजनिक भाषणे चिथावणीखोर, फुटीरतावादी संदेश देणारी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक होती, विशेषतः एका सामरिकदृष्ट्या संवेदनशील सीमावर्ती प्रदेशात, असा युक्तिवाद सरकारने केला.

केंद्र सरकारतर्फे हजर झालेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च  न्यायालयाला सांगितले की, सोनम वांगचुक यांनी तरुण पिढीला नेपाळ, बांग्लादेश आणि श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला होता, आणि त्यासाठी त्यांनी त्या देशांमधील हिंसक उठाव व राजकीय अस्थिरतेची उदाहरणे दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांच्या  खंडपीठ सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेत होते, ज्यात त्यांच्या अटकेला आव्हान देण्यात आले.

सुरुवातीलाच सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निरीक्षण नोंदवले की, कलम ३२ अंतर्गत न्यायालय अटकेच्या आदेशांवर अपील म्हणून सुनावणी घेत नाही, आणि अटकेसाठी अवलंबलेल्या कारणांचा, आधारांचा आणि पुराव्यांचा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंध आहे की नाही, हा मुख्य प्रश्न होता.

सॉलिसिटर जनरल यांनी सांगितले की, न्यायालयाची भूमिका स्वतःचे समाधान तपासण्याची नाही, तर जिल्हा दंडाधिकारी (डीएम) यांचे हे समाधान योग्य होते की नाही, की सोनम वांगचुक यांच्या कृतींमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेत व्यत्यय येऊ शकतो, हे तपासण्याची आहे.

अटकेच्या आदेशानुसार, जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी असा निष्कर्ष काढला होता की, सोनम वांगचुक यांच्या भाषणांमध्ये हानिकारक कृत्ये करण्यास चिथावणी देण्याची आणि सार्वजनिक शांतता भंग करण्याची क्षमता आहे.

तुषार मेहता म्हणाले की, अटकेचा आदेश योग्य प्रक्रियेनंतर आणि चार तासांच्या आत जारी करण्यात आला होता. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, एका डीआयजींनी सोनम वांगचुक यांची भेट घेतली, त्यांना त्यांच्या भाषणांचे व्हिडिओ क्लिप दाखवले आणि सोनम वांगचुक यांनी ती क्लिप अस्सल असल्याचे मान्य केले.

सर्वोच्च न्यायालयात सोनम वांगचुक यांच्या भाषणाचे काही भाग वाचून दाखवत तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला की, या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक चिथावणीखोर विधाने अहिंसा आणि महात्मा गांधी यांच्या उल्लेखांपासून वेगळी केली होती आणि गांधीजींच्या नावाचा वापर आवरण म्हणून केला होता.

“जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी संपूर्ण भाषण पाहिले पाहिजे. तुम्ही एक ओळ, एक शब्द किंवा एक वाक्य निवडून ‘मी फक्त गांधीजी जे म्हणाले तेच बोलत होतो’ असे म्हणू शकत नाही,” असे तुषार मेहता म्हणाले आणि पुढे म्हणाले की, “जनरेशन झेडची स्वतःची एक वेगळी भाषा आहे.”

त्यांनी सोनम वांगचुक यांच्या हवाल्याने सांगितले की, तरुण आंदोलकांचा अचानक “पुरासारखा” ओघ आला आहे, आणि ते कुठून आले हे त्यांना माहित नाही, परंतु “ते नेपाळसारख्या दंगलीच्या परिस्थितीची अपेक्षा करत होते” आणि नेपाळमधून प्रेरणा घेऊ शकतात.

तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, सोनम वांगचुक तरुणांना नेपाळने जे केले तेच आपणही केले पाहिजे, असा विश्वास देऊन त्यांची दिशाभूल करत आहेत आणि महात्मा गांधींचा उल्लेख करणे हे केवळ एका चिथावणीखोर भाषणाला संरक्षण देण्यासाठी वापरलेले एक साधन असल्याचा आरोप केला.

About Editor

Check Also

सर्वोच्च न्यायालयाची शंका, न्या. वर्मा यांच्या विरोधातील प्रस्ताव राज्यसभेने फेटाळल्यास सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने व्यक्त केली शंका

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या महाभियोगासाठी लोकसभेने स्वीकारलेला प्रस्ताव, त्याच दिवशी राज्यसभेत मांडलेला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *