एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये मनुस्मृतीचा समावेश करणे हे गंभीर घटनात्मक चिंता निर्माण करते आणि समाजावरील याच्या परिणामांबाबत प्रश्न उपस्थित करते, अशी स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे. पुढे बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती पूर्णपणे नाकारली होती. त्यांचे असे मत …
Read More »केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या तयारीसाठी किसान सभेची बैठक राष्ट्रीय स्तरावर शेतकरी आंदोलनाच्या नियोजनासाठी मुंबईत बैठक
अखिल भारतीय किसान सभेच्या केंद्रीय किसान कमिटीची राष्ट्रीय बैठक मुंबई येथील वायएमसीए YMCA इंटरनॅशनल हाऊस, मुंबई येथे २८ व २९ जून २०२६ रोजी दोन दिवस संपन्न होत आहे. अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, सरचिटणीस विजू कृष्णन, उपाध्यक्ष खासदार आमरा राम, माजी खासदार हनन मोला, पी. कृष्णप्रसाद, …
Read More »व्यावसायिक एलपीजीवरील सर्व निर्बंध हटवले घरगुती गॅसचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश
पश्चिम आशियातील भू-राजकीय संकटामुळे व्यावसायिक वापराच्या एलपीजी (Packed Non-Domestic LPG) पुरवठ्यावर घालण्यात आलेले सर्व निर्बंध केंद्र शासनाने हटवले आहेत. केंद्र शासनाने २५ जून २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा पूर्ववत करण्यात आला असून, यापुढे पुरवठ्यावर कोणतीही मर्यादा राहणार नाही. पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे एलपीजी उपलब्धतेवर परिणाम झाल्याने केंद्र …
Read More »तीन तलाक कायद्याशी संलग्न लक्षवेधीवरून काँग्रेस, राष्ट्रवादीने सरकारला घेरले विजय वडेट्टीवार, जयंत पाटील यांचा सवाल, कोणत्या मेरिटच्या आधारे लक्षवेधी स्विकारली
देशातील मुस्लिम समाजाची मते मिळविण्यासाठी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणित रालोआ सरकारने तीन तलाक प्रकरणी नवा कायदा आणत आता फोन, समाज माध्यमांचा वापर करत करत पत्नीला तलाक देणे गुन्हा ठरविण्यात आला. केंद्राने हा कायदा लागू केल्याने त्याच्या अंमलबजावणीचा विषय फक्त राज्याच्या अखत्यारित येतो. पण नाशिक मध्ये तीन वेगवेगळ्या …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी द्या केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडली प्रभावी बाजू
महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे केली. या खाणी राज्य शासनाला मिळाल्यास दोन वर्षात कार्यान्वित करून २०३० पर्यंत उत्पादन सुरू करून पुढील काळात स्टील …
Read More »स्फोटके नियम २००८ मध्ये सुधारणेसाठी राज्य शासन केंद्राला प्रस्ताव सादर करणार जीवितहानी टाळण्यासाठी स्वयंचलित यंत्रणेवर भर · मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादरीकरण
नागपूर जिल्ह्यात मागील अडीच वर्षात स्फोटकांच्या कंपन्यांमधील अपघातांमध्ये जीवितहानीच्या घटना लक्षात घेता स्फोटके नियम २००८ मध्ये सुधारणा सुचविणारा प्रस्ताव राज्य शासन केंद्राला सादर करणार आहे. या प्रस्तावाच्या मसुद्यात जीवितहानी टाळण्यासाठी कंपन्यांमध्ये स्वयंचलित प्रक्रियेसह सुरक्षेशी संबंधित जागतिक मानकांचा अवलंब करण्याच्या शिफारसी सुचविण्यात आल्या आहेत. रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जिल्हा …
Read More »जयराम रमेश यांची टीका, तो एक फालतू युक्तीवाद निकोबार जंगलतोडची भरपाई हरियाणामध्ये भरून काढणार
निकोबारमधील जंगलतोड करून हरियाणामध्ये काही प्रमाणात भरपाई म्हणून वृक्षारोपण करून त्याच्या पर्यावरणीय परिणामाचे व्यवस्थापन करता येईल, हा एक फालतू युक्तिवाद आहे, अशी टीका काँग्रेस नेते आणि राज्यसभा सदस्य जयराम रमेश यांनी शुक्रवारी (५ जून, २०२६) बंगळूरु येथे ‘द हिंदू हडल’चा म्हणून आयोजित ‘अरवली पर्वतरांगांपासून निकोबारपर्यंत: पर्यावरणाच्या उंबरठ्यावर’ या सत्रात बोलताना …
Read More »सुप्रिया सुळे यांची माहिती, केंद्राच्या अहवालानुसार पुणे क्राईमच्या बाबतीत देशात ५ व्या क्रमांकाचे शहर पुणे पोलीस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवा. काँग्रेसमुक्त भारत म्हणजे सगळी काँग्रेस तुम्ही घेणार असं होतं का?
केंद्रीय गृहविभागाच्या अहवालानुसार पुणे शहर क्राईमच्या बाबतीत राज्यात पहिले तर देशात पाचवे शहर बनलय आहे. पुण्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. त्यामुळे पुण्याच्या पोलिस आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवा, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे. सुप्रिया …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा निर्णय आरोग्य संशोधन विभागामार्फत देशभर उभारण्यात येणाऱ्या १५० प्रयोगशाळांपैकी अधिकच्या महाराष्ट्राला देण्याची केंद्राकडे मागणी
राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. या संदर्भात १३ जुलै २०१७ रोजी तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून केंद्र शासनाच्या आरोग्य संशोधन विभागामार्फत देशभर उभारण्यात येणाऱ्या १५० अत्याधुनिक विषाणू प्रयोगशाळांच्या उपक्रमाचे स्वागत करत …
Read More »दक्षिण भारतीय राज्ये डिलिमिटेशन प्रक्रियेमध्ये फारसे काही गमावणार नाहीत लोकसभेच्या ५० टक्के जागा वाढण्याची शक्यता
डिलिमिलेट्शनची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सर्व राज्यांच्या लोकसभेच्या जागांच्या संख्येत दीडपट वाढ होईल आणि कोणत्याही राज्याची संसदेतील सध्याची राजकीय ताकद कमी होणार नाही, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने बुधवारी (१५ एप्रिल २०२६) सांगितले. गुरुवारी (१६ एप्रिल) जेव्हा ‘संविधान (१३१ वी दुरुस्ती) विधेयक’ आणि डिलिमिटेशन ‘सीमांकन विधेयक’ यावरील चर्चा संसदेत सुरू होईल, …
Read More »
Marathi e-Batmya