Tag Archives: union government

केंद्र सरकारचे कॉकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाला चर्चेचे आमंत्रण तुमच्या सोयीने आणि वेळेनुसार सरकार चर्चेस तयार असल्याची मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती

२० जुलैच्या आंदोलनादरम्यान झालेल्या “पोलिसांच्या क्रूरते” विरोधात कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) उद्या शुक्रवारी देशव्यापी आंदोलनाचे आवाहन केले असताना, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या मोठ्या प्रयत्नात केंद्र सरकारने गुरुवारी त्यांना त्यांच्या “सोयीनुसार” आणि “कोणत्याही वेळी” चर्चेसाठी पुन्हा आमंत्रित केले. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केले की, सरकारने गेल्या २४ तासांत “आमच्या …

Read More »

सोनम वांगचुक यांचा सरकारला आंदोलनातून बाहेर पडण्यासाठी तीन मार्गी पर्याय नवी दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन दिवसेंदिवस चिघळतेय

‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) आंदोलनाला जर कोणी केंद्रबिंदू म्हणून एकत्र धरून ठेवले असेल, तर ते सोनम वांगचुक आहेत. लडाखमधील या कार्यकर्त्यांने या आंदोलनाला बळ देण्यासाठी आठवडेभर अन्नाचा त्याग केला आहे. केंद्र सरकारला जर कशाची चिंता वाटत असेल, तर ती बेमुदत उपोषणावर बसलेल्या वांगचुक यांची आहे. त्यांचे उपोषण सोडवल्यास या समस्येवर …

Read More »

वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे आग्मो म्हणाल्या, माझा विश्वास उडाला, न्यायालयात दाद मागणार वैद्यकीय उपचार नव्हे तर हि अवैध स्थानबद्धता आहे, दाद मागणार

कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंग्मो यांनी, सरकारी वैद्यकीय सुविधेवरील विश्वास उडाल्याने, सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्याची मागणी करत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. गीतांजली जे आंग्मो यांनी याचिकेवर आजच तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली, ज्यानंतर न्यायालयाने आज दुपारी २:३० वाजता सुनावणीसाठी हे प्रकरण सूचीबद्ध केले. …

Read More »

तृणमूलच्या बंडखोर खासदारांची स्वतंत्र आसन व्यवस्थाः इंडिया आघाडी बैठकीतून बाहेर सर्वपक्षिय बैठकीतून इंडिया आघाडीचे सर्व सदस्य बाहेर पडले

बंडखोर तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदारांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्थेवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, इंडिया आघाडीच्या खासदारांनी बैठकीतून सभात्याग केल्याने रविवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्राच्या सर्वपक्षीय बैठकीत मोठा नाट्यमय प्रसंग घडला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी संसद परिशिष्टात बोलावलेल्या या बैठकीत, सरकारच्या कायदेविषयक अजेंड्यावर आणि आगामी अधिवेशनात चर्चेत राहण्याची शक्यता असलेल्या मुद्द्यांवर …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची टीका, एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश ही गंभीर घटनात्मक चिंता केंद्र सरकारच्या निर्णयावर केली टीका

एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये मनुस्मृतीचा समावेश करणे हे गंभीर घटनात्मक चिंता निर्माण करते आणि समाजावरील याच्या परिणामांबाबत प्रश्न उपस्थित करते, अशी स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे. पुढे बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती पूर्णपणे नाकारली होती. त्यांचे असे मत …

Read More »

केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या तयारीसाठी किसान सभेची बैठक राष्ट्रीय स्तरावर शेतकरी आंदोलनाच्या नियोजनासाठी मुंबईत बैठक

अखिल भारतीय किसान सभेच्या केंद्रीय किसान कमिटीची राष्ट्रीय बैठक मुंबई येथील वायएमसीए YMCA इंटरनॅशनल हाऊस, मुंबई येथे २८ व २९ जून २०२६ रोजी दोन दिवस संपन्न होत आहे. अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, सरचिटणीस विजू कृष्णन, उपाध्यक्ष खासदार आमरा राम, माजी खासदार हनन मोला, पी. कृष्णप्रसाद, …

Read More »

व्यावसायिक एलपीजीवरील सर्व निर्बंध हटवले घरगुती गॅसचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश

पश्चिम आशियातील भू-राजकीय संकटामुळे व्यावसायिक वापराच्या एलपीजी (Packed Non-Domestic LPG) पुरवठ्यावर घालण्यात आलेले सर्व निर्बंध केंद्र शासनाने हटवले आहेत. केंद्र शासनाने २५ जून २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा पूर्ववत करण्यात आला असून, यापुढे पुरवठ्यावर कोणतीही मर्यादा राहणार नाही. पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे एलपीजी उपलब्धतेवर परिणाम झाल्याने केंद्र …

Read More »

तीन तलाक कायद्याशी संलग्न लक्षवेधीवरून काँग्रेस, राष्ट्रवादीने सरकारला घेरले विजय वडेट्टीवार, जयंत पाटील यांचा सवाल, कोणत्या मेरिटच्या आधारे लक्षवेधी स्विकारली

देशातील मुस्लिम समाजाची मते मिळविण्यासाठी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणित रालोआ सरकारने तीन तलाक प्रकरणी नवा कायदा आणत आता फोन, समाज माध्यमांचा वापर करत करत पत्नीला तलाक देणे गुन्हा ठरविण्यात आला. केंद्राने हा कायदा लागू केल्याने त्याच्या अंमलबजावणीचा विषय फक्त राज्याच्या अखत्यारित येतो. पण नाशिक मध्ये तीन वेगवेगळ्या …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी द्या केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मांडली प्रभावी बाजू

महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे केली. या खाणी राज्य शासनाला मिळाल्यास दोन वर्षात कार्यान्वित करून २०३० पर्यंत उत्पादन सुरू करून पुढील काळात स्टील …

Read More »

स्फोटके नियम २००८ मध्ये सुधारणेसाठी राज्य शासन केंद्राला प्रस्ताव सादर करणार जीवितहानी टाळण्यासाठी स्वयंचलित यंत्रणेवर भर · मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादरीकरण

नागपूर जिल्ह्यात मागील अडीच वर्षात स्फोटकांच्या कंपन्यांमधील अपघातांमध्ये जीवितहानीच्या घटना लक्षात घेता स्फोटके नियम २००८ मध्ये सुधारणा सुचविणारा प्रस्ताव राज्य शासन केंद्राला सादर करणार आहे. या प्रस्तावाच्या मसुद्यात जीवितहानी टाळण्यासाठी कंपन्यांमध्ये स्वयंचलित प्रक्रियेसह सुरक्षेशी संबंधित जागतिक मानकांचा अवलंब करण्याच्या शिफारसी सुचविण्यात आल्या आहेत. रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जिल्हा …

Read More »