रतन टाटा हे केवळ एक व्यक्ती नाहीत तर ते स्वतः एक संस्था आहेत. रतन टाटा यांनी चहा, मीठ ते स्टील, ऑटोमोबाईल्स, आयटी, विमानबांधणी, आदरातिथ्य अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रांसह टाटा उद्योग समूहाला जागतिक समूहात रूपांतरित केले. ते उद्योग, नवोपक्रम, स्टार्टअप आणि सामाजिक जाणिवेचे चालतेबोलते विद्यापीठ आहेत. महाराष्ट्र राज्याचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार स्वीकारून …
Read More »Onion Price : कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क कांद्यावर ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत तात्काळ प्रभावाने ४० टक्के निर्यात शुल्क लावण्यात आले
कांद्याच्या वाढत्या किंमतीच्या Onion Price पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, कांद्यावर ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत तात्काळ प्रभावाने ४० टक्के निर्यात शुल्क लावण्यात आले आहे. यासंदर्भात केंद्र सरकारच्या महसूल विभागाने शनिवारी अध्यादेश काढला आहे. वाढती महागाई पाहता टोमॅटोनंतर कांद्याचे दर ही सामान्यांना रडवणार असल्याचे म्हटले …
Read More »जाणून घ्या … Mahindra Group ने परत का मागवल्या एक लाखाहून अधिक गाड्या ? कंपनीने शनिवारी शेअर बाजाराला दिली माहिती
कार उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा ( Mahindra Group ) ने त्यांच्या एक लाखाहून अधिक गाड्या परत मागवल्या आहेत. इंजिनमधील वायरिंग समस्येची चाचणी घेण्यासाठी M&M ने स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (SUV) XUV700 ची १,०८,३०६ युनिट्स परत मागवली आहेत. Mahindra Group कंपनीने शनिवारी शेअर बाजाराला माहिती दिली की त्यांनी इंजिनमधील वायरिंगची चाचणी …
Read More »मुख्यमंत्र्यांकडून रतन टाटांना महाराष्ट्र उद्योग पुरस्कार प्रदान उपमुख्मंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवील, उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित
महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रातील नामवंत उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनामार्फत ‘महाराष्ट्र उद्योग पुरस्कार’ दिला जात आहे. या पुस्काराचे पहिले मानकरी पद्मविभूषण रतन टाटा ( Ratan Tata ) ठरलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले. टाटा यांच्या मुंबईतील हालकाई बंगल्यात अत्यंत साधेपणाने त्यांना …
Read More »रतन टाटा, आदर पुनावाला यांच्यासह चौघांना राज्याचा उद्योगरत्न पुरस्कार पहिल्या महाराष्ट्र उद्योग पुरस्कारांचा २० ऑगस्टला प्रदान सोहळा
महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या नामवंत उद्योजकांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर यावर्षीपासून राज्य शासनाने ‘महाराष्ट्र उद्योग पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीचे उद्योग पुरस्कार जाहीर झाले असून पहिला उद्योगरत्न पुरस्कार पद्मविभूषण रतन टाटा यांना तर उद्योगमित्र पुरस्कार आदर पुनावाला यांना तसेच उद्योगिनी पुरस्कार गौरी किर्लोस्कर यांना, …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, उदंचन जलविद्युत प्रकल्प भविष्यात अधिक उपयुक्त ठरणार २८०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती, १२ हजार ५५० कोटी रुपयांची गुंतवणूक, ६ हजार रोजगार निर्मिती
अक्षय ऊर्जेमध्ये राज्य वेगाने पुढे जात आहे. अशा परिस्थितीत राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी राज्य शासन आणि मे.नॅशनल टाटा पॉवर कंपनी यांच्यातील सामंजस्य करार अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. भविष्यात उदंचन जलविद्युत प्रकल्प अधिक महत्वाचे आणि उपयोगी ठरणार आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसनासाठी …
Read More »जुलै २०२३ मध्ये जीएसटी संकलनात महाराष्ट्र अव्वल अर्थ मंत्रालयाकडून संकलनाचे आकडे जाहीर
माहे जुलै २०२३ मध्ये जीएसटी संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या पाच राज्यांमध्ये अव्वल ठरले आहे. देशात जुलै २०२३ मध्ये जीएसटी संकलन १,६५,१०५ कोटी रुपये झाले असून, राज्यात २६ हजार ६४ कोटी रुपये कर महसूल संकलित झाला आहे , जे मागील वर्षाच्या तुलनेत १८ टक्क्यांनी वाढले आहे. अर्थ मंत्रालयाकडून जीएसटी संकलनाबाबत जाहीर …
Read More »व्यावसायिक गॅस झाला १०० रूपयाने स्वस्त जेवण आणि नास्ता स्वस्त होण्याची शक्यता
सार्वजनिक क्षेत्रातील तेल आणि वायू विपणन कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत ९९.७५ रुपयांनी कमी केली आहे. आजपासून नवे दर लागू होणार आहेत. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आता दिल्लीत १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर १६८० रुपयांना मिळेल, जो पूर्वी १७८० रुपयांना मिळत होता. कोलकातामध्ये, हे १८०२.५० रुपयांना उपलब्ध होईल, जे आधी १८९५.५० …
Read More »हजारो कोटींच्या मागण्या असतात का?… अजित पवार यांनीही मांडल्या ४१ हजार कोटींच्या सप्लीमेंटरी डिमांड नमो शेतकरी योजनेसाठी चार हजार कोटी, ग्रामीण भागातील सुविधांसाठी दीड हजार कोटी
भाजपा प्रणित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या सुरुवातीला जवळपास ४० हजार कोटी रूपयांहून अधिकच्या मागण्या सादर केल्या. त्यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हजारो कोटी रूपयांच्या मागण्या असतात का? असा सवाल उपस्थित करत आर्थिक नियोजन नीट करता येत नसल्याचा आरोप केला. त्यास फक्त चारच …
Read More »हरित हायड्रोजन धोरण जाहीर, ८ हजार ५०० कोटीस मान्यता राज्यातील नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना गती
नवीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजनच्या प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या हरित हायड्रोजन धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. असे धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ८ हजार ५६२ कोटी रुपये खर्चास देखील मान्यता देण्यात आली. पंतप्रधानांनी राष्ट्रीय …
Read More »
Marathi e-Batmya