रिलायन्सला ९ हजार ४२३ कोटींचा नफा नफ्यात २५ टक्क्याने वाढ

मुंबई : प्रतिनिधी
आर्थिक वर्ष २०१८ च्या तिसऱ्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात २५ टक्के वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीला ९ हजार ४२३ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तर मागील वर्षीच्या या तिमाहीत रिलायन्सला ७ हजार ५३३ कोटींचा नफा झाला होता.
तिसऱ्या तिमाहीत रिलायन्सचे उत्पन्न ३०.५ टक्के वाढून १ लाख ९ हजार ९०५ कोटी रुपये झाले आहे. मागील वर्षीच्या या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न ८४ हजार १८९ कोटी रुपये होते. तर तिमाही आधारावर कंपनीचे उत्पन्न ८.६ टक्के वाढले आहे.
जिओला ५०४ कोटींचा नफा 
 या तिमाहीत दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओनेही चांगली कामगिरी नोंदवली आहे. ऑक्टोंबर – डिसेंबर तिमाहीत जिओला  ५०४ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. दुसऱ्या तिमाहीत जिओला २७१ कोटींचा तोटा झाला होता. सध्या जिओचे १६ कोटी ग्राहक आहेत.

About Editor

Check Also

अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या या घोषणा अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला अर्थसंकल्प सादर

राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधऩ झाल्याने राज्याचा अर्थसंकल्प कोण सादर करणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *