रिलायन्सला ९ हजार ४२३ कोटींचा नफा नफ्यात २५ टक्क्याने वाढ

मुंबई : प्रतिनिधी
आर्थिक वर्ष २०१८ च्या तिसऱ्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात २५ टक्के वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीला ९ हजार ४२३ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तर मागील वर्षीच्या या तिमाहीत रिलायन्सला ७ हजार ५३३ कोटींचा नफा झाला होता.
तिसऱ्या तिमाहीत रिलायन्सचे उत्पन्न ३०.५ टक्के वाढून १ लाख ९ हजार ९०५ कोटी रुपये झाले आहे. मागील वर्षीच्या या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न ८४ हजार १८९ कोटी रुपये होते. तर तिमाही आधारावर कंपनीचे उत्पन्न ८.६ टक्के वाढले आहे.
जिओला ५०४ कोटींचा नफा 
 या तिमाहीत दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओनेही चांगली कामगिरी नोंदवली आहे. ऑक्टोंबर – डिसेंबर तिमाहीत जिओला  ५०४ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. दुसऱ्या तिमाहीत जिओला २७१ कोटींचा तोटा झाला होता. सध्या जिओचे १६ कोटी ग्राहक आहेत.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, उद्योग परवानग्यांमध्ये सुलभतेसोबत महाराष्ट्रात वीजदरातही घट होणार १३ परवानग्याही लवकरच कमी करण्यासाठी प्रयत्न

महाराष्ट्रात उद्योग सुलभतेसाठी परवानगी प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले असून ३३ परवानग्यांपैकी २० परवानग्या स्व-प्रमाणनावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *