रिलायन्सला ९ हजार ४२३ कोटींचा नफा नफ्यात २५ टक्क्याने वाढ

मुंबई : प्रतिनिधी
आर्थिक वर्ष २०१८ च्या तिसऱ्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात २५ टक्के वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीला ९ हजार ४२३ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तर मागील वर्षीच्या या तिमाहीत रिलायन्सला ७ हजार ५३३ कोटींचा नफा झाला होता.
तिसऱ्या तिमाहीत रिलायन्सचे उत्पन्न ३०.५ टक्के वाढून १ लाख ९ हजार ९०५ कोटी रुपये झाले आहे. मागील वर्षीच्या या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न ८४ हजार १८९ कोटी रुपये होते. तर तिमाही आधारावर कंपनीचे उत्पन्न ८.६ टक्के वाढले आहे.
जिओला ५०४ कोटींचा नफा 
 या तिमाहीत दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओनेही चांगली कामगिरी नोंदवली आहे. ऑक्टोंबर – डिसेंबर तिमाहीत जिओला  ५०४ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. दुसऱ्या तिमाहीत जिओला २७१ कोटींचा तोटा झाला होता. सध्या जिओचे १६ कोटी ग्राहक आहेत.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्गामुळे वाहतूक व मालवाहतुक होणार वेगवान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्ग प्रकल्पाची पाहणी

भारत सरकार मार्फत सुमारे १ लाख कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारा सुमारे १,४०० किलोमीटर लांबीचा, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *