काँग्रेसच्या आंदोलनावेळी भेट नाकारणाऱ्या मंगलप्रभात लोढा यांचा अखेर १ कोटी रूपयांचा निधी रोहिंग्या बांग्लादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

मागील आठवड्यात मालवणी येथील मुंबई महानगरपालिकेची शाळा खाजगी व्यक्तीच्या खिशात घालण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेस आमदार अस्लम शेख आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी करत आंदोलन केले. तसेच पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना भेटून याप्रश्नी जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काँग्रेसच्या आंदोलकांना भेट दिली नाही. मात्र आता मंगलप्रभात लोढा यांनी रोहिंग्या बांग्लादेशींसाठी मनपा शाळा हडपण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत मालवणी टाऊनशिप स्कूल विकासासाठी एक कोटी रूपयांचा निधी देण्याचे आज जाहिर केले.

मगंलप्रभात लोढा म्हणाले की, मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही संस्था पुढाकार घेऊ शकते. कोणतेही शुल्क न आकारता व्यवस्थापनाची तयारी असल्यास परवानगी देण्यात यावी, असा निर्णय आहे.

या निर्णयानुसार सद्यस्थितीत खाजगी संस्थांच्या सहकार्याने ३० ते ३५ शाळा चालवल्या जात आहेत आणि त्यात मालवणी टाऊनशिप स्कूलचाही समावेश आहे. प्रयास फाउंडेशनच्या पुढाकारामुळे मालवणी भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित होत असेल, तर त्याला विरोध का? असा थेट सवाल ही यावेळी केला.

मुंबई महापालिका मालवणी टाऊनशिप स्कूल येथे प्रयास फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते.

पुढे बोलताना मंगलप्रभात लोढा म्हणाले की, मालाडमध्ये सर्वाधिक सरकारी जमीन होती. त्यावर भीषण अतिक्रमण झाले. आता महापालिकेच्या शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न होतोय का? येथील आमदारांनी काय विकास केला ते त्यांनी सांगावे. मालवणीत इतक्या मोठ्या प्रमाणावर रोहिंग्या आणि बांग्लादेशी कुठून आले? त्यांना इतके सहकार्य कोणी केले? त्या मागचा हेतू काय? असा रोखठोक सवाल केला.

मंगलप्रभात लोढा म्हणाले, आज आम्ही मालवणीत विकासाचे काम करत आहोत. मुलांना उच्च दर्जाच्या सुविधा देत आहोत. या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांची मुले परदेशात शिकतात. लोकांची दिशाभूल त्यांनी करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासनात विकासकामात अडथळा निर्माण कारण्याऱ्यांची दादागिरी सहन केली जाणार नाही असा इशाराही यावेळी दिला.

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत सदर शाळेच्या विकासकामांसाठी एक कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली. या निधीतून विज्ञान प्रयोगशाळा, रोबोटिक्स लॅब, कम्प्युटर लॅब, व्यायामशाळा, खेळांचे साहित्य आणि इतर आवश्यक सुविधा शाळेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासंदर्भातील पत्र लोढा यांनी आजच्या कार्यक्रमात प्रस्तुत करत पुढे म्हणाले की, दर्जेदार सुविधांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नये.

About Editor

Check Also

उदय सामंत यांचे आश्वासन, मुंबईतील उंच इमारतींसाठी अग्निसुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यात येणार विधान परिषदेत अर्धातास चर्चेला उत्तर देताना दिली माहिती

मुंबईमध्ये वाढत्या उंच इमारतींच्या पार्श्वभूमीवर अग्निसुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *