Tag Archives: वर्षा गायकवाड

वर्षा गायकवाड यांची मागणी, पेट्रोल-डिझेलची दरवाढ अन्यायकारक, दरवाढ तात्काळ मागे घ्या पेट्रोल डिझेल टंचाईची झळ मुंबईतही पोहचली, खोटी व दिशाभूल करणारी विधाने करण्यापेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी इंधन पुरवठ्यावर लक्ष द्यावे

महागाईने जनता त्रस्त असताना पेट्रोल डिझेलची दरवाढ ही सर्वसामान्य जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटण्याचा प्रकार आहे. मागील ११ दिवसात पेट्रोल डिझेलचे दर प्रति लिटर ८ रुपयांनी वाढले आहेत. ही इंधन दरवाढ सर्वसामान्यांचा खिसा रिकामा करणारी असून  केंद्रातील भाजपा सरकारने ही अन्यायकारक दरवाढ तात्काळ मागे घेऊन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी मुंबई …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, मंत्र्यांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास लाज वाटते का ? नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस व त्यांच्या मंत्र्यांनी आधी काटकसर करावी व मग दुस-यांना उपदेश द्यावे. परदेश प्रवास टाळा म्हणणारेच परदेश दौऱ्यावर!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल, डीजल वापर कमी करणे तसेच मेट्रो सारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले असले तरी त्यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री व मंत्री त्याकडे कानाडोळा करत आहेत. मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या अर्धी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे पण मुंबई सारख्या शहरात मेट्रो, बेस्ट, लोकल रेल्वे सेवा आहे तर इतर …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा टोला, त्याग व काटकसर मोदींनीव स्वतःपासून करावी पंतप्रधानांच्या सल्ल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस व त्यांच्या मंत्र्यांनीही गाड्यांचा ताफा सोडून मेट्रो, बेस्ट व लालपरीने प्रवास करावा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अखेर देश संकटात आहे हे कबुल करून स्वतःचे अपयश मान्य केले आहे. १२ वर्षांपासून नरेंद्र मोदींनी देशाला वेठीस धरले आहे. निवडणुका, प्रचार व द्वेष पसरण्यापलिकडे भाजपा व मोदी सरकारने काहीही केलेले नाही. अमेरिका-इराण युद्धाचा फटका देशाला बसणार हे माहित असतानाही मोदी सरकारने कोणतेही नियोजन केले नाही, त्याचा मोठा फटका …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, कायदा सुव्यवस्थेप्रश्नी राज्यपालांनी लक्ष घालावे; ‘शक्ती’ कायदा लागू करा मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांची राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडे पत्र पाठवून मागणी

राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने कठोर निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. गुन्हेगारांना भिती बसली पाहिजे अशी शिक्षा झाली पाहिजे. नसरापूरच्या घटनेनंतर आतातरी राज्य सरकारने गंभीर होऊन महिला सुरक्षेवर काम करावे, यासाठी राज्यपाल यांनी जातीने लक्ष घालावे व ‘शक्ती’ कायदा लवकरात लवकर राज्यात लागू करावा यासाठी …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, महिला व मुलींवरील अत्याचार रोखण्यात भाजपा सरकार अपयशी फडणवीसांनी थापा मारण्यापेक्षा कृती करावी, महिला सुरक्षेवर भाजपा सरकार गंभीर नाही, महिला अत्याचार रोखण्यासाठी बनवलेला शक्ती कायदा मोदी सरकारकडे मंजूरीसाठी पडून..

पुण्यातील ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तीची हत्या करण्यात आल्याची घटना संताप आणणारी व माणुसकीला काळीमा फासणारी आहे, अशा नराधमांना फाशीच दिली पाहिजे. राज्यात कायद्याचा धाकच राहिला नसल्याचे सांगण्यास ही घटना पुरेशी आहे. दररोज महिला अत्याचाराच्या घटना होत आहेत पण प्रत्येक घटनेनंतर कडक कारवाई करू व विरोधकांनी राजकारण करू नये …

Read More »

वर्षा गायकवाड यांचे आव्हान, भाजपाला महिलांना आरक्षण द्यायचेच नाही, हिम्मत असेल तर…. तामिळनाडू, प. बंगालमधील विधानसभा निवडणुकीत राजकीय लाभ मिळवण्यासाठी महिला विधेयकाचा अस्त्रासारखा गैरवापर

महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे करून भारतीय जनता पक्ष फक्त राजकीय पोळी भाजण्याचा उद्योग करत आहे. १६ एप्रिलच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक नाही तर मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाचा पराभव झाला आहे, कारण महिला आरक्षण विधेयक तर २०२३ मध्ये सर्वसंमतीने मंजूर झालेले आहे, त्याचा कायदाही बनला आहे, पण त्याची अंमलबजावणी मात्र भाजपा …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, महिला आरक्षणाच्या आडून देश तोडण्याचा भाजपाचा डाव भाजपाकडून संविधानाच्या गाभ्यावर थेट हल्ला, भाजपाचे महिला प्रेम बेगडी; भाजपच्या अध्यक्षपदी व RSS च्या सरसंघचालकपदी महिला का नाही? महिलांना आरक्षण देणारा पक्ष काँग्रेसच..

महिला आरक्षणावरून भाजपा व सत्ताधारी पक्षातील काही घटक पक्षांनी जे आकांडतांडव सुरु केले आहे ते चुकीचे आहे. काँग्रेस पक्षाचा महिला आरक्षणाला पाठिंबाच आहे व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारा पक्ष काँग्रेसच आहे. परंतु भाजपाने महिला आरक्षण विधेयकाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचनेचा घाट घातला आहे, जो देशाचे तुकडे करणारा …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, इंदू मील मधील डॉ आंबेडकर स्मारकास महायुतीकडून वेळकाढूपणा ठोस धोरण व योग्य नियोजन नसल्याने स्मारकास विलंब

भारतीय जनता पक्षाचे सरकार फक्त अदानी अंबानीसाठी असून देश विकण्याचे काम बिनबोभाट सुरु आहे. सरकारकडे कोणतेही निश्चित धोरण, नियोजन व आर्थिक शिस्त नसल्याने अनेक प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाहीत. इंदू मील मधील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासही भाजपा सरकारच्या वेळेकाढूपणाचा फटका बसला आहे. सरकारची इच्छाशक्ती व मानसिकताच नसल्याने स्मारकाचे काम रखडले आहे, असा …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, महापालिकेतील विकासनिधी वाटपात सत्ताधाऱ्यांची दादागिरी विरोधी पक्षातील काँग्रेसशी दुजाभाव पण समाजवादी पक्ष, MIM व राष्ट्रवादी काँग्रेसच्या (श.प.) नगरसेवकांना भरीव निधी, भाजपाचे या पक्षांशी काय हितसंबंध?

मुंबई महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून विरोधी पक्षांच्या नगरसेवकांवर अन्याय केला जात आहे. विकासनिधी वाटप हे सर्व नगरसेवकांना समान प्रमाणात झाले पाहिजे पण बीएमसीतील सत्ताधारी पक्षांच्या नगरसेवकांवर कोट्यवधी रुपयांची खैरात आणि काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची अवघ्या काही लाखात बोळवण करण्यात आलेली आहे. महापालिकेतील पैसा भाजपा शिंदेसेनेच्या पक्षाचा निधी नाही तो मुंबईकरांचा पैसा …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, वरळीतील मोक्याचा भूखंड पंचतारांकित हॉटेलसाठी देऊ नका, लिलाव थांबवा ५ हजार चौरस मीटरचा भूखंड कवडीमोल भावाने देऊन महापालिकेचे कोट्यवधींचे नुकसान, लोकप्रतिनिधींशी चर्चा करून नियमानुसारच व्यवहार करा

मुंबई विकण्याचा भारतीय जनता पक्षाचा सपाटा सुरुच असून महानगरपालिकेच्या सत्तेची चावी हाती येताच मुंबईतील मोक्याचे भूखंड विकण्यास सुरुवात झाली आहे. वरळीतील महत्वाच्या ठिकाणी असलेला ५१६६ चौरस मीटरचा भूखंड अवघ्या ४५५ कोटी रुपयांत लाडक्या बिल्डरचा देण्याचा घाट घातलेला आहे. हा व्यवहार महापालिकेचे नुकसान करणारा असून बिल्डर व सत्ताधाऱ्यांचे खिसे भरणारा आहे. …

Read More »