राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली जिल्ह्यासह कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजानुसार आपत्कालीन परिस्थितीत सर्व जिल्हा प्रशासनांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, …
Read More »मंगलप्रभात लोढा यांचे आदेश, मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे आपत्ती व्यवस्थापन विभागात घेतला मुंबईतल्या स्थितीचाआढावा
गेले तीन दिवस मुंबई परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळित होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पावसाचा वाढता जोर पाहता, आपत्ती विभागाने सज्ज राहावे असे निर्देश त्यांनी या यावेळी विभागाला दिले. मंत्री मंगलप्रभात …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दहीहंडी द्वारे गोविंदा पथकांचा सैन्य दलाच्या शौर्याला सलाम शहर व उपनगरातील विविध दहीहंडी कार्यक्रमांना भेट देऊन नागरिकांना शुभेच्छा
“ऑपरेशन सिंदूर द्वारे भारतीय सैन्य दलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार आणि विचार प्रत्यक्षात उतरवला. पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणे नष्ट करून शत्रूला धडा शिकविला आणि आपल्या शौर्याची जगासमोर प्रचीती दिली आहे. आजच्या या दहीहंडी उत्सवातून गोविंदा पथकांनी सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्याचे सुंदर काम केले आहे,” असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »महावितरणकडून विद्युत सहायकांची परिमंडलनिहाय निवड यादी जाहीर कागदपत्रांची पडताळणी २० ते २२ ऑगस्टला
महावितरणमध्ये विद्युत सहायक पदासाठी निवड झालेल्या ५ हजार ३८१ उमेदवारांची व संबंधित परिमंडलांची यादी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची व प्रमाणपत्रांची पडताळणी संबंधित परिमंडल कार्यालयांमध्ये २० ते २२ ऑगस्ट दरम्यान करण्यात येणार आहे. या उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमूद परिमंडल कार्यालयांमध्ये मूळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे तसेच …
Read More »कोकणनगर गोविंदा पथकाला विश्वविक्रमी १० थर लावल्याने २५ लाखांचे बक्षिस संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात प्रताप सरनाईकांकडून २५ लाखाचे बक्षिस
दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी संस्कृती युवा प्रतिष्ठानच्यावतीने दही हंडी उत्सवाचे आयोजन वर्तकनगर येथे करण्यात आले. या उत्सवात कोकणनगर दही हंडी पथकाने दहा थर लावले. आतापर्यंतची सर्वात जास्त थर लावत एक वेगळाच विक्रम स्थापित केला. त्यामुळे संस्कृती युवा प्रतिष्ठानचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी २५ लाखाचे बक्षिस कोकणनगर पथकास जाहिर केले. …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार कोस्टल रोड उद्या पासून २४ तास खुला
काही वर्षांपूर्वी आपण ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ हे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारात असून वर्षाला किमान ५० किलोमीटरचे मेट्रो मार्ग पूर्ण होत आहेत. तसेच रस्त्यांचे जाळे चांगल्या प्रकारे उभारले जात असून वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका करणाऱ्या दोन महत्त्वाच्या लिंक पुलांचे लोकार्पण करण्यात आले …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, बीडीडीकरांना मिळालेली घरे मुंबईकरांच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात बीडीडी चाळ ५५६ पुनर्वसन सदनिका चावी वितरण समारंभ
मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी शासन सातत्याने काम करीत आहे. आजचा चावी वितरण कार्यक्रमाने शासनाच्या या कार्यपद्धतीवर एकप्रकारे मोहर उमटविली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. बीडीडी चाळ वासियांना पुनर्विकासातून साकारलेल्या ५५६ सदनिकांचे वितरण ही मुंबईकरांच्या हक्काच्या घरांच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. माटुंगा येथील …
Read More »नवाब मलिक यांच्याकडे आता राष्ट्रवादीच्या मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपद अजित पवार आणि सुनिल तटकरे यांनी सोपवली मोठी जबाबदारी...
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावर मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुखमैदान तोफ अशी ओळख असलेले आणि मुंबई अध्यक्ष राहिलेले नवाब मलिक यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी पक्षाचे राष्ट्रीय …
Read More »मुंबईतील कबुतरखान्याचा वाद चिघळला … मराठी आणि जैन समुदायाचे शक्ती प्रदर्शन
दोन दिवसापुर्वी जैन धर्मियांनी दादर येथील कबुतरखाना बंदी संदर्भात आंदोलन केले त्याच्यावर कारवाई नाही. मात्र आज मराठी एकीकरण समितीने आंदोलन करताच पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. त्यामुळे आता कबुतरखान्याचा वाद अधिक चिघळला आहे. जैन मुनींच्या शस्त्र उचलण्याच्या वक्तव्यानंतर हे आंदोलन अधिक तीव्र झाले. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. समितीने कोर्टाच्या निर्णयाचा …
Read More »घरगुती वीज ग्राहकांनी ओलांडला १,००० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचा टप्पा स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सूर्यघर मोफत वीज योजनेतील यशस्वी कामगिरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत महावितरणने यशस्वी कामगिरी केली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला या योजनेच्या अंतर्गत घरगुती ग्राहकांच्या छतावरील सौर ऊर्जानिर्मिती क्षमतेने एक हजार मेगावॅटचा टप्पा ओलांडला. या यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष तथा …
Read More »
Marathi e-Batmya