मुंबई

वर्षा गायकवाड यांचा आरोप, देवेंद्र फडणवीसांच्या बिल्डर मित्रावर सरकार मेहरबान जुहूचा ८०० कोटींचा महापालिकेचा भूखंड बिल्डरच्या घशात

देवभाऊचे सरकार आपल्या लाडक्या बिल्डर मित्रासाठी सर्व नियम व कायदे बाजूला ठेवून सरकारी भूखंड बहाल करत सुटले आहे. जुहूतील एक मोठा भूखंड या सरकारने आपल्या मर्जीतल्या बिल्डर मित्राला बेकायदेशीरपणे दिला आहे. हा भूखंड विशेष माणसाला देण्यासाठी बीएमसीने बुलेट ट्रेनच्या वेगाने मंजुरी देत अवघ्या ४ दिवसात निर्णय घेतला. विशेष म्हणजे एसआरए …

Read More »

दहावी आणि बारावी परीक्षा अर्ज स्वीकारण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ खाजगी विद्यार्थी नाव नोंदणीसाठी मुदतवाढ

फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज (फॉर्म नंबर १७) नियमित शुल्कासह ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखेस ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे. महाराष्ट्र …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, आता नरिमन पॉईंट ते मिरा- भाईंदर अर्ध्या तासात… तब्बल ५ वर्षाच्या पाठपुरावाला यश

केंद्रीय मिठागार मंत्रालयाने आपली जमीन राज्य सरकारला हस्तांतरित केल्यामुळे दहिसर ते भाईंदर हा महामार्ग तयार करण्यातील मोठा अडथळा दूर झाला असून येत्या ३ वर्षात हा मार्ग तयार झाल्यानंतर नरिमन पॉइंट ते मिरा- भाईंदर हे अंतर कोस्टल रोड मार्गे केवळ अर्ध्या तासात कापता येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक …

Read More »

शिवाजी पार्क परिसरातील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना ठाकरे बंधू आक्रमक, समाजकंटकांना अटक करण्याची मागणी

दादर पश्चिममधील छ. शिवाजी पार्क परिसरात असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या स्मारकाची अज्ञाताकडून विटंबना करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी घडला. प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतीदिनी ही घटना घातल्याने एकच खळबळ उडाली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंनी यानंतर पाहणी घटना स्थळाची पाहणी करून आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान, समाजकंटकांना शोधून २४ तासाच्या आत कठोर …

Read More »

सोलापूरच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेला स्वतःची जागाच मिळेना २०२० पासून जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाहण्यासाठी वेळच नाही

राज्यातील गुन्ह्यांचा तपास अतिजलद पद्धतीने करता यावा यासाठी राज्य सरकारने जवळपास विभागातीय आणि प्रत्येक जिल्हा स्तरावर न्याय वैद्यक प्रयोगशाळा उभारण्याचे धोरण तयार केले. त्याअंतर्गत न्यायवैद्यक प्रयोगशाळा तयार करण्याचे धोरणही तयार केले. त्यानुसार सोलापूरात न्यायवैद्यक प्रयोगशाळेची स्थापना राज्य सरकारनेही केली. मात्र या भाड्याच्या जागेत असलेल्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेकरीता स्वतःची जागा असावी याकरिता …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, राज्यात इलेक्ट्रिक दुचाकी सेवेसाठी भाडेदर निश्चित एक महिन्यासाठी प्रोबेशन परवाना दिला

राज्य सरकारने  महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम, २०२५ अंतर्गत राज्यात सेवा देणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडेदर सोमवारी जाहीर केले. त्यानुसार इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींसाठी  पहिला टप्पा दीड  किमीचा असून  किमान  भाडे १५ रुपये  असेल. त्यानंतर प्रत्येक किलोमीटरला १० रुपये २७ पैसे प्रमाणे दर लागू होईल. हा निर्णय तात्काळ लागू होणार आहे. परिवहन मंत्री …

Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांचे अभिनंदन ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ साहित्यिक ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांचे अभिनंदन केले आहे. ‘साहित्य संमेलन म्हणजे अभिजात मराठीचा मानबिंदू‌. वैभवशाली मराठीच्या वाटचालीतील समृद्ध दालन. अशा या संमेलनाची शतकपूर्तीकडे वाटचाल सुरू आहे. या वाटचालीत सातारा येथे नियोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, बीएमसीच्या कामात आधी कंत्राटदार ठरतो नंतर टेंडर निघते गुंदवली टनेल शाफ्ट ते मोडकसागर वाय जंक्शन डोम पर्यंतच्या पाईपलाईनच्या कामात मोठा भ्रष्टाचार, २५०० कोटींचे काम ३५०० कोटींना.- सचिन सावंत

मुंबई महानगरपालिका ही भ्रष्टाचाराचे कुरण बनले असून मुंबईकरांचा पैसा लुटला जात आहे. सत्ताधारी पक्षातील नेते, पालिका अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमताने मुंबईकरांच्या पैशांवर दरोडा टाकला जात आहे. नगरविकास खात्यातून टेंडर निघत असून हे काम कोणाला द्यायचे ते आधीच ठरलेले असते. मर्जीतील कंत्राटदारांनाच टेंडर मिळावे यासाठी काम केले जात असून मुंबईकरांचे …

Read More »

भाजपातर्फे मुंबईत यंदाही भव्य मराठी दांडीयाचे आयोजन पारंपरिक मराठी पेहरावात मराठी दांडियाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा

भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे सलग चौथ्या वर्षी भव्य मराठी दांडीयाचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज मैदान, कन्नमवार नगर, विक्रोळी (पूर्व) येथे करण्यात आले आहे. २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर असे पाच दिवस दररोज सायंकाळी ७ वाजता हा ‘मराठी दांडिया’ होणार असून यावेळच्या दांडियाची थीम ‘ऑपरेशन सिंदूर’ आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अमीत साटम, मराठी दांडियाचे आयोजक व भाजपा प्रदेश कोषाध्यक्ष आ. …

Read More »

आशिष शेलार यांची ग्वाही, मुंबईकरांच्या २५ हजारांहून अधिक इमारतींना ओसी देण्याबाबत धोरण शासन धोरण तयार करणार

महानगरपालिका, नगर विकास विभाग, महसूल विभाग आणि सहकार विभाग यांच्या संयुक्त बैठकीत मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने  मुंबई महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार, म्हाडा, एसआरए आणि इतर प्राधिकरणांनुसार बांधकाम झालेले परंतु विविध कारणांमुळे भोगवटा प्रमाणपत्र (Occupation Certificate) न मिळालेल्या २५ हजारांहून अधिक इमारतींना आता भोगवटा …

Read More »