मुंबई

मुंबईतील प्रवासी जल वाहतूक प्रकल्पांना गती देणार

नवीन प्रवासी जल वाहतूक प्रकल्पांमुळे प्रवाशांचा वेळ व पैसा या दोन्हीची मोठी बचत होणार असल्याने मुंबईतील प्रवासी जल वाहतूक प्रकल्पांना गती देण्यात येत असल्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. मंत्रालयातील दालनात मुंबईतील जलवाहतूक यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री भुसे बोलत होते. यावेळी बंदरे विभागाचे …

Read More »

ईडीने मर्जीने आरोपी निवडले का? ; न्यायालयाने ईडीला झापलं

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना झालेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे ताशेरे विशेष न्यायालयाने ईडीवर ओढत पत्रावाला चाळ प्रकरणात मुख्य आरोपींना अटक करण्याचे सोडून मर्जीने आरोपी निवडले आहेत का? असा सवाल न्यायालयाने ईडीला केला. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात पीएमएलए विशेष न्यायालयाने आज संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या …

Read More »

‘अभ्यासक्रम सुचवा’ स्पर्धेत ६७ हजार विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

आयटीआयच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या ‘सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. कालपर्यंत तब्बल ६७ हजार ९९० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. मागील काही वर्षांपासून आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असून अधिकाधिक विद्यार्थी कौशल्याधारित प्रशिक्षण …

Read More »

विजयानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया: नोटाची मते भाजपाचीच…

शिवसेनेचे आमदार स्व. रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणूकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांचा ६५ हजार मतांनी दणदणीत विजय झाला. मात्र या निवडणूकीत नोटाखाली मोठ्या प्रमाणावर मते मिळाली. त्यामुळे लटके यांच्यानंतर दोन नंबरची मते नोटाला मिळाली आहेत. …

Read More »

एकेरी वाटणारी पण नोटामुळे चुरसीच्या निवडणूकीत ऋतुजा लटके विजयी

अंधेरी पोटनिवडणूकीत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानुसार भाजपाने आपला उमेदवार मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे शिवसेना- उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवार स्व.रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र मतदानाची टक्केवारी पाहता ही …

Read More »

सरन्यायाधीश लळीत म्हणाले, राज्याच्या वतीने झालेला सन्मान हा विठ्ठलाच्या पूजेसारखा

आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या वतीने विठ्ठलाची पूजा होते, तोच सन्मान आज मानपत्राच्या रूपाने मला मिळाल्याची भावना सरन्यायाधीश उदय लळीत यांनी व्यक्त केली. निवृत्तीनंतरही न्याय प्रक्रियेत आवश्यकता असेल तेथे नक्की सहभाग घेऊ असे त्यांनी सांगितले. उदय उमेश लळीत यांची भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते …

Read More »

ऑटो रिक्षा व टॅक्सीचा प्रवास महागला, जाणून घ्या कितीची झाली भाडेवाढ

ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधरकांनी वाहनाचे इलेक्ट्रॉनिक फेर मीटर ३० नोव्हेंबर, २०२२ पर्यंत रिकॅलिब्रेट करुन घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) यांनी केले आहे. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाची नुकतीच बैठक झाली. ऑटो रिक्षा व टॅक्सी धारकांनी आकारावयाच्या भाडेदर वाढीस मान्यता दिली आहे. यामध्ये ऑटो रिक्षांसाठी प्रथम १.५ …

Read More »

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी कोणी विकासक देता का विकासकः पुन्हा मुदतवाढ अदानी ग्रुपला प्रकल्प देण्याच्या हालचाली?

मागील १५ वर्षापासून रखडलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी काही विकासक मिळेनासा झाला आहे. महाविकास आघाडी सरकारने धारावी पुनर्विकास प्रकलासाठी पुढाकार घेतला खरा पण त्याही वेळी एकाही विकासकाने निविदा भरली नाही. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी सरकारला उलथवून टाकत शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा एका या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रियेतील नियमात दुरूस्ती करत पुन्हा निविदा प्रक्रिया …

Read More »

परमबीर सिंह खंडणी प्रकरणातील निलंबित दोन पोलीस पुन्हा सेवेत

राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय बदलण्याचा सपाटाच लावलेला आहे. माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह खंडणी प्रकरणात निलंबित दोन पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत रूजू करून घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांना शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा सेवेत सेवेत समाविष्ट करण्यात आले …

Read More »

बागेसाठी आरक्षित जागेवरील बेकायदेशीर बांधकाम त्वरित थांबवावे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आदेश

आरक्षित जागेवरील बेकायदेशीर बांधकाम त्वरित थांबवून परिसर सील करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. अंधेरी पश्चिम येथील के. ईस्ट वॉर्ड येथे आज झालेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी आमदार अमित साटम, भारती लव्हेकर सर्व विभागाचे अधिकारी आणि …

Read More »