मुंबईः प्रतिनिधी
महाराष्ट्राचे पाणीपुरवठा विभागाचे मंत्री व परतूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर यांनी प्रचारसभेत भाषण करताना “आपण सर्व तांड्यांवर पैसे वाटलेले असल्याने आपल्याला निवडून येण्याची चिंता नाही” असे वक्तव्य केले. तसेच मते मिळवण्यासाठी ते विशिष्ट जातीचा उल्लेख करत आहेत. यावरून निवडणूक जिंकण्यासाठी ते भ्रष्ट मार्गांचा अवलंब करत असल्याचे सिध्द होत असल्याने त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी काँग्रेसच्यावतीने करण्यात आल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते डॉ.रत्नाकर महाजन यांनी दिली.
बबनराव लोणीकर यांच्याविरूद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दखल करून त्यांची उमेदवारी रद्द करण्याबाबत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना पत्र लिहील्याचेही त्यांनी सांगितले.
बबनराव लोणीकर यांच्या संबंधित भाषणाची ध्वनीचित्रफीची लिंक https://drive.google.com/open?id=1fE-6PalEOdr3AcuMe7p13qpFmhZ5m-Q1
Marathi e-Batmya