जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी राहणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी

सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

आज वर्षा येथे कोरोना उपयाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात यावर चर्चा झाली..

लॉक डाऊन मुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे , त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य खरेदी करता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता या बाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळाव्यात असेही यासंदर्भात झालेल्या बैठकीत ठरले.

About Editor

Check Also

संसदीय विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन संसदीय कार्य विभागाच्या प्रकाशित माहितीपुस्तिका सुशासनासाठी उपयुक्त ठरणार

संसदीय कार्य विभागाची स्थापना १ जुलै १९७५ रोजी झाली. सुरुवातीला सामान्य प्रशासन विभागाचा भाग असलेला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *