ममता बॅनर्जी यांचा आरोप, भाजपा केंद्रीय यंत्रणाकडून धमक्या…

मागील काही दिवसांपासून पश्चिम बंगालबरोबरच देशातील इतर राज्यांमधील नेत्यांवर ईडी, सीबीआय, एनआयए आणि सीबीआयकडून धाडसत्र सुरु आहे. तसेच धाडीनंतर सदर नेत्याला या केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांकडून भाजपासोबत जा नाहीतर तुरुंगात जाण्यास तयार रहा अशा धमक्या देण्यात येत असल्याची चर्चा सध्या राजकिय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. यापार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज एका प्रचार रॅलीला संबोधित करताना आरोप केला की, केंद्रीय तपास यंत्रणा टीएमसी नेत्यांना भाजपामध्ये सामील होण्यास किंवा कारवाईला सामोरे जाण्यास सांगत असल्याचा गौप्यस्फोट केला.

पुरुलियातील एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ईडी, सीबीआय, एनआयए आणि आयटी विभाग यासारख्या एजन्सी भाजपाचे “हात” म्हणून काम करत आहेत. “TMC नेत्यांना त्रास देण्यासाठी NIA, ED आणि CBI सारख्या एजन्सीचा वापर केला जात आहे. ते पूर्व माहिती न देता छापे टाकत आहेत आणि घरांमध्ये घुसत आहेत. रात्रीच्या वेळी सगळे झोपलेले असताना त्यांच्या घरात कोणी घुसले तर महिला काय करतील? असा सवालही यावेळी केला.

ममता बॅनर्जी भूपतीनगरमधील शनिवारच्या घटनेचा संदर्भ देत म्हणाल्या की, जिथे एनआयएच्या एका पथकाने बॉम्बस्फोट प्रकरणात दोन आरोपींना पकडण्यासाठी गेले असताना जमावाने हल्ला केला होता. एजन्सी आमच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एकतर भाजपामध्ये जा किंवा कारवाईला सामोरे जाण्यास सांगत आहेत, असा आरोपही केला.

About Editor

Check Also

नाना पटोले यांची मागणी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या राज्य निवडणूक आयुक्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *