मुंबई : प्रतिनिधी महानगरातील ६० चौ.मी चटई क्षेत्र असणाऱ्या घरांसाठी आणि महानगराव्यतिरिक्त इतर शहरे आणि गावांमधील ९० चौ.मी चटई क्षेत्राच्या घरांसाठी जीएसटीचा दर ८ टक्क्यांवरून एक टक्का करण्यात आल्याने अल्प उत्पन्न गटातील लोकांना हक्काचे घर कमी किंमतीत मिळणे शक्य झाले असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. वस्तू आणि सेवा कर …
Read More »पूरामुळे उध्दवस्त झालेल्या भागांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात दोन पथक करणार पाहणी
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्र शासनाची दोन पथके आज दाखल होत आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहसचिव डॉ. व्ही. थिरूपुगझ यांच्या नेतृत्वाखालील सात जणांची ही पथके पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करुन झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. यंदाच्या भीषण पूरपरिस्थितीनंतर राज्य सरकारने ६,८१३ कोटींच्या मदतीचा केंद्र शासनाला प्रस्ताव …
Read More »एससी-एसटीप्रमाणे ओबीसींनाही आरक्षण आणि शिष्यवृत्ती देणार वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचे आश्वासन
मुंबई: प्रतिनिधी ओबीसींना एससी-एसटीप्रमाणे स्कॉलरशिप वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यावर ओबीसींना पदोन्नतीमध्ये आरक्षण दिले जाईल व क्रिमिलेयर काढण्यासाठी शासनस्तरावर एक अभ्यास गट नेमला जाईल. या अभ्यासानंतर जो निर्णय येईल त्या पद्धतीने तत्काळ अंमलबजावणी केली जाईल. ज्याप्रमाणे अनुसूचित जाती-जमातींचे वेगळे बजेट आहे तसेच ओबीसींचेही स्वतंत्र बजेट करून त्यांच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, फ्री …
Read More »बेरोजगारीच्या विरोधात बेरोजगार युवकांचा एल्गार राष्ट्रवादीच्या युवक संघटनेने दीड तास रोखला मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे
पुणेः प्रतिनिधी वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आक्रोश मोर्चा काढत दीडतास मुंबई – पुणे एक्स्प्रेस रोखून धरला. महाराष्ट्रातील बेरोजगारीने होरपळणाऱ्या तरुणांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवेवर आंदोलन करण्यात आले. शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात असतानाही तब्बल दीड तास …
Read More »विधानसभेसाठी भाजपा-शिवसेनेत झटपट युती होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
बीडः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या आधी माध्यमांनी भरपूर चर्चा केली की भारतीय जनता पार्टी – शिवसेना युती होणारच नाही पण आम्ही एका दिवसात युती केली आणि घोषणा केली. आताही विधानसभा निवडणुकीत असेच होईल. तुमच्या लक्षातही येणार नाही, अशी झटपट युती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला. महाजनादेश …
Read More »राज्यातील बेरोजगारीने गाठली परिसीमा; ३२ हजार जागांसाठी ३२ लाख अर्ज सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळेच उद्योग क्षेत्र संकटात असल्याचा वडेट्टीवार यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी आर्थिक मंदीची झळ महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रालाही बसलेली असून औरंगाबाद, नाशिक, पिंपरी चिंचवडमधील मोठ्या कंपन्यांनी उत्पादन कमी केल्यामुळे लाखो कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. भाजप सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळेच हे संकट ओढवले असून सरकारने लक्ष घालून या मंदीची झळ कामगारांना बसणार नाही यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी विधानसभेतील विरोधी …
Read More »कंत्राटदारांच्या फायद्यासाठी सरकार पुरस्कृत टेंडर मॅनेजमेंट रॅकेट मेट्रो भवन कंत्राट घोटाळाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी
मुंबईः प्रतिनिधी राज्यात हजारो कोटींची कंत्राटे वाटली जात असताना मोठमोठ्या कंत्राटांवर सरकारच्या मर्जीतील काही विशिष्ट कंत्राटदारांना कंत्राटे देताना केंद्रीय दक्षता आयोगाची मार्गदर्शक तत्वे पायदळी तुडवून काही खास कंत्राटदारांसाठी नियम वाकवल्याचे दिसून येत आहे. हे क्रोनी कॅपिटालिझमचे मूर्तीमंत उदाहरण असून पारदर्शक म्हणवणा-या सरकारचा भ्रष्ट चेहरा दाखविणाऱ्या या टेंडर घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी …
Read More »१ लाख पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शिवसेना देणार दप्तरे कोल्हापूरात ४९ हजार तर सांगलीत २८ हजार विद्यार्थ्यांना दप्तरे देणार
मुंबईः प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील काही भागात आलेल्या पुरांमुळे अनेक नागरीकांच्या घरांतील सामानाबरोबरच विद्यार्थ्यांचे शालेय साहित्यही वाहून गेले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी अडचण येत आहे. यापार्श्वभूमीवर कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील पूरग्रस्त १ लाख विद्यार्थ्यांना दप्तरे देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त ४९ हजार …
Read More »काँग्रेस -राष्ट्रवादीची सत्तेतील मुजोरी लोक विसरले नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका
अ.नगर-पाथर्डीः प्रतिनिधी भाजपाच्या महाजनादेश यात्रेसोबत राज्यात अनेक यात्रा निघाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन यात्रा आहेत तर काँग्रेसची एक यात्रा सुरू होत आहे. त्यांनी कितीही यात्रा काढल्या तरी त्यांच्या यात्रांना जनता प्रतिसाद देत नाही. कारण पंधरा वर्षे सत्तेत असताना त्यांनी केलेली मुजोरी लोक विसरलेले नाहीत. तुम्ही पंधरा वर्षे त्रास दिलात म्हणून मतदारांनी …
Read More »कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी मुंबई – कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०१९ पर्यंत टोल माफ करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज दिली. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रस्त्यांचा आढावा पाटील यांनी आज घेतला. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद …
Read More »
Marathi e-Batmya