नवी दिल्लीः प्रतिनिधी केंद्रात नव्याने स्थानापन्न झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याचे खाते वाटप आज दुपारी जाहीर करण्यात आले. केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या शिवसेनेच्या वाट्याला अवजड उद्योग विभाग देण्यात आला आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, संजय धोत्रे यांना राज्यमंत्री पद बहाल करत रामदास आठवले यांना पुन्हा …
Read More »मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन जल्लोषात साजरा करणार एमआयएम खा. इम्तीयाज जलील यांची माहिती
औरंगाबादः प्रतिनिधी मी मराठवाड्याचा भूमीपूत्र असून आमदार असतांनाही मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ध्वजवंदनाला हजर राहात होतो. मला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आनंदाने आणि जल्लोषात साजरा करायला आवडेल अशी ग्वाही खा. इम्तीयाज जलील यांनी दिली. आम्हाला जनता रझाकार समजते, आम्ही रझाकार संघटनेचे प्रमुख कासीम रझवी यांना मानतो. या ७० वर्षांपूर्वीच्या घटना आहेत. …
Read More »काँग्रेसच्या आघाडीत मनसे? राज ठाकरे यांच्या भेटीला काँग्रेसचे माणिकराव ठाकरे
मुंबईः प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत भाजपप्रणित आघाडीचा पराभव करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेला थेट आघाडीत सहभागी न करता स्वतंत्र प्रचार करण्यास भाग पाडले. तरीही भाजपचा किमान राज्यात पराभव करता आला नाही. त्यामुळे अखेर आगामी विधानसभा निवडणूका लक्षात घेता मनसेला आघाडीत सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी …
Read More »जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणे ही तर भाजपाची खासियत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा टीका
मुंबईः प्रतिनिधी खोटं बोलत जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणे ही तर भाजपाची खासियत!अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केली. मराठा आरक्षणाबरोबरच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या वैद्यकीय शिक्षणातील आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने फडणवीस सरकारला चांगलेच फटकारले असून सरकारच्या या कारभारावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त …
Read More »विधानसभेलाही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांची महाआघाडी संयुक्त बैठकीत एकत्रितपणे लढवण्याबाबत महत्वपूर्ण चर्चा
मुंबई: प्रतिनिधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या राज्यातील नेत्यांची महत्वपूर्ण बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांची समीक्षा करण्यात आली व आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढविण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस …
Read More »चंद्रकांत खैरेंचे पुर्नवसन करण्यावाचून भाजपाकडे पर्याय नाही पराभवाला शिवसेनेसह भाजपही जबाबदार
औरंगाबादः जगदीश कस्तुरे २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत औरंगाबादेत हिंदू मतांच विभाजन भाजपामुळे झाल्यामुळे माजी खासदार चंद्रकांत खैरेंना निसटता पराभव पत्करावा लागला.ही गोष्ट चंद्रकांत खैरेंनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या लक्षातही आणून दिलेली आहे. यामुळे एम.आय.एम. आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आ. इम्तीयाज जलील यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली. या घटनेमुळे औरंगाबादेत …
Read More »विधानसभा निवडणूकीपूर्वी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न एमआयएमचे नवनिर्वाचित खा. इम्तियाज जलील यांचा आरोप
औरंगाबादः प्रतिनिधी लोकसभेच्या निवडणूकीनंतर काही पक्षाचे पदाधिकारी जनतेमध्ये दहशत पसरवत आहेत. कारण प्रचाराकरिता त्यांच्याकडे मुद्देच नसल्याचा आरोप एमआयएमचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत केला. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना जलील म्हणाले की, औरंगाबादेत विमान, रेल्वे सेवा वाढवण्यावर भर दिला जाईल, कौशल्य विद्यापीठ …
Read More »डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी कठोर कारवाई करा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची मागणी
मुंबईः प्रतिनिधी नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या सर्वांना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. डॉ. पायल नायर हॉस्पिटलमध्ये वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षण घेत होती. तीला राखीव जागेवर प्रवेश मिळाला होता. ही बाब तिच्याबरोबर शिक्षण घेत …
Read More »पंतप्रधान मोदी सरकारच्या कामामुळे व नेतृत्वामुळे भाजपाचा विजय प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांचे प्रतिपादन
मुंबईः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या पाच वर्षात केलेले काम जनतेसमोर होते. या कामामुळे व मोदीजींच्या नेतृत्वामुळे भारतीय जनता पार्टीला लोकसभा निवडणुकीत जबरदस्त विजय मिळाल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी गुरुवारी केले. निवडणुकीत आशिर्वाद दिल्याबद्दल आपण जनतेचे आभार मानतो आणि यशाबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, असे …
Read More »लोकांचा निर्णय राष्ट्रवादी, काँग्रेस महाआघाडीला मान्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे प्रतिपादन
मुंबईः प्रतिनिधी आज जो निकाल आलाय त्यापेक्षा आमची अपेक्षा वेगळी होती. मात्र लोकांनी निर्णय दिला तो राष्ट्रवादी, काँग्रेस महाआघाडीला मान्य आहे. महाआघाडीने जो प्रयत्न केला त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचे आभार… कार्यकर्त्यांना धन्यवाद… आणि लोकांनी जो निर्णय दिला तो आम्ही स्वीकारतो अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद …
Read More »
Marathi e-Batmya