राजकारण

कर्नाटकात आकड्यांच्या खेळातील अतिविश्वास भाजपला नडला येदीयुरूप्पा यांचा दोन दिवसात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

बंगरूळू-मुंबई : प्रतिनिधी नुकत्यात झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीत कर्नाटकी जनतेने सत्तेचा सोपान कोणत्याही पक्षाच्या हाती न देता ती त्रिशंकु अवस्थेत ठेवली. तरीही भाजप नेते येदीयुरप्पा यांनी सत्तेच्या सारीपटावरील आकड्यांचा खेळ जिंकण्यासाठी अतिविश्वास दाखवित सरकार स्थापनेसाठी दावा केला. त्यासाठी राज्यपाल वजूभाई वाला यांनी पूरक भूमिकाही घेतली. मात्र सत्तेच्या सारीपटावरील आकड्यांचा खेळ …

Read More »

कर्नाटकात लोकशाहीचा मोठा विजयाने देशातील राजकीय चित्र पालटणार विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा आशावाद

मुंबई : प्रतिनिधी लोकशाही धाब्यावर बसवून बळकावलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री पद भारतीय जनता पक्षाला अखेर सोडावे लागले असून, हा लोकशाहीचा मोठा विजय आहे. कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी केलेल्या खटाटोपातून भाजपचा लोकशाहीविरोधी चेहरा समोर आला असून, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होऊन देशभरातील राजकीय चित्र पालटणार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी …

Read More »

फसव्या धोरणावर टीकेची झोड उठताच राज्य सरकारला आली जाग शासनाच्या ११ विभागातील भरती ही नियमित स्वरुपाचीच असल्याचा राज्य सरकारचा खुलासा

मुंबई : प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३६ हजारहून अधिक रिक्त असलेल्या जागा भरण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली. परंतु त्यास काही तासांचा अवधी लोटत नाही. तोच या सर्व रिक्त पदे पाच वर्षाच्या कंत्राटी पध्दतीवर भरण्याचा शासन निर्णय आदेश वित्त विभागाकडून जारी केला. राज्य सरकारच्या या फसव्या घोषणेवर सर्वच प्रसार …

Read More »

तांत्रिक कारणाने रखडलेले शिक्षकांचे दोन महिन्याचे पगार ऑफलाईन मिळणार राज्य सरकारकडून अध्यादेश जारी

मुंबई : प्रतिनिधी शालार्थ वेतन प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे पगार मिळण्यात सतत अडचणी येणाऱ्या शिक्षकांना राज्य सरकारने दिलासा दिला असून शिक्षकांचे मे ते जुलैपर्यंतचे वेतन ऑफलाईन पध्दतीने देण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्यानंतर राज्य सरकारने शुक्रवारी याबाबतचा अध्यादेश जारी केला. या अध्यादेशानुसार शिक्षकांबरोबरच शिक्षकेतर …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने लोकशाहीला वस्त्रहरणापासून वाचवले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याकडून न्यायालयाच्या निकालाचे स्वागत

मुंबई : प्रतिनिधी महाभारतातील द्रौपद्री प्रमाणे आज मोदी सरकारच्या कार्याकाळात सातत्याने लोकशाहीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न होत असून मा. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाने लोकशाहीचे वस्त्रहरण होण्यापासून वाचवले अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली आहे. कर्नाटक राज्यात सत्तास्थापन करण्याकरिता तसेच देशपातळीवरील अनेक राज्यांमध्ये सत्तापिपासू वृत्तीने लोकशाहीची …

Read More »

सत्ता आणण्यासाठी भाजपने मर्यादा सोडल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी एखादा राज्यात आपली सत्ता आणण्यासाठी किती टोकाचा प्रयत्न करावा. साम दाम दंड भेदाचा वापर किती करावा. आज भाजपने मर्यादा सोडल्या आहेत अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. प्रत्येक राज्यात भाजपने आपल्या सोयीचं सूत्र वापरलं. भारतातील अनेक राज्य जास्त संख्येने निवडून आलेले …

Read More »

लोकभारतीच्या कपिल पाटील यांच्या विरोधात शिवाजी शेडगे मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेतर्फे शेंडगे यांना उमेदवारी

मुंबई : प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई शिक्षक मतदारसंघ  निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे शिवाजी शेंडगे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे लोकभारती आणि जनता दलचे आमदार कपिल पाटील यांच्याशी त्यांची थेट लढत होणार आहे. शिवाजी शेंडगे हे पेशाने शिक्षक असून गेली १८ वर्षे चारकोपच्या एकविरा विद्यालयात जुनिअर कॉलेजमध्ये …

Read More »

भाजपच्या कर-नाटकीच्या विरोधात काँग्रेसचे लोकशाही वाचवा आंदोलन मुंबईत प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे

मुंबई : प्रतिनिधी कर्नाटक राज्यातील सरकार स्थापनेवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरु असलेल्या राजकिय कुरघोडींना मोठ्या प्रमाणावर ऊत आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपच्या विरोधात काँग्रेस पक्षातर्फे आजचा दिवस राज्यभरात लोकशाही वाचवा (प्रजातंत्र बचाओ) दिवस म्हणून पाळत जात असून लोकशाही विरोधी भाजप सरकारच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेस …

Read More »

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचा आराखडा दोन महिन्यात येणार सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या चिरागनगर येथील आंतरराष्ट्रीय स्मारकाचा आराखडा येत्या दोन महिन्यात प्राप्त होईल त्यांनंतर त्यासाठी लागणारा खर्च आणि पुढील कार्यवाही घोषित केली जाईल अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मंत्रालयात  दिली. अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे ही खूप वर्षांपासूनची मागणी आहे.  या …

Read More »

मिठागरांच्या जमिनी विकासकांच्या घशात घालाल तर सहन करणार नाही शिवसेनेच्या मंत्र्यांचा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत विरोध

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारमधील भाजप-शिवसेनेमधील दरी मोठ्या प्रमाणावर वाढत असून नाणार प्रकल्पानंतर आता मुंबईतील मिठागरांच्या जमिनींच्या अनुषंगाने शिवसेनेने विरोध दर्शविला असून  परवडणा-या घरांच्या नावाखाली मिठागरांच्या जमिनी विकासकांच्या घशात घालाल तर ते आम्ही सहन करणार नसल्याचा इशारा शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतच मुख्यमंत्री …

Read More »