राजकारण

चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा, राज्यात नागरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात येणार, ५० लाख कुटुंबांना लाभ

राज्यातील महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणारा कायदा १९४७ नुसार ठराविक प्रमाणात कमी क्षेत्रफळ असलेल्या जमिनींची खरेदी-विक्री कायद्याने प्रतिबंधित होती. या पार्श्वभूमीवर १ जानेवारी २०२५ पर्यंत शहरी भाग, गावठाण पासून २०० मीटर पर्यंत आणि विविध प्राधिकरणांमधील भागात झालेले सर्व तुकड्यांचे व्यवहार मान्य करण्यात येणार आहेत. अशाप्रकारे एक गुंठेपर्यंत जमिन व्यवहारासाठी …

Read More »

पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात : एसडीआरएफ आणि एनडीआरएफ यंत्रणा सज्ज नागरिकांनी सुरक्षेची काळजी घ्यावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

पूर्व विदर्भातील मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूर्व विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) सज्ज आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात सभागृहात विषय मांडला होता. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पूरस्थितीमुळे …

Read More »

मंत्री दत्ता भरणे यांचे आश्वासन, २००० चौ.फुट सुसज्ज जागा मिळेपर्यंत स्थलांतर नाही आमदार रईस शेख यांच्या मागणीवर मंत्री अल्पसंख्याक विभागाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

उर्दू साहित्य अकादमी हलवण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित करण्यात आला असून, सरकारच्या मालकीची २००० चौ.फुटांची सुसज्ज जागा मिळेपर्यंत अकादमी हलविण्यात येणार नाही, असे अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात मंगळवारी (८ जुलै) भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी विधानसभेत लक्षवेधी …

Read More »

आमदार संजय गायकवाड यांचा वेटरला मारहाण करताचा व्हिडिओ व्हायरल, मुख्यमंत्री म्हणाले… विधिमंडळात व्हिडिओतील आमदार संजय गायकवाड यांच्या मारहाणीचे पडसाद

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडिओत संजय गायकवाड यांच्याकडून आकाशवाणी आमदार निवासातील एका वेटरला मारहाण करतानाचे त्यात दिसून येत आहे. या व्हायरल व्हिडिओचे पडसाद विधिमंडळात उमटले असून त्यावर दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करावी लागली आहे. यासंदर्भात संजय …

Read More »

अंबादास दानवे यांचा आरोप, महाराष्ट्रावर ९ लाख ३२ हजार कोटींचे कर्ज वाढीव पुरवण्या मागण्यांमुळे राज्याची आर्थिक स्थिती ढासळली

राज्यावर ९ लाख ३२ हजार कोटींचे कर्ज झाले असून वाढीव पुरवणी मागण्यांमुळे राज्याची आर्थिक स्थिती ढासळली असल्याचा गंभीर आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारने सादर केलेल्या पुरवण्या मागण्यांवर आज विधान परिषदेत बोलताना केला. राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात ५७ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या, त्या …

Read More »

प्रताप सरनाईक यांची घोषणा, एसटीतील त्या १५ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार विधानसभेत एसटी महामंडळाच्या भांडार खरेदीत घोटाळा प्रकरणी चर्चेत दिली माहिती

राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) पुणे जिल्ह्यातील दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेत भांडार खरेदीत मोठा आर्थिक अपहार उघडकीस आला आहे. विशेष लेखापरीक्षण पथकाने केलेल्या तपासणीत २२ कर्मचारी आणि अधिकारी दोषी आढळले आहेत. यापैकी १५ कर्मचारी आणि अधिकारी सध्या कार्यरत असून, उर्वरित ७ निवृत्त झाले आहेत. निवृत्त कर्मचाऱ्यांवर चौकशी करणे शक्य न झाल्याने …

Read More »

विरोधी पक्षनेते पदावरुन विधानसभेत विरोधकांचा सभात्याग प्रश्नोत्तराच्या तास सुरु होण्याआधीच भास्कर जाधव यांच्याकडून बोलायला सुरुवात

पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होऊन आज दुसरा दिवस सुरु झाला. सकाळी प्रश्नोत्तराचा तासाची घोषणा करताच शिवसेना उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्याच्या विधिमंडळात महाराष्ट्राचे सुपुत्र तथा देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई हे येत आहे. त्या पार्श्वभूमीवर सांसदीय लोकशाही राबविणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेत सरकार आहे पण विधानसभेत विरोधी पक्षनेते पदावरील …

Read More »

आमदार रईस शेख यांची मागणी, बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर कारवाईत पक्षपातीपणा नको त्या त्या भागातील स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रक म्हणून समितीत बोलावले जाईल - मंत्री उदय सामंत

बेकायदेशीर धार्मिक बांधकामांवर कारवाई करताना कोणत्याही विशिष्ट धर्माच्या विरोधात निवडक पद्धतीने पावले उचलू नयेत, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्व मतदारसंघाचे आमदार रईस शेख यांनी राज्य सरकारकडे केली. अनधिकृत धर्मस्थळांच्या कारवाईसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत स्थानिक लोकप्रतिनिधींना स्थान द्यावे, अशी मागणीही यावेळी केली. विधानसभेत भाजपाचे आमदार योगेश सागर यांनी मुंबईतील …

Read More »

अतुल लोंढे यांचा आरोप, निवडणूक आयोगाचे ते परिपत्रक म्हणजे मतचोरीचा पुरावाच विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे आयोगाचे परिपत्रक

महाराष्ट्र व हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सरकार हे लोकांनी दिलेल्या मतदानावर आलेले नाही तर निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करुन आलेले सरकार आहे. मतचोरी कशी केली याचे पुरावे काँग्रेस पक्षाने आयोगाला देऊनही त्यावर काहीच कारवाई होत नाही. काँग्रेस पक्षाने घेतलेले आक्षेप योग्यच आहेत हे आयोग पुन्हा पुन्हा सिद्ध करत …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, विद्यापीठे, अशासकीय महाविद्यालयांमधील रिक्त पदांच्या भरती मान्यता अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के होणार पदभरती

राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठ आणि अशासकीय महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर रिक्त पदे भरल्यास नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनुसार उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील आणि अशासकीय महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर पदभरती रिक्त पदांच्या भरतीस सकारात्मक प्रतिसाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आला. तसेच अभियांत्रिकी शासन अनुदानित संस्थांमध्ये …

Read More »