राजकारण

राज्यातील ५८ शहर-जिल्ह्यासाठी भाजपाकडून अध्यक्षांची नियुक्ती प्रदेश निवडणूक अधिकारी भाजपा आमदार चैनसुख संचेती यांच्या सहीने यादी जाहिर

राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी आदेश दिले. तसेच याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने पुढील चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घ्या असे आदेशही यावेळी दिले.  त्या पार्श्वभूमीवर राज्यातील ५८ शहरे-जिल्ह्यांच्या अध्यक्षांची नियुक्ती भाजपाने जाहिर केली आहे. भाजपा नेते आणि आमदार चैनसुख संचेती यांच्या सहीने या अध्यक्षांची …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, सहकार कायद्यात बदल करण्यासाठी समितीची स्थापना सहकाराचे सक्षमीकरण आणि राज्य शासनाचे धोरण या विषयावरील परिसंवाद कार्यक्रम

सहकार क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम सहकार कायद्यातून झाले पाहिजे. त्यासाठी कायद्यात प्रत्येक क्षेत्राशी निगडित नवीन ‘ प्रकरणे ‘ दाखल करावी लागणार आहेत. सध्या प्रचलित असलेल्या सहकार कायद्यात कालानुरूप बदल करण्याची गरज आहे. त्यासाठी सहकार कायद्यातील आवश्यक बदलांसाठी समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अधिक समन्वयाने काम करणार राज्य सरकारची संरक्षण दलांसोबत बैठकीनंतर दिली माहिती

भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दल आणि राज्य सरकार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत वर्षा निवासस्थानी झाली. या बैठकीत राज्य सरकार संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील सुरक्षेवर आणि सज्जतेवर झालेल्या या बैठकीला …

Read More »

शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांचा ८ पीएमवरून खोचक टोला भारत-पाकिस्ताना शस्त्रसंधीनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आज देशाला संबोधित करणार

मागील महिन्यात पहलगाम येथील बैसरण व्हॅलीत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना प्राणास मुकावे लागले. त्यानंतर या हल्ल्याचा बदला म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना विविध पद्धतीने इशारे देत त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची घोषणा केली. त्यानंतर ७ मेला भारतीय लष्कराने पाकिस्तानस्थित ९ दहशतवादी तळांवर हल्ले करत दहशतवादी तळ उद्धवस्त …

Read More »

महाराष्ट्र हरिजन सेवक संघ अध्यक्षपदी माजी आमदार मोहन जोशी पाच वर्षासाठी प्रदेशाध्यक्ष पदी केली नियुक्ती

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघ, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांची पाच वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शंकर कुमार संन्याल यांनी मोहन जोशी यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच दिले. हरिजन सेवक संघाच्या वतीने आदिवासी भागात वसतीगृहे आणि …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, महाराष्ट्रातील मोटार परिवहन सीमा चौकी लवकरच बंद होणार परिवहन विभागाकडून प्रशासकीय त्रुटी दूर करून सकारात्मक अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार आणि वस्तू व सेवा कर (GST) प्रणालीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने, महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व मोटार परिवहन सीमा चौक्‍या ( RTO border check post) कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा उद्देश आंतरराज्य वाहतूक सुरळीत करणे आणि व्यावसायिक वाहनांच्या हालचाली तील अडथळे दूर करणे हा आहे. अशी माहिती …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, काँग्रेस पक्षाचा व देशाचा डीएनए एकच काँग्रेस पक्ष संपण्याची भाषा करणाऱ्यांना देशाचा जाज्वल्य इतिहास माहित नाही

काँग्रेस पक्षाचा व देशाचा डीएनए एकच आहे, काँग्रेसचा विचार व धोरणे ही भारताची संस्कृती, परंपरा व लोकजीवनातून आलेली आहेत. काँग्रेस पक्षाला एक जाज्वल्य इतिहास आहे, काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व देशात लोकशाही व्यवस्था रुजवली तसेच देशाला वैभव प्राप्त करून दिले असा पक्ष संपत नसतो, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, जगाला हेवा वाटेल असे ज्ञानपीठ आळंदीत उभारणार आळंदीतील ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव कार्यक्रम

प्राचीन भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभरात पोहोचविण्यासाठी आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत जगाला हेवा वाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला ह.भ.प. शांतीब्रम्ह गु. मारुती महाराज …

Read More »

१२ वर्षानंतर बार्टी संस्थेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची माहिती

डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण अर्थात बार्टी संस्थेत मागील १२ वर्षांपासून मानधनावर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यानुसार ४६ टक्के वाढ करण्यात आली आहे. हे कर्मचारी अनेक वर्षापासून मानधनावर काम करत आहे. यावाढीमुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. मंत्री संजय शिरसाट म्हणाले, …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची ग्वाही,…तर काँग्रेस भाजपा विरोधात लढत राहिल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येत असतील तर त्यावर आक्षेप असण्याचे काही कारण नाही. पण यासंदर्भात काही ठोस समोर आल्यावरच त्यावर प्रतिक्रिया देणे उचित होईल. दुभंगलेले पक्ष, मने वा दोन भाऊ एकत्र येत असतील तर हरकत नाही. काँग्रेस पक्ष भारत जोडोचा विचार घेऊन पुढे जात आहे, सर्वांनी एकत्र येताना विभाजनवादी विचाराला …

Read More »