राजकारण

सुप्रिया सुळे यांची मागणी, दहशतवादी हल्ल्यातील कुटुंबियांना शौर्य पुरस्कार द्या कुटुंबातील एकाला शासकिय नोकरी द्या

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील सहा जणांच्या कुटुंबीयांना येत्या महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी ‘नागरी शौर्य’ पुरस्काराने गौरविण्यात यावे. तसेच या कुटुंबातील व्यक्तींना राज्य सरकारने शासकीय नोकरी देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली …

Read More »

शंभूराज देसाई यांची माहिती, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’ पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय

पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल (पर्यटन मित्र)’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन क्षेत्रातील वाढत्या संधी, नैसर्गिक, सांस्कृतिक विविधतेचा विचार करता या सुरक्षा दलाच्या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा अनुभव देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पर्यटन मंत्री शंभूराज …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, शासनाच्या सर्व सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीची ‘दशकपूर्ती’ आणि ‘प्रथम सेवा हक्क’ दिनानिमित्त राज्यस्तरीय सोहळा संपन्न

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अधिकाधिक लोकाभिमुख झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत. १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन करण्यात याव्यात. शासनाचा जो विभाग १५ ऑगस्टपर्यंत त्यांच्या सेवा ऑनलाईन होणार नाहीत, त्या विभागाला दर दिवशी प्रत्येक सेवेकरिता एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. शासनाकडून कोणत्या सेवा नागरिकांना दिल्या जातात याची …

Read More »

मंत्री राजीव रंजन सिंह, मत्स्योत्पादनामध्ये क्रमांक एकचे राज्य होण्याची महाराष्ट्रामध्ये क्षमता देशाचे मत्स्योत्पादन वाढवण्यासाठी सर्व राज्यांनी सहकार्याने काम करण्याची गरज व्यक्त

मत्स्योत्पादनात देशात आज आंध्रप्रदेशचा वाटा ३२ टक्क्यांचा आहे. तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून १३ टक्के हिस्सा महाराष्ट्राचा आहे. हा हिस्सा ३२ टक्क्यांपेक्षा जास्त वाढवून देशातील सर्वाधिक मत्स्योत्पादन करणारे राज्य होण्याची क्षमता महाराष्ट्रामध्ये असून महाराष्ट्राचे तरूण मत्स्यव्यवसाय मंत्री यांनी यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ …

Read More »

विजय वडेट्टीवार यांच्या त्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार

दहशतवाद्यांकडे धर्म विचारण्यासाठी वेळ असतो का? असा सवाल विधानसभेतील  काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी आज केले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी विधाने करणे म्हणजे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे, असेही यावेळी म्हणाले. पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, की पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांच्या नातेवाइकांचे म्हणणे आपण …

Read More »

प्रताप सरनाईक यांचे आदेश, एसटी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका काढा… एसटी महामंडळ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले आदेश

एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी, तसेच भविष्यातील नियोजना करता, एक आर्थिक श्वेतपत्रिका  तयार करावी. असे निर्देश परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. आज एसटीच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, वित्तीय …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, MHT-CET परिक्षेतील घोटाळ्याची चौकशी करा मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवून केली मागणी

महाराष्ट्र सरकारने राज्य सामाईक परिक्षा (MHT-CET) सेल यांच्या माध्यमातून रविवार दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी परीक्षा घेतली. पण या परिक्षेतील घोळामुळे विद्यार्थी व पालकांची चिंता वाढवली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील केंद्रावर ५० गुणांच्या गणिताच्या पेपरमध्ये २० ते २५ प्रश्नांसाठी उत्तराचे पर्याय चुकीचे होते अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. हा अतिशय गंभीर प्रकार …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे निर्देश, महाहौसिंगने परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचा वेग वाढवावा अडचणींवरही मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश

महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ म्हणजेच महाहौसिंगने प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या बांधकामांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. त्यांना येणाऱ्या अडचणींवर शासनाच्या स्तरावरून प्राधान्याने निश्चितपणे मार्ग काढला जाईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. काल सह्याद्री अतिथीगृह येथे महामंडळाच्या कामाचा आढावा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री तथा महामंडळाचे सहअध्यक्ष डॉ. पंकज भोयर उपस्थित …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, औद्योगिक विकास; सुसज्ज कन्व्हेंशन सेंटर उभारणार उद्योग पुरस्कार वितरण सोहळ्या दरम्यान दिली ग्वाही

औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुसज्ज व पुरेशी जागा असलेले औद्योगिक प्रदर्शन व सुविधा केंद्र (इंडस्ट्रियल एक्झिबिशन कम कन्व्हेन्शन सेंटर) उभारण्यात येईल. शेंद्रा आणि बिडकीनला जोडणारा इंडस्ट्रियल रिंगरोड तयार करुन, ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) क्लस्टरसाठी ५ एकर जागा देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. औद्योगिक प्रदर्शन व …

Read More »

एकनाथ शिंदे यांचा इशारा, महाराष्ट्रातून पाकिस्तानी नागरिक ताबडतोब चालते व्हा बुलढाण्यात शिवसेनेकडून आभार सभेचे आयोजन

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचा आदेश दिला आहेत. महाराष्ट्रात पाकिस्तानी नागरिक जिथे असतील तिथून पाकिस्तानात ताबडतोब चालते व्हा, अन्यथा पोलीस तुम्हाला जागेवरच ठोकतील, असा निर्वाणीचा इशाऱा शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिला. बुलढाणा येथे आयोजित आभार सभेत …

Read More »