मागील अनेक वर्षापासून राज्यातील एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला कितीही नफ्यात आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात आला तरी एसटी महामंडळ काही केल्या फायद्यात येताना दिसत नाही. त्यातच एसटी महामंडळाच्या अंतर्गत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीची पैसे पीएफच्या कार्यालयात जमाच केले नसल्याची बाब उघडकीस आली. त्यावरून …
Read More »आदिती तटकरे यांचे निवेदन, लाडकी बहिणीच्या २१०० रूपयांबाबत मुख्यमंत्री निर्णय़ घेतील राज्य सरकारवरील वाढत्या टीकेवरून महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री तटकरेंचे निवेदन
लोकसभा निवडणूकीत राज्यात महायुतीला कमी जागा मिळाल्या. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील मतदारांना आकृष्ट करण्यासाठी विधानसभा निवडणूकीच्या आधी राज्यातील महिलांसाठी मध्य प्रदेशाच्या धर्तीवर लाडकी बहिण योजना जाहिर करण्यात आली. तसेच दर महिन्याला १५०० रूपये देत विधानसभा निवडणूकीच्या कालावधी पुन्हा सत्तेत आल्यानंतर २१०० रूपये देण्याचे आश्वासन महायुतीने दिले. त्यानुसार राज्यातील महिलांनी मोठ्या …
Read More »जयंत पाटील यांची टोला, सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे बडा घर आणि पोकळ वासा महाराष्ट्र आता थांबणार.. एवढं बोलून चालणार नाही
राज्याचा अर्थसंकल्प काल अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केल्यानंतर अर्थसंकल्पावरील चर्चेला आज विधानसभेत सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे बडा घर पोकळ वासा अशी खोचक टीका करत महाराष्ट्र आता थांबणार नाही एवढं बोलून चालणार नाही असा इशाराही यावेळी देत अजित पवार …
Read More »शिवेंद्रराजे भोसले यांची घोषणा, मुंबई-गोवा महामार्गाच्या बांधकामाची त्रयस्त यंत्रणे मार्फत चौकशी मुंबई गोवा महामार्ग जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करणार
मागील काही वर्षापासून रखड़लेल्या मुंबई – गोवा महामार्गाच्या बांधकामाची त्रयस्त यंत्रणे मार्फत इन कॅमेरा चौकशी केली जाईल. यात जे कोणी दोषी असतील त्यांच्या वर कड़क कारवाई केली जाईल. मात्र आता हा महामार्ग जानेवारी २०२६ पर्यन्त पूर्ण केला जाईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी आज विधानसभेत दिले. …
Read More »रस्ते अपघात रोखण्यासाठी ‘अल्कोहोल’ सोबतच आता ‘ड्रग्स’ सेवन तपासणीही करणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची विधानसभेत माहिती
राज्यामध्ये रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवून अपघाती मृत्यू रोखण्यासाठी शासन विविध उपाय योजनांची अंमलबजावणी करीत आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिसांमार्फत नियमितपणे वाहन चालकांची अल्कोहोल सेवन तपासणी करण्यात येते. मात्र यापुढे आता ‘अल्कोहोल’ सोबत ड्रग्स सेवनाची तपासणीही करण्यात येईल. ड्रग्स सेवन तपासणीच्या मशीन लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत …
Read More »नाना पटोले यांची मागणी, धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करु पाहणाऱ्या मंत्र्याला तंबी द्या मटनाच्या दुकानांना सर्टिफिकेट देण्याचा मंत्र्याचा नवा धंदा आहे का? त्यांना कोणी अधिकार दिला?
कोणते मटन कोणत्या दुकानातून व कोणाकडून घ्यावे अशा प्रकारचे फतवे मंत्री काढत असतील तर ते योग्य नाही. मंत्रीच अशा पद्धतीने धर्माधर्मात वाद निर्माण करण्याचे काम करत आहेत, यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल व ते महाराष्ट्रासाठी योग्य नाही. दुकानदारांना सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार मंत्र्याला कोणी दिला? हा नवीन धंदा स्वतःचे खिसे …
Read More »अंबादास दानवे यांचा आरोप, सर्वसामान्य जनता, शेतकऱ्यांना फसवणारे सरकार पीक विम्यात मोठ्या प्रमाणात घोटाळा
सर्वसामान्य जनता, शेतकरी यांची सरकारने दिशाभूल केली असून गुलाबी स्वप्नं दाखवत घोषणांचा मोठया प्रमाणात पाऊस सरकारने केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २६० अनव्ये विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलताना केला. पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, या सरकारच्या काळात शेतकरी सुखी नाही त्यामुळे राज्य सुखी सुखी नाही. शेतमालाला हमीभाव …
Read More »अजित पवार यांची घोषणा,.. तरच गृहनिर्माण सोसायटीच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारुदुकान सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक विधानसभेत केली घोषणा
राज्यात गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारुचे दुकान सुरु करायचे असेल तर यापुढे संबंधित सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक राहील. सोसायटीच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’शिवाय राज्यात नवीन बियर शॉपी किंवा दारु दुकान सुरु करता येणार नाही, अशी रोखठोक आणि स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जाहीर केली. अजित पवार …
Read More »पाच वर्षांत जाहीरनाम्यातील सर्व संकल्प महायुती सरकार पूर्ण करणार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही
विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये केलेले सर्व संकल्प येत्या पाच वर्षांत महायुतीचे सरकार पूर्ण करेल, तसेच कोणतीही योजना बंद होणार नाही अशी ग्वाही भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांनी मंगळवारी दिली. अमरावती जिल्हा शिक्षक महासंघ अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांच्यासह राज्यातील अनेक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भाजपा प्रवेश प्रसंगी बावनकुळे बोलत …
Read More »भोंग्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा, सरसकट परवानगी नाही एमपीसीबीला कारवाई, पोलिस निरिक्षकावर प्रमुख जबाबदारी, उल्लंघन करणाऱ्यांस पुन्हा परवानगी नाही
राज्यातील मंदीर मस्जिदीवरील भोंग्याच्या माध्यमातून ध्वनी प्रदुषणाबाबतचा मुद्दा भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी यासंदर्भातील प्रश्न लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता मंदिर आणि मस्जिदीवरील भोंग्याच्या ध्वनी प्रदुषण होत आहे. त्यामुळे यापुढे किमान पातळी ४५ डेसिबल आणि ५५ डेसिबल या मर्यादेत ठेवण्याची जबाबदारी …
Read More »
Marathi e-Batmya