राजकारण

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप, भाजपामुळेच अक्षय शिंदे याचा एन्कांऊटर बदलापूर लैगिंक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्कांऊटर प्रकरणी अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट

बदलापूर येथील दोन लहान मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची निगडीत संस्थेचा अध्यक्ष आपटे याच्या आदर्श शाळेतील शिपाई याला अक्षय शिंदे यास पोलिसांनी अटक केली. मात्र आपटे याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. परंतु अक्षय शिंदे याला उशीराने का होईना अटक करून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. परंतु न्यायालयातून त्याला …

Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झ्युरिचमध्ये उत्स्फूर्त स्वागत मराठी बंधु-भगिनींचे प्रेम अनमोल, मला या प्रेमातच राहायचे आहे!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झ्युरिक, स्वित्झर्लंड येथे बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडतर्फे नुकतेच स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वैश्विक मराठी परिवारातील आपल्या मराठी बंधु-भगिनींशी मनमोकळा संवाद साधला. बृह्न महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडच्या प्रेमाचे मोल नाही, मला या प्रेमातच राहायचे आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्री …

Read More »

राहुल गांधी यांच्या त्या वक्तव्यप्रकरणी गुन्हा दाखल फाईटिंग इंडियन स्टेट वक्तव्य प्रकरणी आसाममध्ये गुन्हा

राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात भाषण करताना फाईटिंग इंडियन स्टेट असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यावरून नुकसाच आसामची राजधानी गुवाहाटी येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मोनजीत चेतिया नावाच्या व्यक्तीने ही तक्रार दाखल केली, ज्याने गांधींवर “अस्थिरता आणि फुटीरतावादी भावनांना उत्तेजन देणारी धोकादायक …

Read More »

सुनिल तटकरे यांचे प्रतिपादन, आता संघर्षाचे दिवस संपले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळवून द्या

पक्षाला विधानसभेत जो स्ट्राईक रेट दिलात त्यापेक्षा जास्त आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळवून द्यायचा आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केले. पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, आता संघर्षाचे दिवस संपले असून आपल्याला उद्याच्या २५ वर्षाचा पक्षाचा भक्कम पाया या शिबिरातून घेऊन जायचा आहे. इथला …

Read More »

अजित पवार यांचे आवाहन, त्या अजेंडयापासून तसूभरही मागे पडायचे नाही नेत्यांसोबत फिरण्यापेक्षा लोंकासोबत फिरा

महाराष्ट्राचा विकास हाच आपला अजेंडा आहे. त्या अजेंडयापासून तसूभरही मागे पडायचे नाही असे सांगतानाच राज्याचे हित हेच आपले टार्गेट असले पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिर्डी येथील नवसंकल्प शिबिरात केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसाच्या नवसंकल्प शिबीराची सांगता रविवारी (१९ जानेवारी) झाली. यावेळी मार्गदर्शन …

Read More »

धनंजय मुंडे यांचा दावा, मला ठरवून टार्गेट केले जातेय, पण मी अभिमन्यु नाही, मी अर्जुन स्व.संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा - मुंडेंची राष्ट्रवादी नव संकल्प शिबिरातून मागणी

मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजित पवारांच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे सोबत उभा राहिलो. पक्षाच्या वाईट काळात वेगवेगळी आंदोलने, यात्रा आदींच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र आता बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकरणा आडून मला जाणीवपूर्वक ठरवून टार्गेट केले जात आहे. महायुतीतील नेत्यांकडूनच मला लक्ष्य केले जात आहे, याचेच …

Read More »

२६ जानेवारीला ध्वजवंदनसाठी कोणता पालकमंत्री कोठे उपस्थित राहणार जिल्हानिहाय ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर

भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी ८.३० ते १० या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ आयोजित …

Read More »

स्वामित्व योजनेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सनद वितरणाचा शुमारंभ महाराष्ट्रात राज्यपाल तसेच मुख्यमंत्री यांच्या हस्ते सनद वितरण

स्वामित्व योजनेद्वारे देशातील जनतेच्या उत्पन्नात वाढ होत असून यामुळे त्यांच्या आशा-आकांशा पुर्ण करत आहे. स्वामित्व योजनेंतर्गत जनतेला देण्यात आलेल्‍या कायदेशीर सनदेमुळे त्यांना मदत होत असून या सनदेच्या आधारे बँकेतून कर्जाद्वारे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालयामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, मुंबईत सेलिब्रिटी आणि गावात सरपंच सुरक्षित नाही… काय अवस्था? अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याला धर्माच्या दृष्टीकोनातून पाहू नका

महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झाले आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. दिल्लीत आज महाराष्ट्राची चर्चा जंगलराज म्हणून होत आहे हे दुर्दैवी आहे. भाजपा सरकारने महाराष्ट्राला कलंकीत करण्याचे काम केले असून सत्तेसाठी दहशत निर्माण करण्याचे काम भाजपाने थांबवले पाहिजे. राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली असून मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत आणि गावात सरपंच …

Read More »

अंजली दमानिया यांच्याकडून मुंडे-कराड चा आणखी एक पुरावाः केली राजीनाम्याची मागणी राख विक्रीच्या कंपनीत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड भागिदारी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी आणि परळी तालुक्यातील दहशतीवरून मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील कथित आर्थिक संबध आणि वाल्मिक कराडच्या पाठिशी धनंजय मुंडेच असल्याचे आतापर्यंत उघडकीस आले आहे. यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज आणखी एक पुरावा दाखवत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा तात्काळ घ्यावा …

Read More »