राजकारण

नाना पटोले यांच्या विरोधात शिवसेना उबाठाची नाराजी तर नाना पटोले म्हणाले ते मोठे… अंबादास दानवे आणि संजय राऊत यांच्यावर केला पलटवार

विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर इच्छुक आयाराम गयारामांचे पक्ष प्रवेशाचे सोहळे सुरू झाले आहेत. त्यातच महाविकास आघाडीतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना उबाठा नेत्यांमध्ये जागा वाटपावरून पहिली ठिणगी पडली आहे. आज सांगोल्याचे दिपक आबा साळुंखे यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी काँग्रेस …

Read More »

उमेदवारीसाठी राज पुरोहित समर्थकांचे प्रदेश भाजपा कार्यालयामोर धरणे आंदोलन भाजपाचे प्रदेश पदाधिकारी गेले कार्यालय सोडून

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच विविध राजकीय पक्षांमधील कार्यकर्त्ये आणि नेत्यांची उमेदवारीसाठी धावपळ सुरु झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणी तिकीट नाकारण्यात आलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील माजी कॅबिनेट मंत्री राज के पुरोहित यांनी संपूर्ण राजस्थानी समाजालाच नव्हे तर या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचे आवाहन …

Read More »

रिपाईचा डेमोक्रेटीक टीएम कांबळे ग्रुप लढणार विधानसभेच्या १० जागा आरपीआय डेमोक्रेटीकचे कनिष्क कांबळे यांची माहिती

नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी रिपाई अर्थात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटीक) पक्षाच्या वतीने २८८ विधानसभा मतदारसंघापैकी मुंबई, विदर्भासह मराठवाडयातील दहा जागा लढवणार असल्याची घोषणा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा नंदाताई टी. कांबळे यांच्या आदेशानुसार पक्षाच्या युवक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष कनिष्क टी. कांबळे यांनी जाहिर केले आहे. पक्षाची मुंबई, विदर्भ व मराठवाडयात …

Read More »

भाजपाच्या व्होट जिहादमुळे अजित पवार गटाचे उमेदवार धोक्यात निवडणूक आयोगाकडूनही व्होट जिहाद शब्दावर आक्षेप

नवीनकुमार लोकसभा निवडणूकीच्या काळात भाजपाने ४०० पारचा नारा दिला होता. मात्र राज्यातील महाविकास आघाडी आणि राष्ट्रीयस्तरावरील इंडिया आघाडीने भाजपाचा वारू रोखून धरला. त्यामुळे भाजपाने मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्यासाठी व्होट जिहाद चा मुद्दा निर्माण केला. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला एक गठ्ठा मते दिली. त्याचा फायदा महाविकास …

Read More »

वर्षा गायकवाड यांचे आशिष शेलार यांना आव्हान, धारावी प्रकरणी चर्चेची तयारी धारावी प्रकल्पाच्या नावाखाली मुंबईत सर्वात मोठा जमीन घोटाळा, भाजपा नेते अदानीचे एजंट आहेत का ?

पंतप्रधानांच्या लाडक्या उद्योगपतीला मुंबई विकण्याचे षडयंत्र असून मागील महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठका ह्या अदानीला जमीन देण्यासाठीच घेतल्या का, अशी शंका येत आहे. मुंबईतील हा मोठा जमीन घोटाळा असून एका व्यक्तीसाठी केंद्र व राज्य सरकार काम करत आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांचा धारावी प्रकल्पाचा अभ्यास नाही, त्यांनी अभ्यास करून बोलावे …

Read More »

राजन तेली आणि दीपक आबा साळूंखे पाटील यांचा उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश शिवसेना उबाठातील प्रवेशाने दिपक केसरकर आणि शहाजीबापू पाटील यांच्या जागा धोक्यात

काही दिवसांपूर्वी जळगांवमधील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला. त्यावेळी भाजपाला मोठा हादरा बसला. त्यावेळी भाजपाच्या नेत्यांनी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश करू नये यासाठी मनधरणीही केली. मात्र आज कोकणातील भाजपाचे नेते नारायण राणे यांचे खंदे समर्थक राजन तेली यांनी आणि सांगोल्यातील काय झाडी काय डोंगार फेम शहाजी बाजू पाटील …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, शरद पवार दुबईमध्ये दाऊदला भेटले कॅलिफोर्निया आणि दाऊदला भेटण्यासाठी केंद्र सरकारची पवारांना परवानगी होती का ?

शरद पवार १९८८-९१ या काळात मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या एका दौऱ्यामध्ये त्यांनी दाऊद इब्राहिमची भेट घेतल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत केला. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, १९८८-९१ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते. त्यातील त्यांचा एक दौरा होता लंडनला. तिथून …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, मविआच्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचे भाजपा-शिंदे सेनेचे षडयंत्र महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक अधिका-यांची भेट

विधानसभा निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक झाली पाहिजे, मतदान वाढले पाहिजे असे निवडणूक आयोग सांगत असते पण निवडणूक आयोगाच्या कामातच पारदर्शकता व निष्पक्षपातीपणा दिसत नाही. सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर अधिकारी काम करत आहेत. ऑनलाईन फॉर्म ७ च्या माध्यमातून मविआच्या मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात मतदार यादीतून वगळली जात आहेत, यामागे एकनाथ शिंदे व …

Read More »

प्रविण दरेकर यांचे आव्हान, धमक असल्यास जरांगेंनी निवडणूक लढवावी देवेंद्र फडणवीस यांच्या नावची काविळ

सगळ्या आंदोलनातून जरांगे भरकटल्या सारखे वाटताहेत. आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाचे हित हेच सर्वोच्च प्राधान्य असेल असे वाटले होते. मराठ्यांचे आरक्षण आणि त्यांचे प्रश्न यावर न बोलता जरांगे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने आक्रोश, टाहो फोडताना दिसताहेत हे दुर्दैवी आहे. कुणाची तरी सुपारी घेतल्यासारखे जरांगे यांचे बोलणे सुरू आहे. त्यांच्यात धमक असेल …

Read More »

बच्चू कडू यांचा सवाल, तुम्ही कसले परिवर्तन आणणार… तिसऱ्या आघाडीचा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल

पवार साहेब म्हणतात परिवर्तन आणू, तुम्ही कसलं परिवर्तन आणणार आहात? तुम्ही इतके दिवस सत्तेत होते, मग आता कसं काय परिवर्तन तुम्ही करणार? असा सवाल करत तिसऱ्या आघाडीचे आमदार बच्चू कडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना करत परिवर्तनाचा अधिकार महायुतीला नाही आणि आघाडीलाही नाही. परिवर्तनाची भाषा करण्याचा अधिकार आम्हाला …

Read More »