महायुती सरकरच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मिळणारी प्रचंड लोकप्रियता पाहून उद्धव ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाची भीती वाटू लागली आहे. त्यामुळेच ते या योजनेवर टीका करून गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत, असा हल्लाबोल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यलयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा …
Read More »मराठा आरक्षणप्रश्नी शरद पवार यांचे मोठे वक्तव्य… तर आम्ही पाठिंबा देऊ ५० टक्क्यांच्या वरील आरक्षणाचं धोरण बदललं पाहिजे
आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. केंद्राने हे धोरण बदललं पाहिजे. केंद्र सरकारने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. केंद्र सरकारने धोरण बदलण्याची भूमिका घेतली तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडली. शरद पवार पुढे …
Read More »एटापल्ली नक्षल्यांचा पत्रक वाटून राज्य सरकारला इशारा एटापल्ली तालुक्यातील नक्षलवादी आक्रमक
अधुरा सपना पुरा करेंगे, असा इशारा नक्षल्यांनी गडचिरोली जिल्ह्यात पत्रकं वाटले आहेत. नक्षली चळवळीवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे नक्षलवादी आता आक्रमक झाले आहेत. अलीकडे झालेल्या एटापल्ली तालुक्यातील चकमकीत 12 माओवादी ठार झाले होते. नक्षल्यांनी वाटलेल्या पत्रकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यात आले आहे. अजित पवार 23 …
Read More »खासदार सुप्रिया सुळे मोबाईल हॅक एक्स अकाऊंटवरुन दिली माहिती
लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअप हॅक झालं आहे. त्यांनीच आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसेच कोणीही मला फोन अथवा मेसेज करु नका असं आवाहनही त्यांनी केलं आहे. सुप्रिया सुळेंच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन दुपारी एक वाजता करण्यात आलेल्या पोस्टमध्ये त्यांनी, “अत्यंत महत्वाचे” असं …
Read More »माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचे निधन मुत्सद्देगिरीतील अनुभवाचा खजिना राजकीय कारकीर्दीत आणणारे ते करिअर डिप्लोमॅट
माजी परराष्ट्र मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नटवर सिंह यांचे शनिवारी रात्री उशिरा निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. नटवर सिंह हे अनेक दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर दिल्लीजवळील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय होते आणि त्यांच्या …
Read More »राज्यातील नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांची मंजुरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल यांचे मानले आभार
राज्यातील नार-पार-गिरणा हा प्रकल्प ७०१५ कोटी रुपयांचा असून, यात पश्चिमी वाहिनी नदीखोर्यातून १०.६४ टीएमसी पाणीवापर प्रस्तावित आहे. या प्रामुख्याने लाभ नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील ४९,५१६ हेक्टर सिंचन क्षेत्राला होणार आहे. यात नाशिक जिल्ह्यातील कळवण, देवळा आणि मालेगाव तालुक्यातील २५,३१८ हेक्टर आणि जळगाव जिल्ह्यातील १७,०२४ हेक्टर सिंचन क्षेत्राला लाभ होणार आहे. …
Read More »लाभाच्या योजनांसाठी दोन अपत्यांची अट कायम करा खा. डॉ. अनिल बोंडे यांनी राज्यसभेतून सरकारकडे मागणी
केंद्र शासनाकडून राबविण्यात येणार्या गरीब कल्याण योजनेसह अन्य सर्व लाभाच्या योजनांसाठी इतर सगळ्या अटींसह दोन अपत्यांची अट (अपवाद दुसर्यावेळी झालेले जुळे अपत्य) त्यात ठेवण्यात यावी, अशी मागणी खा. डॉ. अनिल बोंडे यांनी राज्यसभेतून सरकारकडे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याण योजना सुरू केली. या योजनेचे लाभार्थी ८० कोटी …
Read More »विधानसभा निवडणुकीत मविआला १८५ पेक्षा जास्त जागा कॉंग्रेस पक्षच मोठा बनणार
महायुती सरकार हे घोटाळ्याचे सरकार असून या असंवैधानिक सरकारच्या विरोधात जनतेत प्रचंड रोष आहे. कामांची कंत्राटे देताना ५० टक्के कमिशन घेतले जाते, या कमीशनखोर सरकारला सत्तेतून बाहेर काढले पाहिजे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले तसेच यश विधानसभेलाही मिळावे यासाठी कामाला लागा, एकजूट होऊन लढा विजय आपलाच आहे, असे …
Read More »राज्यात महायुतीच्या सत्तेसाठी कार्यकर्त्यांनी कार्य करावे – कपिल पाटील टिटवाळा मंदिर परिसराचे सुशोभीकरण
राज्यात महायुतीची सत्ता पुन्हा आणण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कार्यरत राहावे. तसेच कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ पुन्हा जिंकण्याचे लक्ष्य ठेवावे, असे आवाहन माजी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी गुरुवारी येथे केले. त्याचबरोबर केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून टिटवाळा येथील श्री महागणपती मंदिर परिसराच्या सुशोभीकरण करण्यात येईल, अशी ग्वाही कपिल पाटील …
Read More »जया बच्चन यांच्या आरोपांवर नड्डांनी नोंदवला आक्षेप जया बच्चन यांच्या आरोपांवर नड्डांनी नोंदवला आक्षेप
समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्याशी केलेला वाद आणि त्यानंतर बच्चन यांनी केलेले आरोप यावर सभागृह नेते जेपी नड्डी यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. राज्यसभेच्या कामकाजादरम्यान शुक्रवारी जया बच्चन यांनी सभापती जगदीप धनखड यांच्यावर गंभीर आरोप केले. बच्चन म्हणाल्या की, “मी जया अमिताभ बच्चन, आज …
Read More »
Marathi e-Batmya