समग्र शिक्षा अभियान आणि दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेंतर्गत २००६ पासून सेवेत असणाऱ्या ३१०५ विशेष शिक्षकांना सामावून घेण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. राज्यातील केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी शिक्षण विभागाला दिले. दरम्यान, २००५ पूर्वी टप्पा अनुदानावर कार्यरत असलेल्या २६ हजार ९०० शिक्षकांना जुनी पेन्शन …
Read More »राज्यातील भटक्या जमातीमध्ये नव्या जातींचा समावेश शासन निर्णय जारी
राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती/ भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील जातीच्या यादीमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार शासनाने काही नवीन जातींचा अंतर्भाव करून तसेच काही जातींची नावे वगळून अद्ययावत यादी तयार केली आहे. नव्या बदलानुसार यापुढे ” ठेलारी” ही जात ‘भटक्या जमाती (ब)’ यादीतील अ.क्र. २७ येथून वगळून ‘भटक्या …
Read More »७ ऑगस्टला वंचितकडून मंडल विजय दिवस साजरा होणार आरक्षण बचाव यात्रेची औरंगाबाद शहरात मोठी बॅनरबाजी
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात २५ जुलै रोजी मुंबई चैत्यभूमी येथून आरक्षण बचाव यात्रेची सुरुवात झाली. त्या यात्रेची सांगता औरंगाबाद येथे ७ ऑगस्ट रोजी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात ५५ लाख कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, ओबीसींचे १०० आमदार निवडून आणणार अशा आशयाचे बॅनर ठिकठिकाणी …
Read More »विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि परतीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांची परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा बांग्लादेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता आणि परतीसाठी उपाययोजना
बांग्लादेशातील नागरी अशांततेच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मायदेशात त्यांच्या परतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची पाऊले उचलली आहेत. या विद्यार्थ्यांना तातडीची मदत उपलब्ध होणे आणि त्यांची भारतात परतण्यासंदर्भातील आवश्यक कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला. बांग्लादेशातील अशांततेमुळे परदेशी नागरिकांच्या, विशेषतः अशांत भागात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, …आरक्षणप्रश्नी गर्जना करणाऱ्या फडणवीसांनी १० वर्षे काय केले? महाराष्ट्रातील आरक्षणाचा पेच पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवावा
राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नाचा पेच हा भारतीय जनता पक्षाने निर्माण केला आहे. २०१४ साली देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा, धनगर, आदिवासी समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरही फडणवीस यांनी राणाभीमदेवी थाटात गर्जना करत, सत्तेत आलो तर २४ तासात आरक्षणांचा प्रश्न सोडवतो अशी वल्गना केली होती पण १० वर्ष केंद्रात व राज्यात …
Read More »बांग्लादेशातील परिस्थितीबाबत भारतातील सर्वपक्षिय नेत्यांची बैठक पार पडली १२००० ते १३००० भारतीयांना बाहेर काढण्याची आवश्यकता पण बांग्लादेशातील परिस्थिती चिंताजनक नाही-एस जयशंकर
बांग्लादेशातील विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनामुळे माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज भारतातील सर्वपक्षिय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संबोधित करताना म्हणाले की, हिंसाचारग्रस्त देशातील १२,०००-१३,००० भारतीयांना बाहेर काढण्याची आवश्यकता पण बांग्लादेशातील परिस्थिती चिंताजनक नाही, असे सूत्रांनी सांगितले. …
Read More »शेख हसीना यांनी मागितला लंडनमध्ये आश्रय, पण अद्याप निर्णय नाही आश्रयाचा निर्णय होत नाही तोपर्यंत भारतातच राहणार
बांग्लादेशातील विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनानंतर देशातून पळून गेलेल्या बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या आणखी काही दिवस भारतात राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. माजी पंतप्रधान हसीना शेख यांनी लंडनमध्ये राजकिय आश्रय मागितला आहे. मात्र लंडनने अद्याप त्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे हसीना शेख या आणखी काही दिवस भारतात राहणार असल्याचे …
Read More »राज ठाकरे यांची स्पष्ट भूमिका, महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांची निदर्शने
महाराष्ट्रात सर्वच गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत की राज्याला आरक्षणाची गरज नाही, अशी भूमिका स्पष्ट करत पैशाचे योग्य नियोजन केले तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असे स्पष्ट भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोलापूरमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली. त्यानंतर राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर सोलापूरात मराठा आंदोलकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, पुराचा धोका कायमस्वरुपी दूर करण्यासाठी नवीन धोरण एकनाथ शिंदे यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरबाधित नागरिकांशी संवाद साधला. पुराचा धोका कायस्वरुपी दूर करण्याकरिता तसेच पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शासनाच्यावतीने नवीन धोरण आणण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांनी पाटील इस्टेट, शिवाजीनगर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक …
Read More »भाजपातर्फे ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यभर ‘ हर घर तिरंगा ’ अभियान १ कोटी घरांवर तिरंगा लावण्याचा संकल्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ जुलै च्या ‘ मन की बात ’ मध्ये ‘हर घर तिरंगा ’अभियान साजरे करण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार भाजपातर्फे राज्यभरात ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘ हर घर तिरंगा ’ अभियान मोठ्या उत्साहात साजरे करणार असल्याची माहिती ‘हर घर तिरंगा ’ अभियानाच्या प्रदेश संयोजक आमदार उमा खापरे …
Read More »
Marathi e-Batmya