सरकारच्या आशिर्वादाने राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरू आहे. मराठा समाजाची, शेतकऱ्यांची सरकारने घोर फसवणूक केली आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत. घोटाळेबाजांचे, कंत्राटदारांचे सरकारने हित जोपासले आहे. गंभीर पाणी प्रश्नाकडे सरकारने जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी सामाजिक तेढ निर्माण केले आहे. सरकारच्या या नाकर्तेपणामुळे राज्याची प्रतिमा मलिन होत आहे. …
Read More »विजय वडेट्टीवार यांचे सूचक वक्तव्य, एखादा आंदोलक असे आरोप करत असेल तर…
अंतरावली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे आंदोलन सुरु केले. परंतु मागील दोन-तीन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे एकेकाळचे सहकारी अजय बावसकर यांनी जरांगे पाटील यांच्यापासून वेगळं होत मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यपध्दतीवरच आरोप करण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील …
Read More »मनोज जरांगे पाटील गंभीर आरोप करत म्हणाले, माझा बळी हवाय, मग सागर…
राज्यातील मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीनुसार राज्य सरकारने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेत मराठा समाजाला स्वतंत्र ईडब्लूएस अर्थात अल्प उत्पन्न गटाखालील प्रवर्गात १० टक्के आरक्षण देण्याचा ठराव एकमताने पारित केला. तत्पूर्वी सगेसोयऱ्यांनाही आऱक्षणाचा लाभ देण्याविषयीचा स्वतंत्र दुरूस्तीची अधिसूचनाही पारित केली. त्यानंतरही अंतारावली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी …
Read More »नाना पटोले यांचा इशारा, १० वर्ष देशाला फसवणाऱ्या मोदी सरकारचे काऊंटडाऊन…
नरेंद्र मोदी यांच्या सरकारने १० वर्षात देशाचे नुकसान केले, मोदींनी दिलेली गॅरंटी ही खोटी ठरली आहे. दरवर्षी २ कोटी नोकऱ्या, १५ लाख रुपये, महागाई कमी करणार व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार यासारख्या अनेक गॅरंटी मोदींनी दिल्या पण त्यातील एकही पूर्ण केली नाही. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांना …
Read More »नव्या संसदेत मंजूर झालेला नवा भारतीय दंडसंहिता कायदा १ जुलै पासून
काही महिन्यांपूर्वी देशातील गुन्हेगारीला रोखण्यासाठी लागू असलेले ब्रिटीश काळातील कायदे रद्द करून त्याठिकाणी पूर्णतः भारतीय कायदे लागू करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लागू केली होती. तसेच हे कायदे लागू करण्यासाठी नव्या वर्षाच्या अर्थाच्या २०२४ पहिल्या महिन्यापासून लागू होणार असल्याची घोषणा केली होती. परंतु दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहन …
Read More »जयंत पाटील म्हणाले, भविष्यातल विजयाचं रणशिंग रायगडावरून…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह दिल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांनी आभार मानले. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आभार मानले पाहिजे, त्यांनी आम्हाला तुतारी हे चिन्ह दिले. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचं रणशिंग आज राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार फुंकणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानवंदना दिली, त्यांच्यासमोर नतमस्तक …
Read More »राज ठाकरे यांची टीका, नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचय म्हणून वाटेल ते…
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकिय पक्षांकडून पक्षसंघटना मजबूतीसाठी त्यांच्या पक्षवाढीसाठीच राजकिय पक्षांकडून तयारी करण्यात येत आहे. याच अनुषंगाने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवली आणि भिवंडीतील मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर उपस्थित प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी भाजपासह शरद पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडले. प्रसारमाध्यमांशी संवाद …
Read More »काँग्रेस- आम आदमी पार्टी जागा वाटपावर शिक्कामोर्तब; दिल्लीत सोबत, पंजाबात…
एकाबाजूला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा सुरु आहे. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी लोकांच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या कारभाराचे वाभाडे काढण्यात येत आहे. तर दुसऱ्याबाजूला इंडिया आघाडीतील सहभागी राजकिय पक्षांशी रखडलेल्या जागा वाटपाची चर्चाही आता पुर्णत्वास येत आहे. उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीशी जागा …
Read More »शरद पवार यांनी केले राष्ट्रवादीच्या नव्या तुतारी चिन्हाचे रायगडावर अनावरण
राज्यात शिवसेनेपाठोपाठ शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. त्यानंतर सध्या केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुळ पक्ष कोणाचा यावरून याचिका प्रलंबित आहे. त्यातच देशातील लोकसभा निवडणूकीचा कालावधी जवळ येत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाने नवे चिन्ह द्यावे द्यावी अशी मागणी केली …
Read More »अजित पवार यांचा उपरोधिक टोला, मी सत्तेसाठी हपापलेला नाही…
विरोधकांना दुसरा मुद्दा राहिलेला नसल्याने एकमेकांची उणीधुणी काढून हेडलाईन मिळवायची हे काम उरलेले आहे असा टोला लगावतानाच आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, प्रवक्ते, कार्यकर्त्यांनी अशा मुद्यांवर बोलताना मर्यादा बाळगायला हवी. आपल्या वक्तव्यातून कोणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. निवडणुकीसाठी उरलेले काही दिवस सर्वांनी मिळून जोरकसपणे काम करा असे आवाहन राष्ट्रवादी …
Read More »
Marathi e-Batmya