राजकारण

महाराष्ट्रातील दुसऱ्या वंदे भारत गाडीला पंतप्रधानांनी दाखविला झेंडा: वैशिष्टे काय या गाडीचे नागपूर-बिलासपूर दरम्यान धावणार ‘वंदे भारत एक्सप्रेस’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागपूर रेल्वे स्थानकावर नागपूर-बिलासपूर शहरांदरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ या वेगवान रेल्वे गाडीला हिरवा  झेंडा दाखवून मार्गस्थ केले. या गाडीमुळे या दोन्ही शहरांदरम्यान वेगवान रेल्वेगाडीचा पर्याय उपलब्ध झाला असून ही देशातील सहावी तर महाराष्ट्रातील दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ठरली आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक …

Read More »

निर्भया निधीतील वाहने सरंक्षणासाठी; शिंदे टोळीतील आमदारांना नक्की कशाची भीती वाटते ? निर्भया निधीतील वाहने पोलीस स्टेशन्सला तात्काळ पाठविण्यात यावीत-जयंत पाटील यांची मागणी

निर्भया निधी महिलांची सुरक्षितता आणि महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी केंद्रातील तत्कालीन युपीए सरकारने तयार केलेला निधी होता. मात्र या निधीतून घेतल्या गेलेल्या वाहनांचा उपयोग फुटीर आमदारांच्या संरक्षणासाठी केला जात आहे. त्यामुळे ही वाहने तात्काळ पोलीस स्टेशनला जमा करावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी …

Read More »

अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर देत साधला चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा निधी काय कुणाच्या बापाचा आहे का? तो निधी सरकारचा आहे

मुंबईतील विकास कामांच्या शुमारंभावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना तीन वर्षे निर्णय न घेता स्थगिती देण्यातच वाया गेल्याची टीका केली. तसेच आम्हाला दोनच वर्षे मिळाल्याने आम्हाला टेन्विटी टेन्विटी खेळावी लागत असल्याचे सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर देत उच्च तंत्रशिक्षण …

Read More »

शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, हा भ्याडपणा हिंमत असेल तर समोर या अजित पवार, सुषमा अंधारे, उध्दव ठाकरेंनी निंदा करावी

पैठण येथील कार्यक्रमात भाजपाचे नेते तथा उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटील यांच्यावर सर्वचस्तरातून टीकेचा भडीमार होत आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून एका अज्ञात व्यक्तीने आज चिंचवड गावात चंद्रकांत पाटील यांच्यावर …

Read More »

प्रकाश आंबेडकर म्हणाले, हेगडेवार-गोळवळकरांनी आजच्या भाषेत… नाव जरी नाही घेतले तरी खोक्यांनी पैसे घेतले

राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य करत आधीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाच्या आमदारांनी राळ उठवून दिली. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकिय वातावरण आधीच तापलेले आहे. त्यातच आता काल भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फुले-आंबेडकरांनी आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारणीसाठी भीका मागितल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यावरून सर्वचस्तरातून टीका होत आहे. …

Read More »

उध्दव ठाकरे यांचे पंतप्रधान मोदींना आव्हान, …मग खुशाल तुम्ही महामार्गाचे उद्घाटन करा पालकासारखे बोला नाहीतर पालकाची भाजी समजून बोलू नका

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. कर्नाटकच्या या अरेरावीवर पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. पंतप्रधानांनी उद्याच्या कार्यक्रमात जरूर बोलावं. पण त्यांनी कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अरेरावी यावर बोललंच पाहिजे. आख्खा महाराष्ट्र तुमच्या कर्नाटकविषयीच्या भूमिकेची वाट बघतोय, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव …

Read More »

नागपूरमध्ये रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजपातर्फे भव्य स्वागत नागरिकांनीही सहभागी होण्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार ११ डिसेंबर रोजी नागपूर शहरात येत असून भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचे उत्साहाने भव्य स्वागत करण्यात येईल. नागरिकांनीही मोदीचे स्वागत करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी नागपूर …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, तुमचं मत ट्रॅव्हल एजन्सीसारखं… घनसावंगी येथील साहित्य समेंलनाचे उध्दव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे हस्ते जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे ४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज शनिवारी झाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाद्वारे केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील सत्तांतराच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला टोलाही लगावला. …

Read More »

रात्रशाळांचे धोरण ठरविण्यासाठी नवी समिती गठीत समिती एका महिन्यात अहवाल सादर करणार

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत तारांकित प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री रात्रशाळेबाबत सर्वकष धोरण आखण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार रात्रशाळेबाबत सर्वंकष धोरण निश्चित करण्यासाठी राज्य शासनाने समिती गठीत केली आहे. रात्रशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सेवाविषयक बाबी, रात्रशाळेचा संचमान्यता, रात्रशाळेची गरज तसेच रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना अनुभवी शिक्षकांकडून दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन …

Read More »

खासदार डॉ अमोल कोल्हेंचा संसदेत माईक बंद करण्यावरून राष्ट्रवादीचा हल्लाबोल जयंत पाटील आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून टीकेची झोड

महाराष्ट्रातील सगळ्या विषयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मूग गिळून गप्प बसले आहेत जे काही आहे ते कर्नाटकचे मुख्यमंत्रीच बोलत आहेत असा प्रकार महाराष्ट्राने कधीच पाहिला नाही. सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे त्याच्या तारखा लागतील पण हे चित्र जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न कर्नाटकचे मुख्यमंत्री करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे नाहीतच ते भाजपचेच …

Read More »