राजकारण

जयंत पाटील म्हणाले, सिल्व्हर ओकवर हल्ला कुणी करायला लावला हे आता स्पष्ट

ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओकवर हल्ला केला ‘त्या’ एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले गेले याचा अर्थ सिल्व्हर ओकवर जाण्यासाठी त्यांना कुणी फुस लावली होती हे लक्षात येते असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाचे हत्यार उपसण्यात आले होते. त्यावेळी १०५ एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार …

Read More »

नाशिक नांदूरनाका दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

नाशिक- नांदूरनाका येथे खाजगी बसच्या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने तातडीचे वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

अभियांत्रिकी अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला, प्रवेशात १५ टक्क्यांची वाढ

शालेय शिक्षणानंतर अभियांत्रिकी तंत्रशिक्षणातील पदविका हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे. दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ या वर्षाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मागील तीन वर्षी प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये सलग १० टक्के होत असलेली वाढ यावर्षी १५ टक्के झाली आहे. या प्रवेशित विद्यार्थ्यांची …

Read More »

बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुषखबरः कामावर घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

एसटी महामंडळाच्या ताफ्यात डिसेंबरपर्यंत दीडशे इलेक्ट्रिक आणि मार्चपर्यंत एक हजार सीएनजी बसगाड्यांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दरम्यान, एसटी संपाच्या काळात बडतर्फ केलेल्या ११८ कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी महामंडळाला दिले. परिवहन विभागाच्या अखत्यारितील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन …

Read More »

रामदास कदम म्हणाले, आम्हाला १०० टक्के विश्वास धनुष्यबाण नाही मिळाला तर विचार करून पुढील दिशा ठरवू

शिवसेना कोणाची यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार संघर्ष सुरू आहे. आज शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाचं या प्रकरणावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी होत आहे. शिंदे आणि ठाकरे गटाने आपआपली बाजू मांडल्यानंतर आयोग आपला निर्णय देईल. मात्र, निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यास काय? यावर शिंदे गटाचे नेते रामदास …

Read More »

निवडणूक आयोगाने उध्दव ठाकरे गटाला दिली उद्यापर्यंतची मुदत पक्ष आमच्या बाजुने; शिंदेच पक्षप्रमुख शिंदे गटाचा दावा

शिवसेना पक्ष कुणाचा? या प्रश्नी निर्णय घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला परवानगी दिली. त्यानंतर निवडणूक आयोगाने ७ ऑक्टोंबरपर्यंत शिंदे गट आणि ठाकरे गटाला कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार कागद सादर कऱण्याची मुदत आज संपली. मात्र आपल्याला शिंदे गटाची कागदपत्रे मिळाली नसल्याचा दावा ठाकरे गटाने आयोगासमोर करत १५ …

Read More »

नारायण राणे यांचा आरोप, उध्दव ठाकरेंनी छोटा शकील आणि राजनला सुपारी दिली शिवसेना सोडल्यानंतर आपल्याला मारण्याची सुपारी दिल्याचा केला आरोप

शिवसेना सोडल्यानंतर मला ठार मारण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी छोटा शकील आणि छोटा राजन यांना सुपारी दिली होती असा खळबळजनक आरोप भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर केला. तसेच मनोहर जोशी यांच्या घरावर हल्ला करण्यास सदा सरवणकर यांना उध्दव ठाकरे यांनी सांगितले होते असा …

Read More »

उध्दव ठाकरे यांच्या त्या टीकेवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, शब्द परत घ्या पटत नाही पण काही पथ्य पाळली पाहिजेत

काय कमी दिलं त्यांना? बाप मंत्री आता तर मुख्यमंत्री आहे, कार्टं खासदार. पुन्हा डोळे लावून बसले आहेत, नातू नगरसेवक. अरे त्याला मोठं तर होऊ दे, शाळेत जाऊ दे. आताच नगरसेवक?, असं विधान शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलं होतं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नातवाचा उल्लेख केल्याने …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकारचे १०० दिवस हारतुरे, सत्कार, देवदर्शन व खुर्ची वाचवण्यातच गेले

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कटकारस्थाने करुन पाडून शिंदे-फडणवीस सरकार येऊन १०० दिवस झाले. या १०० दिवसात ईडी सरकारने केवळ हारतुरे व सत्कार स्विकारणे, गणपती मंडळांना भेटी, नवरात्रोत्सवात देवीचे दर्शन घेणे व स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी खटपटी करणे यातच गेले आहेत. राज्यात होत असलेली तब्बल १ लाख ५४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक …

Read More »

अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित केली ‘त्या’ निर्णयाच्या चौकशीची मागणी दिवाळी फूड किट निविदा प्रक्रियेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार

सामान्य जनतेची दिवाळी गोड करण्याच्या गोंडस नावाखाली सरकारने जाहीर केलेल्या दिवाळी पॅकेजमध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.मंत्रीमंडळ निर्णयापूर्वीच निविदा काढण्यात आल्याने हा घोटाळा उघडकीस आला असून या दिवाळी फूड किट निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे …

Read More »