राजकारण

मुंबई महापालिका निवडणूकीत राष्ट्रवादी पूर्ण ताकदीनिशी; शरद पवार यांचे निर्देश सोबत कोणी येईल याचा विचार करू नका कामाला लागा

राज्यातील शिवसेनेतील सत्ता संघर्षामुळे महाविकास आघाडीला सत्तेतून पाय उतार व्हावे लागले. त्यातच आता मुंबईसह १४ महापालिकांच्या निवडणूकांचे बिगुल केव्हाही वाजण्याची शक्यता आहे. तसेच सध्याच्या या बदलेल्या राजकिय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडी सोबत येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला असून …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष, जिल्हास्तरीय यंत्रणांशी समन्वय मुख्य सचिवांना जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्यपूर्ण संपर्काचे निर्देश

राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांना राज्यातील परिस्थितीबाबत सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याच्या निर्देश दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गुरू पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी आज दादर …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा इशारा, लक्षात ठेवा १०५ मध्ये आमच्यातून गेलेले ५० आहेत… शरद पवार पाऊस कमी झाल्यानंतर शेवटच्या युवकापर्यत जाणार

निवडणूका असो नसो आपल्या पक्षाच्या बैठका या होतच असतात. विरोधी पक्षात असताना लोकांनी पवारसाहेबांना जास्त प्रेम दिले आहे. सत्तेत असतानाही दिले आहे. आता जे काही १०५ असल्याचे बोलत आहेत त्यात आपल्या पक्षातून गेलेले आपले ५० आहेत हे लक्षात ठेवा असे सूचक विधानही खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. आता विरोधी पक्षाच्या …

Read More »

शरद पवार म्हणाले, तर एकही बंडखोर निवडूण येणार नाही… अनेक राज्य बरखास्त करण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळे आज ना उद्या ही सत्ता जनता बरखास्त केल्याशिवाय राहणार नाही - शरद पवार

आज ज्या घडामोडी घडत आहेत त्यामध्ये शिवसैनिक कुठे हालला नाही. ज्यांनी सत्ता बदल करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याविरोधात हा शिवसैनिक एकत्र झाला आहे. एखाद दुसरा सोडला तर एकही निवडून येणार नाही हे मला शिवसैनिक सांगत आहेत. सत्तापरिवर्तन झाले ते लोकांना आवडलेले नाही. शिवसैनिक नाराज आहेत. त्यामुळे एक वेगळं चित्र राज्यात आगामी …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने घेतला ‘हा’ निर्णय जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडतीला स्थगिती

महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणाचा गोंधळ सुरू असून या पार्श्वभूमीवर आज सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी झाली. राज्य सरकारकडून बाठिंया आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ट्रिपल टेस्टची पूर्तता केली. निवडणूक आयोगाला आपली बाजू मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. पुढील सुनावणी १९ जुलैला होणार आहे. आज झालेल्या सुनावणीवेळी …

Read More »

शिवसेनेचे राज्यपाल कोश्यारींना पत्र, न्यायालयालयाचा निर्णय येईपर्यत या गोष्टी नको… मंत्रिमंडळ विस्तारासह कोणत्याही नियुक्त्या नको

शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारही स्थापन झाले. मात्र या हे सरकार बेकायदेशीर असल्याचा आरोप करत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. मात्र तरीही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची तयारी सुरु केली आहे. यापार्श्वभूमीवर …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, …तर शिवसैनिकांच्या मागणीमुळे द्रोपदी मुर्मना पाठिंबा माझ्यावर कोणाचाही दबाव नाही

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळी नंतर मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदारही फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा सुरु होती. त्यातच काल रविवारी झालेल्या पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी खासदारांच्या बोलाविलेल्या बैठकीतही अनेक खासदारांनी राष्ट्रपती पदाच्या भाजपाच्या उमेदवार द्रोपद्री मुर्म यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे अधिकृत …

Read More »

राष्ट्रपती निवडणुकीसाठी आयोगाकडून निरीक्षकाची नियुक्ती निवडणूक प्रक्रियेची काटेकोर अंमलबजावणी हे आयोगाचे वैशिष्ट्य - मुख्य निवडणूक आयुक्त

राष्ट्रपती निवडणूक २०२२ येत्या १८ जुलै २०२२ रोजी घेतली जाणार असून भारत निवडणूक आयोगाकडून निर्धारित मतपेट्या, मतपत्रिका, विशेष लेखण्या आणि इतर सीलबंद निवडणूक सामुग्रीचे वाटप सुरू केले आले आहे. नवी दिल्ली येथील निर्वाचन सदन येथे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या निगराणीखाली सर्व राज्ये आणि …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, मविआने आरक्षणाची पायाभरणी केली आता दिरंगाई कशासाठी ? ओबीसी आरक्षणासाठी भाजपाप्रणित सरकारने तत्परता दाखवावी

राज्यातील नगरपालिका, नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून अद्याप ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय झालेला नाही. ओबीसी आरक्षणाची पायाभरणी महाविकास आघाडी सरकारने केलेली आहे. बांठिया आयोगाचा अहवालही सादर झाला आहे परंतु भाजपाप्रणित सरकारला सुप्रीम कोर्टात योग्य बाजू मांडणे जमलेले दिसत नाही. मविआ सरकारने ओबीसी आरक्षणाची पायाभरणी घालून दिली असताना आता दिरंगाई …

Read More »

ठाकरेंनी हकालपट्टी केलेल्या संतोष बांगर यांची मुख्यमंत्री शिंदेकडून पुन्हा नियुक्ती हिंगोलीच्या जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती कायम

बंडखोर आमदारांना परतण्याचे आवाहन करणाऱ्या आणि बहुमत चाचणीच्या आदल्या दिवशीपर्यत उध्दव ठाकरे सोबत राहिलेल्या संतोष बांगर यांनी रात्रीतून आपली निष्ठा बदलून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले. त्यांच्या या दलबदलू भूमिकेच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने संतोष बांगर यांची हिंगोलीच्या जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी केल्याचे जाहिर केले. त्यानंतर संतोष बांगर यांनी …

Read More »