राजकारण

काँग्रेसचा टोला, पावसाने १०० वर मृत्यू, लाखो हेक्टर शेती पाण्याखाली अन् ‘सरकार’ बेपत्ता.. शिंदे-फडणवीसांच्या सत्तापिपासू वृत्तीमुळे महाराष्ट्र अनाथ

राज्यात शिंदे-फडणवीस सरकारला १५ दिवस झाले तरी अजून मंत्रिमंडळच अस्तित्वात आलेले नाही, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची दुचाकीच काम पहात आहे. राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून १०० वर लोकांचे मृत्यू झालेत तर लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. शिंदे-फडणविसांच्या सत्तापिपासूवृत्तीमुळे सरकार स्थापन झाले असले तरी प्रत्यक्षात शासन व प्रशासन राज्यात …

Read More »

मविआने स्थगिती दिलेल्या मात्र फडणवीसांच्या काळातील ‘त्या’ चार निर्णयांना पुन्हा मान्यता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मान्यता

२०१९ साली सत्तांतर करत औटघटकेचे देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारला घालवित नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारने २०१७ ते १९ काळात फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली. मात्र पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आतच पुन्हा महाविकास आघाडी सरकारला घालवित राज्यात नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …

Read More »

राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी ‘या दोन’ योजना राबविणार "स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी - २.०" आणि अमृत २.० योजना-राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्दा निकाली सर्वोच्च न्यायालयाकडून निघण्याच्या उंबरठ्यावर असताना त्या पाठोपाठ शहरी आणि ग्रामीण भागातील निवडणूकांचे बिगुलही कधीही वाजण्याची शक्यता असताना या दोन्ही भागांच्या विकासासाठी मुबलक निधी उपलब्ध करून देण्यासाठी आज दोन योजना राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियान …

Read More »

राज्यातील निवडणूक प्रक्रियेला चार दिवसांसाठी स्थगिती: १९ तारखेला सुनावणी ओबीसी आरक्षणावर चार दिवसांनी होणार निर्णय

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणूका घेण्याची तयारी सुरु केलेली असताना राज्य सरकारकडून सादर करण्यात आलेल्या बाठिंया आयोगाचा अहवालावर १९ जुलै रोजी न्यायालयाकडून सुनावणी घेण्यात येणार असल्याचे जाहिर केले. …

Read More »

निवडणूकांच्या तोंडावर शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय: पेट्रोल ५ तर डिझेल ३ ने स्वस्त ६ हजार कोटी रूपयांचा बोजा सरकारी तिजोरीवर

एकाबाजूला राज्यातील ओबीसींच्या राजकिय आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, तर दुसऱ्याबाजूला राज्य सरकारच्या वैधतेच्या प्रश्नाबाबतची याचिकाही न्यायालयात प्रलंबित असतानाच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची प्रक्रिया सध्या सुरु आहे. यापार्श्वभूमीवर आगामी जय-पराजयाची राजकिय गणिते मांडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन मंत्र्यांमध्ये झालेल्या पहिल्याच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोलवरील …

Read More »

माजी मंत्र्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली ऊर्जा विभागाची बैठक पाण्याचे आणि पथदिव्यांची थकित देयके अदा करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करा

देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या सरकारमधील माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळात राज्यात सौर ऊर्जा, शेतकऱ्यांना वाटप करण्याचे सौर ऊर्जेचे कृषी पंप यासह अन्य काही योजनांची सुरवात करण्यात आली होती. मात्र २०१९ च्या निवडणूकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. मात्र ऊर्जा विभागाच्या अनेक निर्णयावर माजी ऊर्जा मंत्री म्हणून चंद्रशेखर …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचा नाव घेता उध्दव ठाकरेंना टोला, अडीच वर्षापूर्वीच हा… द्रोपदी मुर्म यांच्या पाठिंब्याच्या निर्णयानंतर लगावला टोला

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावित महाविकास आघाडी सरकारला खाली खचले. त्यानंतर तरीही आपण शिवसेनेतच आहोत असे वांरवार सांगत महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपाशी समझौता करण्यासाठी एकप्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न त्या ५० बंडखोर आमदारांकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी …

Read More »

महेश तपासेचा केसरकरांवर पलटवार; बेकायदेशीर प्रवक्त्यांचे बेजाबदार वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्युत्तर

दिल्ली दौऱ्यावर गेलेल्या शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी शिवसेना फुटीमागे शरद पवार हेच होते असा खळबळजनक आरोप करत नारायण राणे, राज ठाकरे आणि छगन भुजबळ यांच्या बंडामागे तेच होते. तसेच ही माहिती आपणास शरद पवार यांनीच दिल्याचा दावा केला. या आरोपावरून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »

काँग्रेसचा इशारा; ज्वलंत प्रश्नांकडे वेळीच लक्ष दया अन्यथा परिस्थिती स्फोटक बनेल श्रीलंकेची तीन वर्षापूर्वी जी स्थिती होती तीच स्थिती आज भारताची-अतुल लोंढे

केंद्रातील भाजपाचे सरकार जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे लक्ष न देता धार्मिक प्रश्न पुढे आणत आहे हे देशाच्या हिताचे नाही. महागाईचा आगडोंब उसळला असताना सरकार मात्र आकड्यांचा खेळ करून आभासी व दिशाभूल करणारे चित्र दाखवत आहे. तीन वर्षांपूर्वी श्रीलंकेची जी स्थिती होती तीच आज भारताची असून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच पावले …

Read More »

दिपक केसरकर यांचा आरोप: मला पवारांनीच सांगितले, शिवसेना फुटी मागे ते स्वत: राज ठाकरे, नारायण राणे आणि छगन भुजबळांच्या बंडामागे शरद पवार

सध्या दिल्ली दौऱ्यावर असलेले शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला हजेरी लावली. त्यानंतर काही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की, शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा हात होता असा खळबळजनक आरोप केला. मी राष्ट्रवादीत होतो, त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या …

Read More »