राजकारण

बिल थकविल्याप्रकरणी सदाभाऊ खोत म्हणाले, तो तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचेच कट कारस्थान

कटकारस्थान रचून आमचा आवाज दाबणार असाल तर आम्ही शांत बसणार नाही. जागर शेतकऱ्याचा आक्रोश महाराष्ट्राचा यात्रेदरम्यान हे सरकार मला खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, असं मी सांगितलं होतं. त्याचाच हा ढळढळीत पुरावा समोर आलेला आहे. म्हणूनच राष्ट्रवादीला मी इशारा देतो. तुमचा पक्ष हा सरदारांचा पक्ष आहे. चिरेबंदी वाड्यात राहणाऱ्यांचा …

Read More »

महाराष्ट्राला मिळाला ‘स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच पुरस्कार’ ऊर्जा क्षेत्रातील कामगिरी बद्दल स्कॉच कंपनीकडून सन्मान

ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्राला ‘स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच अवार्ड इन पावर अँड एनर्जी’ प्रदान करण्यात आला. राज्याच्या ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. स्कॉच ग्रुपच्यावतीने शनिवारी येथील इंडिया हॅबिटॅट सेंटरच्या सिल्वर ओक सभागृहात आयोजित कार्यक्रमात शासन, अर्थ, बॅंकिंग, तंत्रज्ञान  क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात …

Read More »

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आमचा उमेदवार चमत्कारासाठी नाही तर… पाचही उमेदवार आमचेच निवडूण येणार असल्याचा व्यक्त केला विश्वास

भारतीय जनता पक्ष विजयासाठी निवडणूक लढवतो. ज्यांनी आमच्याशी विश्वासघात करून राज्यात सत्ता स्थापन केली तेच लोक आमदारांनी विश्वासघात केला, अशी वक्तव्ये करीत आहेत असा टोला भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेच्या संजय राऊत यांना लगावत शिवसेनेचे आमदार जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करणार नाही, असे म्हणत असेल तर त्यात …

Read More »

तरूणांच्या रोषानंतरही सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुखांनी अग्निपथप्रकरणी केली ‘ही’ घोषणा योजना मागे घेणार नसल्याची स्पष्टोक्ती

काही दिवसांपूर्वी केंद्रिय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत संरक्षणातील भरतीसाठी नवी अग्निपथ योजना जाहिर केली. या योजनेची घोषणा केल्यानंतर उत्तर प्रदेश, बिहार, पंजाबसह देशातील अनेक राज्यांमध्ये नवतरूणांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात येत असून निदर्शने, जाळपोळीच्या घटनाही घडत आहेत. यापार्श्वभूमीवर केंद्रिय गृहमंत्रालयाकडून अग्निवीरांसाठी …

Read More »

पंढरपूर आषाढी वारीला सुविधा पुरविण्यासाठी नऊ कोटींच्या निधीस मंजुरी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

पंढरपूरला जाणाऱ्या पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यासाठी दोन कोटी एकोणसाठ लाख पंच्याहत्तर हजार रुपयांच्या तसेच वारकरी भाविकांना तात्पुरत्या स्वच्छता सुविधा पुरविण्यासाठी सहा कोटी त्र्याहत्तर लाख वीस हजार रुपयांच्या निधीस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली. पंढरपूरची आषाढी वारी निर्मल वारी होण्यासाठी यामुळे मदत …

Read More »

उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेची आठवण सांगत म्हणाले, जबाबदारी किती मोठी… रावते, देसाई पहिल्या पिढीचे

उभं राहून बोलू शकतो याअगोदर दाखवलय, शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. माझ्या फादरनेच या पक्षाला जन्म दिला. पितृपक्षाबद्दल अनेक गैर समज माझा पक्ष पितृपक्षच. ५६ वर्षातल्या अनेक गोष्टी आजही ताज्याच असल्याचे सांगत जेव्हा शपथ घेतली तेव्हा शिवाजी पार्कच्या घरात आजोबा, साहेब, काका, माँ वेळ काळ न बघता शिवसेनेची स्थापना करण्यात आल्याची …

Read More »

संजय राऊत यांचा निशाणा, एक जागा जिंकली म्हणजे… विरोधकांचे नाव न घेता केली टीका

विधान परिषद निवडणूकीच्या १० जागांसाठी उद्या मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईतील हॉटेल वेस्ट इन मध्ये ठेवण्यात आले आहेत. त्यातच आज शिवसेनेच्या ५६वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व आमदार ठेवण्यात आलेल्या हॉटेल वेस्ट इनमध्येच शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले; तुमचा माज महाराष्ट्रात चालणार नाही, आताचे राजकारण पावशेराचे शिवसेनेच्या ५६ वर्धापन दिनानिमित्त आयोजित छोटेखानी कार्यक्रमात बोलत होते

विधान परिषदेच्या १० जागांसाठी उद्या मतदान होणार असतानाच आज शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन आलेला असल्याने शिवसेना पक्षप्रमुख तथा उध्दव ठाकरे आज काय बोलणार याबाबतची उत्सुकता लागून राहिली होती. मात्र शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित छोटेखानी कार्यक्रमात आयोजित उध्दव ठाकरे बोलत होते. यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, तुमचा सत्तेचा माज महाराष्ट्रात …

Read More »

उस्मानाबादमधील भाजपाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश… उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षात केले स्वागत

उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उस्मानाबाद येथील भाजपा नेते दिग्विजय शिंदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी राजेंद्र झांबरे, मिलिंद कांबळे, डी. टी. कांबळे, आनंद पाटील, गोपाळ घोडके व इतर पदाधिकारी- कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हाती बांधले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उस्मानाबाद …

Read More »

राज्याचे नवे “कौशल्य श्रेणीवर्धन धोरण” जाहीर मंत्री राजेश टोपे यांची माहिती

वेगाने बदलते तंत्रज्ञान आणि कौशल्यांमुळे औद्योगिक आस्थापनांना अद्ययावत कौशल्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पुरवठा होणे गरजेचे आहे. शाश्वत स्वयंरोजगार आणि अद्ययावत कौशल्यपूर्ण रोजगारासाठी आवश्यक कौशल्यवृद्धीकरिता “कौशल्य श्रेणीवर्धन” धोरण राज्यात राबविण्यात येणार आहे. यासाठी काल शासन निर्णय निर्गमित करून राज्याचे कौशल्य श्रेणीवर्धन धोरण राबविण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांनी …

Read More »