तेलंगणा लोकसेवा आयोगाच्या (TGPSC) प्राथमिक परीक्षेमधून आरक्षण हटविण्याचा निर्णय काँग्रेस सरकारने घेतल्यानंतर, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “भाजपा = काँग्रेस. तुम्हाला अजूनही वाटते का की काँग्रेस देशात आरक्षण वाचवेल? की ते एससी, एसटी आणि ओबीसींना न्याय देईल? काँग्रेसला प्रश्न विचारण्याऐवजी, त्यांना प्रश्न विचारा जे निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मतांचे विभाजन करणारा पक्ष म्हणत होते आणि काँग्रेसला मते मागत होते ” असा आरोपही यावेळी केला.
यासंदर्भात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काँग्रेसच्या दलित-बहुजन हिताच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तेलंगणातील घटनाक्रमाबरोबरच कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर टीका करत पुढे म्हणाले की, २०२३-२०२५ या कालावधीत काँग्रेस सरकारने अनुसूचित जाती-जमातींच्या कल्याणकारी योजनांसाठी राखीव असलेला २५,००० कोटींपेक्षा अधिक निधी वळवून इतरत्र वापरला असल्याचे सांगत हा आहे काँग्रेसचा खरा चेहरा. काँग्रेस आणि भाजपामध्ये काहीच फरक नसल्याची टीकाही यावेळी केली.
भाजपा = कांग्रेस
क्या आपको अभी लगता हैं की कांग्रेस देश में आरक्षण बचाएगी या कभी एससी, एसटी और ओबीसी के साथ इन्साफ करेगी?
क्या अभी भी लगता हैं कांग्रेस भाजपा से अलग हैं?कांग्रेस से सवाल पूछने के बजाय आपको उन भाड़े के टट्टूों से सवाल पूछना पड़ेगा जो चुनाव में वंचित बहुजन आघाडी… https://t.co/2toKuz719Q
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) April 5, 2025
शेवटी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीने सुरुवातीपासूनच सामाजिक न्याय, घटनेतील हक्क आणि आरक्षण यासाठी लढा दिला आहे. अशा निर्णयांनी काँग्रेसच्या “धर्मनिरपेक्ष” आणि “बहुजन हितैषी” चेहऱ्यावरचा मुखवटा गळून पडल्याची भावना व्यक्त केली.
🔴तेलंगाना लोक सेवा आयोग (TGPSC) की प्रारंभिक परीक्षा में आरक्षण खत्म, तेलंगाना की कांग्रेस सरकार ने लिया फैसला।
🔴कांग्रेस की कर्नाटक सरकार ने 2023 -2025 के दौरान एससी और एसटी वेलफेयर बजट से ₹25000 करोड़ से भी ज्यादा फंड्स डाइवर्ट किये हैं।
कांग्रेस से सवाल पूछने के बजाय आपको… pic.twitter.com/HsgiuXL6Ob
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) April 5, 2025
Marathi e-Batmya