Breaking News

सचिन सावंत यांचा सवाल, सुशांतसिंह राजपूत…सीबीआय मात्र अद्याप गप्पच का? सुशांतसिंह प्रकरणी भाजपाकडून मविआ, मुंबई पोलीसांची बदनामी व सुशांतचे कुटुंब वेठीस

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासाला आज चार वर्ष झाली परंतु यासंदर्भातील तपास करणाऱ्या सीबीआयने आपला अहवाल अद्याप जाहीर केलेला नाही. भाजपाने सुशांतच्या आत्महत्येला हत्येचे रुप देऊन आपला कुटील राजकीय हेतू साधण्यासाठी वापर केला. मविआ सरकार असताना महाराष्ट्रात सीबीआय तपासाला परवानगी नसल्याने बिहारमध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीने गुन्हा नोंदवून सीबीआयकडे तपास वर्ग करण्यात आला परंतु तपासाला चार वर्षे झाली तरी सीबीआय या प्रकरणावर गप्प का आहे, असा सवाल काँग्रेस सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला.

यासंदर्भात बोलताना सचिन सावंत पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचेही भाजपाने राजकारण केले. सुशांतसिंह याने आत्महत्या केल्याचे मुंबई पोलीसांनी स्पष्ट केले होते. अत्यंत प्रथितयश म्हणून मान्यता प्राप्त अशा एम्स या संस्थेने ही त्यांच्या अहवालात आत्महत्याच असल्याचे स्पष्ट केले त्याला आता १४०० दिवस उलटले आहेत. भाजपाने केवळ हीन राजकीय हेतूने मुंबई पोलीस, मविआ सरकारची बदनामी केली व सुशांतसिंहच्या कुटुंबियांनाही वेठीस धरले. तीन तीन तपास यंत्रणांचा वापर करण्यात आला. अनेकांचा तपासात छळही केल्याचा आरोपही यावेळी केला.

पुढे बोलताना सचिन सावंत म्हणाले की, सुशांतसिंह प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करून सीबीआयला तोंड उघडायला लावावे अशी विनंती सुशांतच्या मोठ्या बहिणीने केली आहे. परंतु अद्याप मोदींनी या प्रकरणी ना हस्तक्षेप केला ना सीबीआयचे तोंड उघडले. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येस आज १४६० दिवस झाले पण सीबीआय तोंड कधी उघडणार हा प्रश्न अनुत्तरितच असल्याचे सांगितले.

सचिन सावंत पुढे बोलताना म्हणाले की, सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या तपासाबद्दल समाधान व्यक्त केले होते, परंतु मुंबई पोलिसांची प्रतिमा खराब करण्याचा आणि मविआ सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा राजकीय डाव होता. बिहारचे तत्कालीन पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांचा याकरिता वापर केला गेला. भाजपाने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन खुले आमपणे खून, बलात्काराचे आरोप केले व बिहार निवडणुकीतही सुशांतच्या मृत्यूचा वापर केला. मविआ सरकारवरील सुनियोजित राजकीय हल्ल्याची रणनिती आखून भाजपा संचालीत वृत्त वाहिन्यांना सुशांतसिंहचा खुन झाल्याचा सातत्याने उच्चार करण्यास सांगितले गेले. भाजपा आयटी सेलने हजारो बनावट ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूब अकाउंट तयार करून अपप्रचार केल्याचा आरोप करत याच पद्धतीने पालघर साधूंच्या हत्येचा तपास ही थंड बस्त्यात ठेवण्यात आल्याची टीकाही यावेळी केली.

Check Also

पंतप्रधान मोदी यांचे सूचक विधान,…निवडणूक जम्मू काश्मीरचे भवितव्य ठरविणारी काँग्रेस नेते राहुल गांधी फारूख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्तींवर केली टीका

जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी आणि सत्ताधारी भाजपाकडून प्रचारसभांचे घेत स्थानिक नागरिकांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *