नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी शनिवारी सांगितले की १२ जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या अपघातावरील अहवाल हा केवळ प्राथमिक आहे आणि अंतिम निष्कर्ष जाहीर होईपर्यंत जनतेला आणि माध्यमांना निष्कर्षांवर पोहोचू नका असे आवाहन केले.
अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर तीन सेकंदांनी एअर इंडियाच्या बोईंग ७८७ च्या दोन्ही इंजिनांना इंधन पुरवठा खंडित झाल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. विमानाचे इंधन नियंत्रण स्विच एकमेकांपासून एका सेकंदाच्या अंतराने “RUN” वरून “CUTOFF” स्थितीत वळले.
या चौकशीला “आव्हानात्मक” म्हणून वर्णन करताना, केंद्रीय मंत्री के राम मोहन नायडू म्हणाले की, यात “अनेक तांत्रिक बाबी” आहेत आणि अहवालावर भाष्य करणे अवेळचे होईल.
पुढे बोलताना के राम मोहन नायडू म्हणाले की, “नागरी विमान वाहतूक मंत्रालय या अहवालाचे सखोल विश्लेषण करत आहे. कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नका. अंतिम अहवाल आल्यानंतरच आपण ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचू असे सांगत देशातील वैमानिकांवर विश्वासही व्यक्त केला. “आपल्याकडे संपूर्ण जगात वैमानिक आणि क्रूच्या बाबतीत सर्वात अद्भुत कर्मचारी आहेत. वैमानिक आणि क्रू मेंबर्स हे विमान उद्योगाचा कणा आहेत,” असल्याचे सांगितले.
तथापि, एएआयबीच्या अहवालात विमानाच्या इंजिनमध्ये इंधन प्रवाहाचे नियमन करणाऱ्या इंधन नियंत्रण स्विचमध्ये होणारा बदल अनवधानाने किंवा जाणूनबुजून झाला का याचा उल्लेख नाही.
तथापि, अहवालात कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये कैद झालेल्या वैमानिकांमधील गप्पांचा उल्लेख आहे. एका वैमानिकाला दुसऱ्याला विचारताना ऐकू येते की त्याने इंधन पुरवठा का थांबवला, दुसऱ्या वैमानिकाने सांगितले की त्याने तसे केले नाही.
उड्डाणाचे नेतृत्व ५६ वर्षीय सुमित सभरवाल करत होते, ज्यांना एकूण १५,६३८ तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. त्यांचे सह-वैमानिक क्लाइव्ह कुंदर, ३२ वर्षीय होते, ज्यांना एकूण ३,४०३ तासांचा अनुभव होता.
नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री (राज्यमंत्री) मुरलीधर मोहोळ म्हणाले की, केवळ वैमानिकांच्या संभाषणावरून कोणताही निष्कर्ष काढता येत नाही, कारण ही एक अतिशय संक्षिप्त चर्चा होती.
पुढे बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, एएआयबी कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय चौकशी करते. आम्ही ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवला नाही… तो आमच्याच देशात डीकोड करण्यात आला. केवळ वैमानिकाच्या संभाषणावरून कोणताही निष्कर्ष काढता येत नाही, कारण ही एक अतिशय संक्षिप्त चर्चा होती, असेही सांगितले.
अहमदाबाद विमान दुर्घटना पर प्राप्त प्रारंभिक रिपोर्ट को लेकर मीडिया प्रतिनिधियों से बातचीत की । pic.twitter.com/XZFQeP7eEl
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 12, 2025
लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही सेकंदातच अहमदाबादमधील बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळले. या दुर्घटनेत २४१ प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह २६० लोकांचा मृत्यू झाला आणि जमिनीवर १९ जणांचा मृत्यू झाला.
Marathi e-Batmya