Tag Archives: उपमुख्यमंत्री

एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, मीरा-भाईंदर न्यायालयासाठी अतिरिक्त जागा द्यायला शासन तयार मीरा- भाईंदर दिवाणी न्यायालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि न्यायमूर्ती अभय ओक यांच्या शुभहस्ते लोकार्पण

मीरा भाईंदर येथे नवीन दिवाणी न्यायालय तयार झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, यापुढे न्याय मिळवण्यासाठी ठाण्यापर्यंत पायपीट करावी लागणार नाही असे सांगत पुढे बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर न्यायदेवतेची प्रतिष्ठापना करण्याचे सौभाग्य लाभले असून या न्यायालयाचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना नक्की होईल असा विश्वास …

Read More »

एकनाथ शिंदे यांची ग्वाही, महाराष्ट्राच्या विकासाचा वेग आणखी वाढणार… राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेस उपमुख्यमंत्री शिंदे यांचे उत्तर

राज्यातील सर्वसामान्य माणसाचे आयुष्य सुकर झाले पाहिजे. समाधानी झाले पाहिजे. उद्योग बहरले पाहिजेत. माझा लाडका शेतकरी, लाडक्या बहीणी, लाडके तरुण, लाडके ज्येष्ठ सुखावले पाहिजेत. सुरक्षित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र हेच आमचे लक्ष्य असल्याचे सांगत महाराष्ट्राच्या विकासाचा वेग आणखी वाढणार असून विकासयात्रेत सगळ्यांनीच सामील व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केले. विधान परिषदेत …

Read More »

एकनाथ शिंदे यांची ग्वाही, बेघर होवून बाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत हक्काचे घर गोळीबार खार भागातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करणार

रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करून बाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईतच हक्काचे घर मिळवून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. मुंबईतील खार (पूर्व) येथील पुनर्विकास प्रकल्पबाबत सदस्य वरुण सरदेसाई यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली. यावेळी चर्चेत सदस्य अमित देशमुख यांनीही सहभाग घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सामान्य रहिवाशाला …

Read More »

काळू धरण पूर्ण करून ठाणे महानगराची पाणी समस्या कायमस्वरूपी सोडविणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कळवा, मुंब्रा व विटावा परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासन विविध प्रयत्न करीत आहे. काळू धरण पूर्ण होईपर्यंत पर्यायी उपाययोजनांचा अवलंब करून या समस्येवर मात करण्यात येईल. काळू धरण पूर्ण करुन ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. ठाणे महापालिका …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, मुंबईतील धोकादायक आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देणार ६ महिन्यासाठी पहिल्यादा जमिन मालकाला संधी

मुंबई शहरातील धोकादायक, जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या जलद पुनर्विकासासाठी लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन इमारतींच्या पुनर्विकासातील अडथळे दूर करून या पुनर्विकासाला गती देण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  विधानसभेत दिले. विधानसभेत सदस्य सर्वश्री अमिन पटेल, पराग आळवणी, अजय चौधरी, योगेश सागर, सुनिल राऊत, जयंत पाटील, नाना पटोले, अतुल भातखळकर, छगन भुजबळ यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. याला उत्तर …

Read More »

भोकरदनमधील पिडीत कैलास बोराडें प्रकरणी एकनाथ शिंदे यांचे निवेदन पिडीत कैलास बोराडे यांच्या उपचाराचा संपूर्ण वैद्यकीय खर्च राज्य शासन करेल

जालना जिल्ह्यातील भोकरदनमधील कैलास बोराडे यांना झालेल्या मारहाणीची घटना अतिशय दुर्देवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई  केली जाईल, यामध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. पिडीत कैलास बोराडे यांच्या उपचाराचा संपूर्ण वैद्यकीय खर्च राज्यशासन करेल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत सांगितले. भोकरदनमधील कैलास बोराडे यांना झालेल्या …

Read More »

धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस नंतर राज्यपालांनी स्विकारला धनंजय मुंडे आता बिन खात्याचे मंत्री साधे आमदार

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाऐवजी स्वतःच्या तब्येतीचे वैद्यकीय कारण देत मंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर दोन तासांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा यांचा स्विकारला असल्याचे जाहिर केले. तसेच पुढील कारवाईसाठी तो राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनी सत्तेवरचा नैतिक अधिकार गमावला तुमच्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली, तात्काळ राजीनाम द्या!

स्व. संतोष देशमुख यांची हत्या करताना मारेक-यांनी जी क्रूरता केली आहे ती माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेचे फोटो पाहून तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय रहात नाही. काल या घटनेची छायाचित्रे पाहिल्यापासून संपूर्ण महाराष्ट्र आक्रोश करत आहे. पोलीस आणि सरकारकडे ही छायाचित्रे आणि व्हिडीओ असूनही सरकार धनंजय मुंडे यांना वाचवत होते. …

Read More »

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सरकारने आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या अबू आजमीचा तीव्र शब्दात धिक्कार..

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजे औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या विधानसभा सदस्य अबू आजमी यांचा आम्ही निषेध करतो. अबू आजमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय आक्रमकपणे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सांगितले. याबाबत निवेदन …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, आर्थिक शिस्त पाळतानाच फ्लॅगशिप योजना बंद करणार नाही संतुलित अर्थसंकल्प मांडण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात अतिशय चांगला व संतुलित अर्थसंकल्प मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. आर्थिक शिस्त पाळताना भांडवली खर्चावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेत आहोत. हे करत असताना कोणतीही फ्लॅगशिप योजना बंद करणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रमानंतर …

Read More »