हिंदू दहशतवाद, सनातन दहशतवाद अशी वक्तव्यं करणाऱ्या काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात शिवसेनेकडून आज मुंबई आणि ठाण्यात जोरदार आंदोलन करण्यात आले. मुंबईतील टिळक भवन या काँग्रेस कार्यालयावर शिवसैनिकांनी आणि महिला आघाडीने पृथ्वीराज चव्हाण, राहुल गांधी यांनी हिंदूंची माफी मागावी, या मागणीसाठी ठिय्या केला. या आंदोलनात आमदार मनीषा कायंदे, शिवसेना …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचे प्रतिपादन, अदानी व अंबानींच्याच कंपन्यांचे राष्ट्रीयकरण करण्याची गरज राष्ट्रीयकृत बँकांत परदेशी गुंतवणूक देशासाठी धोक्याची घंटा, बँकांचे दरवाजे सामान्य लोकांसाठी बंद होण्याच्या मार्गावर: विश्वास उटगी.
इंदिराजी गांधी यांनी १९६९ साली बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला त्यामागे एक महत्वाचे कारण होते. देशातील आर्थिक स्रोतांचा ताबा त्यावेळी मुठभर लोकांच्या हातात होता व ही शक्ती लोकशाहीवरही ताबा मिळवू पहात होती, यातून हा महत्वपूर्ण निर्णय झाला. आता पुन्हा ५६ वर्षांनी देशात एक नवी ईस्ट इंडिया कंपनी आली असून दोन भाईंचा …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, भाजपा युती सरकार बेशरम व लाचार, राजीनामा न घेता क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच दहशतवादाला रंग देण्याचा भाजपाचा प्रयत्न, मालेगावचा खरा निकाल तर एक दिवस आधी गृहमंत्र्यांनी संसदेत दिला
राज्यातील भाजपा युती सरकार हे बेशरम व लाचार असून विधानसभेत रमी खेळणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा सोडून क्रीडा मंत्रालय देऊन उचित सन्मानच केला आहे. आता रमी या खेळाला ऑलिंम्पिक दर्जा देतील व तो खेळणाऱ्याला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानितही करतील असा घणाघाती हल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. लोकमान्य बाळ …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाणार का? दहशतवादाला रंग नसतो, दहशतवादी दहशतवादीच, त्यांना शिक्षा कठोर झालीच पाहिजे
काँग्रेस पक्ष नेहमीच दहशतवादाच्या विरोधात राहिलेला आहे. महात्मा गांधी, इंदिराजी गांधी व राजीव गांधी यांच्या बलिदाने काँग्रेसने दहशतवादीचा मोठी किंमत मोजलेली आहे. या दहशतवादाला कोणताही रंग नसतो दहशतवादी हा दहशतवादीच असतो, त्याला शिक्षा झाली पाहिजे असे स्पष्ट करत मुंबई रेल्वे स्फोटाच्या निकालावर राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे तसेच मालेगाव …
Read More »राहुल गांधी यांचा आरोप, मोदी, सीतारामन वगळता सर्वांना माहिती… भारताची अर्थव्यवस्था मृत अर्थव्यवस्था झालीय
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (३१ जुलै २०२५) केंद्र सरकारवर टीका करताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण वगळता सर्वांना माहित आहे की भारताची अर्थव्यवस्था ही एक “मृत अर्थव्यवस्था” आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय आयातीवर २५% कर लादण्याची घोषणा केल्यानंतर आणि नंतर …
Read More »पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप, मोदींवर आचारसंहिता भंग प्रकरणी निवडणूक आयोगाची टाळाटाळ कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, इंदिराजी गांधी व बाळासाहेब ठाकरेंवर कारवाई मग मोदींवर कारवाई का नाही?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० साली आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केले पण त्याविरोधात केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यास राज्य निवडणूक आयोगाने टाळाटाळ केली आहे. आचारसंहितेचा भंग केल्याचे आयोगाने मान्य करत केवळ रेल्वे प्रशासनाला समज दिली पण मोदींवर कारवाई केलेली नाही. तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कठोर कारवाई …
Read More »विश्वास उटगी यांचे आवाहन, बँकांचे खाजगीकरण करण्याचा मोदी सरकारचा डाव हाणून पाडा राष्ट्रीयकृत बँका वाचवण्यासाठी काँग्रेसचा पुढाकार
इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयकरण करून सर्वसामान्य जनतेला बँकांचे दरवाजे खुले केले. या ऐतिहासिक घटनेला आज ५६ वर्ष झाली. पण आता मात्र केंद्रातील भाजपा सरकारची धोरणे राष्ट्रीयकृत बँकांच्या हिताची नाहीत. राष्ट्रीयकृत बँका भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न सुरु आहे. बँकिंग क्षेत्रातील तज्ञ, सर्वसामान्य जनता व समविचारी संघटनांनी मोदी सरकारचा हा प्रयत्न …
Read More »पंतप्रधान मोदी यांचा डोनाल्ड ट्रम्प वक्तव्याबाबत चकार शब्द नाही, काँग्रेसवरच टीकास्त्र मात्र राहुल गांधी यांच्या आव्हानावर पंतप्रधान मोदी चक्क पाणी प्यायले
भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानशी संबंधित मुद्द्यांवर अवलंबून राहिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी काँग्रेसवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राहुल गांधी यांचा पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष भारत आघाडी आणि त्यांच्या सैन्याविरुद्ध पाकिस्तानच्या चुकीच्या मोहिमेला बळी पडले आहेत आणि ते त्यांचे प्रवक्ते बनले आहेत. ऑपरेशन सिंदूरवरील काँग्रेसची विधाने पाकिस्तानच्या …
Read More »राहुल गांधी यांचा हल्लाबोल, मोदी मध्ये इंदिरा गांधींच्या ५० टक्के धाडस असेल तर.. पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना खोटारडे, युद्धबंदी मध्ये मध्यस्थी केली नसल्याचे सांगावे
संसदेत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरवरील प्रस्तावावरील चर्चेत सहभाग घेत सुरुवातीलाच केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. भारत-पाकिस्तान तणाव आणि सरकारने या ऑपरेशन सिंदूरला कसे हाताळले यावर प्रश्न उपस्थित केले. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन्ही देशांमधील युद्धबंदीसाठी मध्यस्थी करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या …
Read More »अतुल लोंढे यांचा आरोप, गृहमंत्री अमित शाह यांची संसदेत खोटी माहिती संसद हल्ला, अक्षरधाम, कंदहार प्रकरणी गप्प का? चीनचे नाव घेण्याची हिम्मत का होत नाही ?
ऑपरेशन सिंदूर विषयी संसदेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नेहमीप्रमाणे खोटे बोलले. काँग्रेस सरकार असताना अतिरेकी हल्ले झाले हे सांगताना भाजपा सरकारच्या वेळी झालेल्या हल्ल्यांचा उल्लेख त्यांनी केला नाही. वाजपेयी सरकार असताना संसदेवर हल्ला झाला, अक्षरधाम हल्ला झाला आणि कंदहार विमान अपहरण प्रकरणी तर मंत्री जसवंत सिंह हे सुरक्षेसह पाच …
Read More »
Marathi e-Batmya